शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
6
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
7
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
8
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन फेका
9
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
10
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
11
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
12
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
13
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
14
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
15
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
16
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
17
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
18
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
19
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
20
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण

आंबा वाहतुकीसाठी लालपरी झाली सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : हापूस आंबा पेट्याच्या वाहतुकीसाठी राज्य परिवहन महामंडळाचा रत्नागिरी विभाग सज्ज झाला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : हापूस आंबा पेट्याच्या वाहतुकीसाठी राज्य परिवहन महामंडळाचा रत्नागिरी विभाग सज्ज झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी ३०, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी २० मालवाहू ट्रक पुरविण्यात येणार आहेत. दि. ५ एप्रिल ते दि. ३१ मे पर्यंत आंबा वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे.

कोरोनामुळे गतवर्षी लॉकडाऊनमुळे आंबा वाहतुकीसाठी समस्या उद्भवली असताना, रा. प. विभागाने तत्परता दाखविली होती. एस.टी.तून आंबा वाहतूक करण्यात आली होती. मुंबई उपनगरांसह अन्य जिल्ह्यातही आंबा एसटीतून पोहोचविण्यात आला होता. यावर्षीही एस.टी.ने निर्णय आंबा वाहतुकीचा निर्णय घेतला असून, त्यासाठी महामंडळाच्या मालवाहतूक गाड्याही सज्ज झाल्या आहेत.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकण भागातून मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, तसेच इतर जिल्ह्यांमध्ये एसटी गाड्यांद्वारे आंबा वाहतूक करण्यात येणार आहे. मुंबईतील मुंबई सेंट्रल किंवा परळ, कुर्ला नेहरू नगर, पनवेल, ठाण्यामध्ये ठाणे-१ किंवा ठाणे-२, भिवंडी, बोरिवली-सुकुरवाडी किंवा कल्याण, पुणे पिंपरी-चिंचवड यासह सांगली, सातारा, कोल्हापूरला आंबा पाठविता येणार आहे.

आंबापेटी वाहतुकीसाठी ३०० कि.मी.पासून ते १५०० कि.मी.पर्यंत पाच डझन आंब्याच्या पुठ्याच्या पेटीसाठी ४० रुपयांपासून १९० रुपयांर्यंत दर निश्चित करण्यात आले आहेत, तर लाकडी पेटीसाठी ५० रुपयांपासून २५० रुपयांपर्यंत दर आकारण्यात येणार आहेत. दोन डझन पेटीसाठी २५ पासून ११० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. बागायतदारांनी, शेतकऱ्यांनी जवळच्या आगारात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.