शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

उष्मा वाढल्याने आंबा बागायतदार चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:29 IST

रत्नागिरी : गेल्या चार दिवसांत वाढलेला उष्मा असह्य झाला आहे. जिल्ह्याच्या तापमानाने उच्चांक गाठला आहे. अतिउष्म्यामुळे आंब्यावर काळे डाग ...

रत्नागिरी : गेल्या चार दिवसांत वाढलेला उष्मा असह्य झाला आहे. जिल्ह्याच्या तापमानाने उच्चांक गाठला आहे. अतिउष्म्यामुळे आंब्यावर काळे डाग पडू लागले असून फळांची गळही वाढली आहे. आधीच आंबा उत्पादन कमी असतानाच उष्म्यामुळे उरलेसुरले आंबा पीक धोक्यात आल्याने बागायतदार चिंतेत सापडले आहेत.

हवामानातील बदलामुळे यावर्षी आंबा उत्पादन कमी आहे. जेमतेम १० ते १५ टक्के आंबा असताना अवकाळी पावसामुळे पिकाचे नुकसान झाले. शिवाय, आता उच्चतम तापमान यामुळे पीक पुन्हा धोक्यात आले आहे. त्यामुळे फळपीक विमा योजनेंतर्गत बदलत्या तापमानाची नोंद घेत शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्याची आवश्यकता आहे.

यावर्षी पावसाळा लांबल्यामुळे पालवीचे प्रमाण सर्वाधिक होते. मात्र, ऑक्टोबरमध्ये आलेला मोहोराचे रक्षण जे शेतकरी करू शकले, त्यांचा आंबा फेब्रुवारी-मार्च महिन्यांत बाजारात आला. मात्र, फेब्रुवारीत झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे आंब्याचे नुकसान झाले. गारा पडून आंबा बाद झाला. फळावर काळे डाग पडले, काही ठिकाणी तो गळूनही गेला. त्यातच गेल्या चार दिवसांत उष्णतेची लाट कोकणात आली असल्याने त्याचा परिणाम आंब्यावर होऊ लागला आहे.

उष्मा वाढल्याने झाडांना पाणी देण्याची सूचना कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना केली जात असली, तरी डोंगराळ भागात पाणी वाहतूक करणे अशक्य असून खर्चही परवडेनासा झाला आहे. कातळावरील बागांना वाढत्या उष्म्याचा जास्त फटका बसत आहे. भाजलेला आंबा बाजारात चालत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. खत व्यवस्थापनापासून आंबा बाजारात येईपर्यंत प्रचंड खर्च करावा लागतो. मात्र, त्या तुलनेत दर उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना खर्च भरून काढणे अवघड बनले आहे.

............................

दरवर्षी आंबा पीक धोक्यात येत आहे. बदलत्या हवामानाचा पिकांवर होणारा परिणाम याबाबत कृषी विद्यापीठाकडून संशोधन होणे गरजेचे आहे. यावर्षी अवेळीचा पाऊस, गारपीट व आता वाढत्या उष्म्यामुळे आंबा पीक धोक्यात आले आहे. याबाबत विमा कंपनीकडून दखल घेणे गरजेचे असून, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींनीही पाठपुरावा करणे गरजेचे आहे.

- राजन कदम, बागायतदार, रत्नागिरी