शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

मिनी मंत्रालय आता लवकरच सौरऊर्जेवर

By admin | Updated: October 24, 2016 00:14 IST

जिल्हा परिषद : विजेची बचत करण्यासाठी उपाय

रत्नागिरी : विजेची बचत व्हावी यासाठी मिनी मंत्रालयातील विद्युत पुरवठा लवकरच सौरऊर्जेद्वारे होणार आहे. मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषदेत हा सौरऊर्जा प्रकल्प राबविण्याबाबत ‘मेढा’च्या अधिकाऱ्यांकडून परिषद भवनची पाहणी करण्यात आली. यावेळी प्रत्येक विभागात किती विद्युत उपकरणे आहेत, त्याबाबतचा अहवालही जिल्हा परिषद प्रशासनाकडून नुकताच घेण्यात आला. दिवसेंदिवस विजेचा होणारा वाढता वापर लक्षात घेता, भविष्यात विजेची कमतरता भासणार आहे. तसेच वीजदरातही वाढ झाली आहे. यामुळे जिल्हा परिषदेसाठी सौरऊर्जेचा विचार केला जात आहे. शासकीय कार्यालयांमध्ये विजेचा वापर वारेमापपणे केला जातो. कर्मचारी असो वा अधिकारी हे स्वत:च्या घरी विजेचा वापर काटकसरीने करुन वीजबिल कसे कमी येईल, याचा विचार करतात. मात्र, हेच अधिकारी व कर्मचारी अनेकदा कार्यालयांमधील दिवे दिवसाढवळ्या तसेच चालू ठेवतात आणि काहीवेळा पंख्याची आवश्यकता नसतानाही ते सुरु असतात. मिनी मंत्रालय असलेल्या रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये अनेकदा अनावश्यक वीज, फॅन सुरु असल्याचे चित्र पाहावयास मिळते. चार मजली या इमारतीमध्ये प्रत्येक मजल्यावरील जिल्हा परिषदेच्या सर्वच खातेप्रमुखांच्या केबीनमध्ये ए. सी. बसविण्यात आले आहेत. तसेच सभागृहातही ए. सी. बसविण्यात आला आहे. त्याचा वापर केवळ सभा किंवा कार्यक्रमांच्या वेळी करण्यात येतो. प्रत्येक विभागामधील दिवे, फॅन मात्र विनाकारण सुरु असतात. त्यामुळे महिन्याला हजारो युनिट विजेचा वापर होतो. विजेचे वाढलेले दर व विजेचा अनावश्यक वापर यामुळे जिल्हा परिषद लाखो रुपये वीजबिलासाठी खर्च करते. या खर्चाच्या बचतीसाठी आता सौरऊर्जेचा पर्याय प्रशासनाने स्वीकारला आहे. सौरऊजेद्वारे वीजपुरवठा झाल्यास जिल्हा परिषदेचे लाखो रुपये वाचणार आहेत. या कामाला आता गती आल्याने पुढील काही महिन्यातच जिल्हा परिषद सौरऊर्जेवर चालणार आहे. (शहर वार्ताहर)