शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

फायद्यासाठी बदलली राजापुरातील एमआयडीसीची जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:32 IST

राजापूर : रेल्वे स्टेशन परिसरात होऊ घातलेल्या एमआयडीसीची जागा बदलून सोलगाव, गोवळ परिसरात नेण्यात आली आहे. सर्व सोयीनीयुक्त असलेल्या ...

राजापूर : रेल्वे स्टेशन परिसरात होऊ घातलेल्या एमआयडीसीची जागा बदलून सोलगाव, गोवळ परिसरात नेण्यात आली आहे. सर्व सोयीनीयुक्त असलेल्या नियोजित जागेत बदल का करण्यात आला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काही जमीन माफियांच्या फायद्यासाठीच ही जागा बदलण्यात आल्याची चर्चा राजापूर परिसरात सुरू आहे.

तालुक्यातील युवकांना रोजगार मिळावा म्हणून तालुक्यात एमआयडीसी उभारण्यात यावी, अशी मागणी केली जात होती. याची दखल प्रथम माजी राज्यमंत्री भाई हातणकर यांनी घेतली हाेती. त्यावेळी पन्हळे, तळगाव दरम्यान ही लघुउद्योग वसाहत उभारण्याचा घाट घालण्यात आला हाेता. मात्र, त्यावेळी ही वसाहत रानतळे येथे उभारण्यात यावी, असा सूर उमटू लागला हाेता. त्यानंतर अद्यापही हे घाेंगडे भिजत राहिले. त्यानंतर माजी आमदार गणपत कदम यांनी सर्व सोयी उभारत राजापूर रोड रेल्वे स्टेशन परिसरातील जागेची निवड केली हाेती. त्यांनी प्रथम विजेचा प्रश्न सोडविताना ओणी येथे विद्युत सबस्टेशनची उभारणी केली. पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी पांगरे धरणाची उभारणी केली. हसोळ व सोल्ये गावांमध्ये छोट्या धरणाचे बांधकाम करण्यासाठी जागेचे सर्वेक्षण केले हाेते. गोपाळवाडी धरणाचे पाणी मिळविण्यासाठी व अर्जुना माध्यम प्रकल्पाचा कालवा हा ताम्हाणे पहिलीवाडी नियोजित असून, हा कालवा पुढे पाच-सहा किलाेमीटर वाढविण्यासाठी प्रस्ताव सादर केला. वाहतूक प्रश्न सोडविण्यासाठी रेल्वेचा लाभ होणार होताच, शिवाय या ठिकाणी रस्त्याचेही जाळे विणले गेलेले आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशनजवळील पठारावर ही जागा निश्चित करण्यात आली होती.

या ठिकाणाहून सौंदळ मार्गे कोल्हापूर, रत्नागिरी, केळवली भुईबावडा मार्गे कोल्हापूर, केळवळी, खारेपाटण तरळे मार्गे कोल्हापूर गोवा, सिंधुदुर्ग, तर रेल्वे स्टेशन, हसोळ, ससाळे, आंगले मार्गे राजापूर शहरांना जोडणारे रस्त्याचे जाळे विणलेले आहे. तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणे यांनी या एमआयडीसीला हिरवा कंदील दिला होता. त्यानंतर पुढील दोन विधानसभा निवडणुकीमध्ये काही राजकीय पक्षांनी याचे भांडवल करीत मते मिळविली. मात्र, गेली दहा वर्षे हा प्रश्न प्रलंबित ठेवला. गतवर्षी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. मात्र, सर्वसोयीनीयुक्त असलेल्या जागेला डावलून ही वसाहत गोवळ, सोलगाव परिसरात उभारण्याचा घाट घालण्यात आला. या परिसरात ही वसाहत उभारताना प्रथम पाणी, वीज, रस्त्याचा प्रश्न सोडवावा लागणार आहे. सुविधा उपलब्ध नसलेली जागा का निवडण्यात आली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काेणाच्या फायद्यासाठी ही एमआयडीसी उभारली जात आहे, असाही प्रश्न उपस्थित हाेत आहे.