शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

आंबा विक्रीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:22 IST

रस्ता दुरुस्तीची मागणी रत्नागिरी : तालुक्यातील नेवरे गावातील ढोकमळे ते बाजारपेठ मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. खड्ड्यांतून पावसाचे ...

रस्ता दुरुस्तीची मागणी

रत्नागिरी : तालुक्यातील नेवरे गावातील ढोकमळे ते बाजारपेठ मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. खड्ड्यांतून पावसाचे पाणी साचले असल्याने वाहन चालविणे अवघड बनले आहे. खड्ड्यांतून वाहन चालविताना, पावसाचा अंदाज येत नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाल्याने रस्ता दुरुस्तीची मागणी होत आहे.

मोकाट जनावरांचा उपद्रव

रत्नागिरी : सागरी महामार्गावरील रत्नागिरी ते शिरगाव मार्गावर मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला आहे. रात्रीच्या वेळी गुरे कळपाने हिंडत आहेत. शिवाय रस्त्यातच ठाण मांडत असून, सकाळी रस्त्यावर शेणाचा सडा पडत असल्याने सकाळच्या सत्रात येणाऱ्या जाणाऱ्या पादचाऱ्यांसह वाहनचालकांनाही याचा त्रास होत आहे. परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त

रत्नागिरी : शहरातील कोकण नगर, आझाद नगर, नायाब नगर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वारंवार रस्ता दुरस्तीची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. रस्त्यावर खड्डे पडले असून, खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने अंदाज घेत नाही, परिणामी अपघाताचा धोका वाढला आहे.

शिक्षक भरती रखडली

रत्नागिरी : गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेली शिक्षक भरती कोरोनामुळे थांबली आहे. २०१७ पासून भरती सुरू झाली. भाजप सरकारनंतर आघाडी सरकारला भरती पूर्ण करता न आल्याने शासनविरोधी असंतोष निर्माण झाला आहे. भरती पूर्ण करण्याची मागणी शिक्षकांमधून होत आहे.

भात लागवडीची कामे सुरू

गणपतीपुळे : पंचक्रोशीमध्ये सध्या भात लागवडीची कामे सुरू झाली आहेत. भाताची रोपे काढून ती खाचरातून लावण्यात येत आहेत. सध्या नांगराऐवजी पॉवरटिलरचा वापर शेतकरी करू लागले आहेत. पावसाने विश्रांती घेतली असल्याने मळेशेतीमध्ये लागवड सुरू आहे.

गणेशमूर्ती शाळेत लगबग

रत्नागिरी : सध्या गणेशमूर्तीशाळेत गणेशमूर्ती रेखाटण्याचे काम जोरात सुरू आहे. मूर्तीशाळेतही सोशल डिस्टन्सिंग राखण्यात येत असून, बाहेरून कामाशिवाय येणाऱ्यांना मज्जाव करण्यात येत आहे. शासनाच्या नियमावलीनुसार एक ते तीन फूट उंचीपर्यंतच्याच गणेशमूर्ती तयार केल्या जात आहेत.

सिग्नल बंदच

रत्नागिरी : शहरातील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बसविण्यात आलेली सिग्नल यंत्रणा लॉकडाऊन पूर्वीपासूनच बंद आहे. बंद सिग्नलमुळे वाहनकोंडी वाढत आहे. परिणामी वाहनचालकांमध्ये वाद होत आहेत. नगरपरिषद प्रशासनाने सिग्नल यंत्रणा बसविली असून, त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

चंपक मैदानात दुर्गंधी

रत्नागिरी : शहरातील उद्यमनगर येथे येणाऱ्या चंपक मैदानात सर्व प्रकारचा कचरा टाकण्यात येत आहे. स्थानिक तसेच बाहेरच्या गावातील मंडळीदेखील गाड्यांतून आणून कचरा टाकत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. कचरा टाकू नये यासाठी ग्रामपंचायतीने सूचना फलक लावले असतानाही, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. कचऱ्यामुळे पसरणाऱ्या दुर्गंधीचा स्थानिक रहिवासी व पादचाऱ्यांना याचा त्रास होत आहे.

खड्डे बुजविण्याचे काम निकृष्ट

रत्नागिरी : शहरात लॉकडाऊनपूर्वी पाण्याच्या वाहिनीबरोबर खासगी वाहिनीसाठी ठिकठिकाणी खड्डे खोदण्यात आले. पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून, नगर परिषद प्रशासनाकडून खड्डे बुजविण्यात येत असून, काम अतिशय निकृष्ट असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.