शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

पैशाने खुर्ची मिळवता येते ज्ञान नाही : संजय यादव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:37 IST

लांजा : पैशाच्या जोरावर नगराध्यक्षांनी खुर्ची मिळवली, तर लग्न होत नाही म्हणून आमदारांकडून बालहट्ट करून उपनगराध्यक्षांनी खुर्ची मिळवली. या ...

लांजा : पैशाच्या जोरावर नगराध्यक्षांनी खुर्ची मिळवली, तर लग्न होत नाही म्हणून आमदारांकडून बालहट्ट करून उपनगराध्यक्षांनी खुर्ची मिळवली. या खुर्चीचा उपयोग वैयक्तिक टीकाटिप्पणी करण्यासाठी न करता जनतेच्या विकासकामांसाठी करायला हवा होता, असा सनसनाटी टोला भाजपचे नगरसेवक व गटनेते संजय यादव यांनी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचे नावे न घेता लगावला आहे.

लांजा नगर पंचायतीच्या कार्यक्षेत्रातील जातीवाचक वाड्यांची व रस्त्यांची नावे बदलण्याचा अध्यादेश वाचून त्यावर नगरसेवकांनी प्रमुख गावकरी मंडळींना विश्वासात घेत नावात बदल करण्याचा निर्णय सर्वसाधारण बैठकीत घेतल्यानंतर भाजपचे नगरसेवक व गटनेते संजय यादव यांनी वाड्या व रस्त्यांच्या नावात बदल करण्याला विरोध करत जोरदार टीका केली होती. त्यांच्या टीकेला नगराध्यक्ष मनोहर बाईत यांनी उत्तर दिल्यानंतर भाजप नगरसेवकांनी नगराध्यक्षांवर टीका केली आहे. भाजपच्या नगरसेवकांनी जनतेशी चर्चा करून पुढील सभेमध्ये विषय घेण्यात यावा, अशी विनंती केली होती. परंतु, दि. २८ ऑगस्ट रोजी सत्ताधारी शिवसेनेने धुंदरे प्रभागातील सुतारवाडीचे नामकरण साईनगर करण्याची कार्यवाही करण्यासाठी पत्र दिले. ही गोष्ट लांजातील गाववाल्यांना विचारात न घेता केली, असे संजय यादव यांनी म्हटले आहे. पॅनकार्ड, आधारकार्ड, रेशनकार्ड, मतदान कार्ड, बँक, जन्मापासून मृत्यूपर्यंतचे व इतर दफ्तरी ऐवज यावरील नोंद असलेल्या पत्त्यात बदल करण्यासाठी गाववाल्यांना किती परिश्रम घ्यावे लागतील, याचा अभ्यास नसल्याने ‘फक्त नामकरण करणे म्हणजे विकास नाही’ असा टाेलाही त्यांनी लगावला आहे.

जनतेला खोटे सांगू नका, जर तुम्ही नाव दिले नाहीत तर शासन आपल्या प्रभागाला वाडी-वस्तीला नाव ठरवेल, असे वक्तव्य करून जनतेची दिशाभूल करणे चुकीचे आहे. खरंच जर सत्ताधारी शिवसेना जनतेसोबत असेल तर त्यांनी जाहीर करावे की, आम्ही लांजा नगर पंचायत कार्यक्षेत्रातील कोणतीही नावे बदलणार नाही किंवा बदलू देणार नाही. पण असे ते करणार नाहीत. कारण ती क्षमता त्यांच्यात नाही, असे मत संजय यादव यांनी मांडले. यावेळी भाजप शहराध्यक्ष प्रमोद कुरूप, नाना शेट्ये, हेमंत शेटे, विजय कुरूप, मयूर शेडे, अशोक गुरव, शेखर सावंत, नगरसेवक मंगेश लांजेकर, शीतल सावंत, इक्बाल गिरकर उपस्थित होते.