शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

आधार, मोबाइल क्रमांक बँक खात्याशी संलग्न नसल्याने अनेक रिक्षा व्यावसायिक सानुग्रह अनुदानापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:35 IST

रत्नागिरी : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी १५ एप्रिलपासून राज्यभर लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले. या काळात हातावर पोट असलेल्या व्यक्तींचे ...

रत्नागिरी : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी १५ एप्रिलपासून राज्यभर लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले. या काळात हातावर पोट असलेल्या व्यक्तींचे व्यवसाय ठप्प झाले होते, अशांना शासनाने अनुदान जाहीर केले होते. यात रिक्षा व्यावसायिकांचा समावेश होता. त्यांना राज्य सरकारने पंधराशे रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले होते. त्यासाठी जिल्ह्यातील रिक्षा व्यावसायिकांनी अर्जही केले आहेत. परंतु बँक खाते क्रमांकाशी आधार कार्ड, मोबाइल क्रमांक लिंक केलेला नसल्याने जिल्ह्यातील निम्म्या रिक्षा व्यावसायिकांना मदत मिळण्यात विलंब होत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने १५ एप्रिलपासून लाॅकडाऊन सुरू केले. त्यामुळे छोट्यामोठ्या उद्योग-व्यवसायांना मोठा फटका बसला. वाहतूक व्यवसाय करणाऱ्यांना याचा सर्वाधिक त्रास झाला. लाॅकडाऊन शिथिल होत असले तरी रिक्षा व्यावसायिकांचा म्हणावा तसा व्यवसाय होताना दिसत नाही. त्यातही पेट्रोलचे दर ११० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. यामुळे संसाराचा रहाटगाडा हाकताना या चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

रिक्षा व्यावसायिकांच्या समस्या लक्षात घेऊन महाविकास आघाडी सरकारने रिक्षा व्यावसायिकांना १५०० रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया असून, अर्ज योग्य पद्धतीने भरल्यानंतर त्याला उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून मंजुरी दिली जाते व परवानाधारक रिक्षा व्यावसायिकाच्या खात्यामध्ये हे अनुदान जमा होते. परंतु काहींच्या बँक खात्याशी आधार आणि मोबाइल क्रमांक संलग्न नसल्याने त्यांचे अर्ज रद्द झाले आहेत. या त्रुटी दूर करून अर्ज पुन्हा अपडेट करता येणार आहेत.

............................

९६७ जणांच्या अर्जात त्रुटी

रत्नागिरी जिल्ह्यात १० हजार ९९२ रिक्षा आहेत. त्यातील ५ हजार २०८ जणांनी अनुदानासाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी ४ हजार २२० जणांचे अर्ज मंजूर झाले असून, यातील काहींच्या खात्यावर पैसेही जमा झाले आहेत. मात्र, ९६७ जणांचे अर्ज काही त्रुटीमुळे रद्द झाले आहेत. मात्र या त्रुटी सुधारून अर्ज पुन्हा अपडेट करता येणार आहेत. यातील २१ अर्ज हे कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत.

.........

अर्ज करताना अनेक अडचणी

सानुग्रह अनुदान देण्याची योजना शासनाने जाहीर केल्यानंतर कोरोना प्रादुर्भावामुळे ऑनलाइन अर्ज करणारी महा-ई सेवा केंद्रे बंद होती. त्यानंतर आता महापुराने थैमान घातल्याने ऑनलाइन अर्ज करण्यात पुन्हा अडथळे आले आहेत. सानुग्रह अनुदानासाठी राज्य सरकारने ठरावीक मुदत दिली नसल्याने रिक्षा व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, सानुग्रह अनुदान मिळण्यात अडचणी येत आहेत.