शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

मिऱ्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याला भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:31 IST

रत्नागिरी : समुद्राच्या उधाणाने मिऱ्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याला जोरदार तडाखा बसला आहे. पंधरामाड येथील भागाला लाटांमुळे मोठे भगदाड पडले ...

रत्नागिरी : समुद्राच्या उधाणाने मिऱ्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याला जोरदार तडाखा बसला आहे. पंधरामाड येथील भागाला लाटांमुळे मोठे भगदाड पडले आहे. बंधाऱ्याबरोबर रस्ता वाहून गेला आहे. बंधाऱ्यालगत असणाऱ्या पेजे यांच्या घरात समुद्राचे पाणी घुसण्याची भीती आहे. यामुळे येथील सर्व रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. प्रशासनाने वाहून गेलेल्या बंधाऱ्याचे तत्काळ काम करून आमचे संरक्षण करावे, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे.

काही दिवसांपूर्वीच पांढरा समुद्र येथील रेतीचा काही भाग वाहून गेला होता. त्यामुळे समुद्राचा प्रवाह बदलून पुन्हा पांढऱ्या समुद्राकडे येण्याची भीती व्यक्त होत होती. मात्र, सोमवारी उधाणाच्या भरतीने मिऱ्याचा धोका कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी पंधरामाड, भाटीमिऱ्या, आलावा, भागात समुद्राच्या उधाणामुळे सात ठिकाणी बंधाऱ्याला धोका निर्माण झाला होता. सुमारे ९४ कोटीचे हे काम होते. मात्र, त्याला अपेक्षित निधी उपलब्ध झाला नाही. फक्त बंधाऱ्याची मलमपट्टी करण्यात आली. कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून सुमारे साडेतीन किलोमीटरचा १९० कोटीचा मिऱ्या बंधारा मंजूर आहे. परंतु त्याचे काम पूर्ण होण्यास आणखी काही वर्षे जाणार आहेत. काम पूर्ण होईल तेव्हा होईल तोवर प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, असे स्थानिक नागरिकांकडून बोलले जात आहे.