शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
3
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
4
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
5
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
6
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
7
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
8
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
9
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
10
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
11
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
12
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
13
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
14
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
15
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
16
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
17
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
18
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
19
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
20
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास

मिऱ्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याला भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:31 IST

रत्नागिरी : समुद्राच्या उधाणाने मिऱ्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याला जोरदार तडाखा बसला आहे. पंधरामाड येथील भागाला लाटांमुळे मोठे भगदाड पडले ...

रत्नागिरी : समुद्राच्या उधाणाने मिऱ्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याला जोरदार तडाखा बसला आहे. पंधरामाड येथील भागाला लाटांमुळे मोठे भगदाड पडले आहे. बंधाऱ्याबरोबर रस्ता वाहून गेला आहे. बंधाऱ्यालगत असणाऱ्या पेजे यांच्या घरात समुद्राचे पाणी घुसण्याची भीती आहे. यामुळे येथील सर्व रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. प्रशासनाने वाहून गेलेल्या बंधाऱ्याचे तत्काळ काम करून आमचे संरक्षण करावे, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे.

काही दिवसांपूर्वीच पांढरा समुद्र येथील रेतीचा काही भाग वाहून गेला होता. त्यामुळे समुद्राचा प्रवाह बदलून पुन्हा पांढऱ्या समुद्राकडे येण्याची भीती व्यक्त होत होती. मात्र, सोमवारी उधाणाच्या भरतीने मिऱ्याचा धोका कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी पंधरामाड, भाटीमिऱ्या, आलावा, भागात समुद्राच्या उधाणामुळे सात ठिकाणी बंधाऱ्याला धोका निर्माण झाला होता. सुमारे ९४ कोटीचे हे काम होते. मात्र, त्याला अपेक्षित निधी उपलब्ध झाला नाही. फक्त बंधाऱ्याची मलमपट्टी करण्यात आली. कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून सुमारे साडेतीन किलोमीटरचा १९० कोटीचा मिऱ्या बंधारा मंजूर आहे. परंतु त्याचे काम पूर्ण होण्यास आणखी काही वर्षे जाणार आहेत. काम पूर्ण होईल तेव्हा होईल तोवर प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, असे स्थानिक नागरिकांकडून बोलले जात आहे.