शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
2
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
3
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
4
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
5
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
6
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
7
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
8
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
9
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
10
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
11
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
12
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
13
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
14
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
15
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
16
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
17
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
18
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
19
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
20
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच

गुहागरातील तळवली गावात माता बालस्नेही उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:37 IST

रत्नागिरी : समाजातील सर्वात दुर्लक्षित घटक म्हणजे लहान मुले. तेव्हा बालविकासाच्या मुद्द्याला अग्रक्रम द्यायला हवा. गरोदर माता आणि लहान ...

रत्नागिरी : समाजातील सर्वात दुर्लक्षित घटक म्हणजे लहान मुले. तेव्हा बालविकासाच्या मुद्द्याला अग्रक्रम द्यायला हवा. गरोदर माता आणि लहान मुलांना तातडीने उपचार मिळण्यासाठी मुंबईतील संपर्क संस्थेने माता बालस्नेहीची संकल्पना मांडली आहे. राज्यातील पहिल्या प्रकल्पाची सुरुवात गुहागरातील तळवली गावातून गुरुवारी सकाळी ११ वाजता होणार आहे. तळवली ग्रामपंचायत येथे आमदार भास्कर जाधव, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकल्पाचा शुभारंभ होणार आहे.

आरोग्य यंत्रणेतील कमतरता दूर करण्यासाठी केवळ सरकारवर अवलंबून राहून चालणार नाही, तर लोकसहभागातून गावा-गावातील आरोग्य यंत्रणा सक्षम केली पाहिजे. जेणेकरून अधिक उपचारासाठी शहराच्या ठिकाणी जायला लागू नये. विशेषतः गरोदर माता आणि लहान मुलांना तातडीची सेवा मिळावी, यासाठी संपर्क संस्थेने माता बालस्नेही या प्रकल्पाची संकल्पना एप्रिलमध्ये मांडली होती. राज्यातील बहुतांश लोकप्रतिनिधींकडे याविषयी चर्चा करण्यात आली होती, पत्रही पाठविण्यात आले होते. गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी ही संकल्पना उचलून धरली आणि संस्थेशी चर्चा केली. आरोग्य क्षेत्रातील एक उत्तम दर्जाचे प्राथमिक आरोग्य केंद्र उभे करण्यासाठी जे काही करता येईल ते करू, असे त्यांनी बैठकीत सांगितले होते, त्याप्रमाणे याची मुहूर्तमेढ १६ सप्टेंबर रोजी रोवली जात आहे. संपर्क, युनिसेफ, प्रथम शैक्षणिक फाैंडेशन यांच्यामार्फत माता बालस्नेही प्रकल्पअंतर्गत तळवली गावातील अंगणवाडी, आशा सेविका, तरुणांना याविषयी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आल्यानंतर त्वरित डॉक्टर उपलब्ध होणार आहेत. तसेच गरोदर मातांचे समुपदेशन, आरोग्याची काळजी घेण्यासाठी काय करता येईल, आलेल्या रुग्णांना चांगली सेवा मिळतेय का? हे पाहण्यासाठी एक टीम याठिकाणी राहणार आहे. तसेच या आरोग्य केंद्रात लहान मुलांसाठी खेळणी व इतर साहित्यही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या तळवली प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रथम फाैंडेशनकडून २ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात येणार आहेत.

तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र सेवा देते, त्या प्रत्येक गावातील काही युवक-युवतींची निवड केली जाणार आहे. त्यांना आरोग्य आणि रुग्णसेवा याबरोबरच, बाळाच्या पहिल्या हजार दिवसांचे महत्त्व, कुपोषण, गरोदरपणात घ्यायची काळजी, स्तनपानाचे महत्त्व, मासिक पाळीच्या दिवसातील आरोग्य अशा मानवी जीवनचक्राशी निगडित विषयांवर संस्था प्रशिक्षण देणार आहे. त्यातून आरोग्यदूत मुला-मुलींची एक टीम तयार होईल. ही टीम प्राथमिक आरोग्य केंद्राला मदत करेल आणि गावातल्या गावातही सेवा देऊ शकेल. प्रशिक्षित मुला-मुलींना स्वकमाईचे एक साधनही मिळेल.