शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

एप्रिल महिना वाढविणार उन्हाळ्याचा ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यातील तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे आता एप्रिल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यातील तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे आता एप्रिल महिना सुरू होताच यापुढे अधिक तापमानातील वाढ जिल्ह्याला हैराण करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे.

आतापर्यंत रत्नागिरीचे तापमान जास्तीत जास्त ३६ अंश सेल्सिअसपर्यंत जात असे. मात्र, आता त्यात २ ते २.५ अंशांपर्यंत वाढ झाली आहे. गेल्या आठवड्याच्या शेवटी जिल्ह्यात उष्णतेची लाट निर्माण झाल्याने या कालावधीत जिल्हावासीयांना उकाड्याने हैराण केले होते. वाढत्या तापमानाबरोबरच दमट वातावरणामुळे वाहणाऱ्या घामाच्या धारांनी नागरिक मेटाकुटीस आले आहेत.

या वर्षी पावसाचे आगमन डिसेंबर महिन्यापर्यंत लांबले. त्यानंतरही फेब्रुवारी महिन्यात कोसळलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यात थंडीचे वातावरण निर्माण केले. त्यामुळे रत्नागिरीकरांना थंडीचा सुखद अनुभव मिळत होता.

मात्र, त्यानंतर अचानक उष्णता वाढू लागली आहे. गेल्या आठवड्यात तीन दिवस आलेल्या उष्णतेच्या लाटेने हैराण केले. एप्रिल महिन्यात तर उष्णता अधिक वाढणार आहे.

शुक्रवारचे रेकाॅर्ड

गेल्या आठवड्यात शुक्रवार, २६ मार्च रोजी रत्नागिरी जिल्ह्याचे सर्वाधिक तापमान ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते.

सोमवार, २२ मार्च रोजी ३१ अंश सेल्सिअस तापमान होते. या आठवड्यातील सर्वात कमी या दिवशीचे तापमान नोंदविले गेले.

असा राहील आठवडा

आगामी आठवड्यात जिल्ह्याचे कमाल तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सिअस राहणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

जिल्ह्याचे किमान तापमान २५ ते २७ अंश सेल्सिअस इतके राहणार असल्याची शक्यता दिसत आहे.