शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

विवाह, सत्यनारायण महापूजा ऑनलाईन, तेरावे मात्र प्रत्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:22 IST

मेहरून नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे विवाह, साखरपुडा तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी शासनाने निर्बंध घातले आहेत. मोजक्या लोकांच्या ...

मेहरून नाकाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनामुळे विवाह, साखरपुडा तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी शासनाने निर्बंध घातले आहेत. मोजक्या लोकांच्या उपस्थितीतच कार्यक्रम उरकण्यात येत आहेत. वास्तविक ८० ते ९० टक्के कार्यक्रम बंद आहेत. परदेशात असलेल्या उभयतांसाठी साखरपुडा, विवाह ऑनलाईन आयोजित केला जात आहे.

स्थानिकांमध्येही अनेकांनी विवाह सोहळे रद्द केले आहेत. मात्र, ठराविक लग्न सोहळे आयोजित केले जात असले तरी उपस्थितीची मर्यादा पाळण्यात येत आहे. शिवाय मास्क, सॅनिटायझरचा वापर व सोशल डिस्टन्सिंग राखले जात आहे. मंदिरे बंद असल्यामुळे लघुरूद्र, अभिषेकसारखे धार्मिक कार्यक्रमही बंदच आहेत. श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात येत असली तरी महाप्रसाद ठेवला जात नाही. पूजेला नमस्कार करण्यासाठीही सहसा लोकांना बोलावले जात नाही. घरातील मंडळींमध्येच कार्यक्रम उरकण्यावर भर आहे. काेरोनाच्या धास्तीमुळे गर्दी टाळली जात आहे. वास्तूशांती, गणेशपूजन तर सध्या बंदच आहे.

मृत व्यक्तीचे दहावे, बारावे व तेरावे भटजींना बोलावून उरकण्यात येत असले तरी अगदी जवळच्या नातेवाईकांशिवाय अन्य कोणालाही बोलावणे टाळले जात आहे.

साखरपुडा, विवाह ऑनलाईन

परदेशात नोकरीनिमित्त असलेल्या उभयतांना लग्नासाठी किंवा साखरपुड्यासाठी गावी येणे शक्य नाही. त्यामुळे ऑनलाईन विवाह, साखरपुडा उरकण्यावर भर दिला जात आहे. यजमानांच्या घरी भटजींना बोलावून मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत साखरपुडा, विवाह सोहळे उरकले जात आहेत. लांबचे नातेवाईकही ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी होऊन उभयता व यजमान मंडळींना शुभेच्छा देत आहेत. काही ठिकाणी गणेश पूजन किंवा वास्तूशांती पूजासुध्दा ऑनलाईन आयोजित करण्यात येत आहेत. भटजींच्या सूचनेनुसार यजमान तयारी करत असून, भटजी ऑनलाईन पूजा पठण करून विधी उरकले जात आहेत.

कोरोनामुळे पूजा, अभिषेक, लघुरूद्रसारखे अनेक कार्यक्रम टाळण्यात येत आहेत. मोजकेच कार्यक्रम आयोजित केले जात असले तरी कोरोनामुळे शासकीय नियमांचे पालनही करण्यात येत आहे. यजमान पूजेला बसले असताना आचमनावेळी मास्क बाजूला काढतात, मात्र नंतर कायम मास्क परिधान करतात. आम्ही मास्क घालूनच पूजा सांगतो.

- चिंतामणी काळे, भटजी

विवाह, साखरपुडासारखे कार्यक्रम आता फार कमी होत आहेत. वास्तूशांती, गणेश पूजन किंवा श्री सत्यनारायण पूजेचे प्रमाणही अल्प आहे. मृत व्यक्तीचे बारावे-तेरावे मात्र एकाच दिवशी उरकण्यात येत असले तरी नातेवाईकांना टाळले जात आहे. मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत विधी उरकले जात आहेत. आरोग्य सुरक्षेमुळे विशेष काळजी घेण्यात येत आहे.

- अभय मुळ्ये, भटजी

पूजेला आले तरी मास्क

- पूजेला बसणारे यजमान व पूजा सांगणारे भटजी मास्क परिधान करत आहेत.

- मोजक्या चार ते पाच लोकांमध्ये पूजा उरकण्यात येत आहे. नमस्कारासाठी येणारी मंडळीही मास्क परिधान करून येतात.

- पूजेला बाहेरून आलेल्या व्यक्तीच्या हातावर आधी सॅनिटायझर दिले जात आहे.