शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

चिपळुणातील सावकारांनी घेतलाय सावध पवित्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:36 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : सावकारीला कंटाळून येथील अभिजित गुरव या तरुणाने थेट आत्महत्या केली आणि सावकारीचे बिंग फुटले. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : सावकारीला कंटाळून येथील अभिजित गुरव या तरुणाने थेट आत्महत्या केली आणि सावकारीचे बिंग फुटले. आता या सावकारांच्या मागे चौकशी व कायदेशीर कारवाईचा ससेमिरा सुरु झाला आहे. मात्र, जोपर्यंत वातावरण शांत होत नाही, तोपर्यंत सावकारीचे सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा पवित्रा काही व्यावसायिकांनी घेतला आहे.

गेल्या काही वर्षात चिपळूण शहर आणि आजूबाजूच्या परिसरात सावकारी कर्जधंद्याला प्रचंड ऊत आला आहे. प्रत्यक्षात १९ जणांकडे सावकारीचे परवाने असले, तरी ५०हून अधिकजण हा धंदा बिनदिक्कतपणे करत आहेत. या माध्यमातून अडचणीत असलेल्यांना गरजेपोटी तत्काळ पैसे द्यायचे. त्यावेळी त्यांच्याकडून गाडीचे, प्रॉपर्टीचे कागदपत्र घ्यायचे तसेच कोरे बॉण्डपेपर आणि धनादेशदेखील घेऊन नंतर मात्र त्याच कागदपत्रांद्वारे कर्जदारांची अक्षरशः लूट करायची, असा बेफाम धंदा येथे सुरू होता. सावकार कशा पद्धतीने पिळवणूक करत होते, याची अनेक उदाहरणे आता पुढे येत आहेत.

या संपूर्ण व्यवहाराची सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून चौकशी सुरू आहे. मात्र, ही चौकशी केवळ परवानाधारक व्यावसायिकांची केली जात असली, तरी विनापरवाना सावकारी करणारे मोकाट आहेत. अशा विनापरवाना सावकारी करणाऱ्यांविरोधात एखादी तक्रार झाल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, या भीतीने त्यांनी सावध पवित्रा घेतला आहे. काहींनी तर कर्जदारांकडून जप्त केलेली वाहने, कोरे धनादेश व बॉण्ड परत केले आहेत. त्यामुळे कधी नव्हे ते सावकारांकडून कर्ज घेणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

------------------------------

सावकारीचे थेट झारखंडपर्यंत कनेक्शन

चिपळूण शहरातील गोवळकोट परिसरात एका बंटी-बबलीने सावकारीचे कारनामे केले असल्याचे कर्जदार स्वतः सांगत आहेत. तसेच येथील सावकारीचे कनेक्शन हे थेट झारखंडपर्यंत असल्याची चर्चादेखील ऐकण्यास मिळत आहे. झारखंडमधून पैसे आणून येथे कर्जवाटप करायचे आणि कर्जदारांकडून घेतलेली तारण कागदपत्रे थेट झारखंड येथे पाठवून देऊन नंतर कर्जदारांची पिळवणूक करायची, असा प्रकार गेली कित्येक वर्षे सुरू असल्याचे म्हटले जात आहे.

---------------------------------

दोषींवर कारवाई कधी होणार?

चिपळुणातील १९ परवानाधारक सावकारांना नोटीस पाठवून अहवाल मागविण्यात आला आहे. तसेच काहीजण प्राथमिक चौकशीत दोषी आढळले आहेत. मात्र, अनेक दिवस होऊनही संबंधितांवर कारवाई झालेली नाही. जिल्हा निबंधकांमार्फत ही कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, प्रत्यक्षात कोणतीही कारवाई न झाल्याने याविषयी उलटसुलट चर्चा सुरु आहे.