शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
3
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
4
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
5
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
6
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
7
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
8
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
9
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
10
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
11
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
12
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
13
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
14
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
15
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
16
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
17
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
18
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
19
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
20
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?

उष्मा वाढल्याने आंबा बागायतदार चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:29 IST

रत्नागिरी : गेल्या चार दिवसांत वाढलेला उष्मा असह्य झाला आहे. जिल्ह्याच्या तापमानाने उच्चांक गाठला आहे. अतिउष्म्यामुळे आंब्यावर काळे डाग ...

रत्नागिरी : गेल्या चार दिवसांत वाढलेला उष्मा असह्य झाला आहे. जिल्ह्याच्या तापमानाने उच्चांक गाठला आहे. अतिउष्म्यामुळे आंब्यावर काळे डाग पडू लागले असून फळांची गळही वाढली आहे. आधीच आंबा उत्पादन कमी असतानाच उष्म्यामुळे उरलेसुरले आंबा पीक धोक्यात आल्याने बागायतदार चिंतेत सापडले आहेत.

हवामानातील बदलामुळे यावर्षी आंबा उत्पादन कमी आहे. जेमतेम १० ते १५ टक्के आंबा असताना अवकाळी पावसामुळे पिकाचे नुकसान झाले. शिवाय, आता उच्चतम तापमान यामुळे पीक पुन्हा धोक्यात आले आहे. त्यामुळे फळपीक विमा योजनेंतर्गत बदलत्या तापमानाची नोंद घेत शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्याची आवश्यकता आहे.

यावर्षी पावसाळा लांबल्यामुळे पालवीचे प्रमाण सर्वाधिक होते. मात्र, ऑक्टोबरमध्ये आलेला मोहोराचे रक्षण जे शेतकरी करू शकले, त्यांचा आंबा फेब्रुवारी-मार्च महिन्यांत बाजारात आला. मात्र, फेब्रुवारीत झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे आंब्याचे नुकसान झाले. गारा पडून आंबा बाद झाला. फळावर काळे डाग पडले, काही ठिकाणी तो गळूनही गेला. त्यातच गेल्या चार दिवसांत उष्णतेची लाट कोकणात आली असल्याने त्याचा परिणाम आंब्यावर होऊ लागला आहे.

उष्मा वाढल्याने झाडांना पाणी देण्याची सूचना कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना केली जात असली, तरी डोंगराळ भागात पाणी वाहतूक करणे अशक्य असून खर्चही परवडेनासा झाला आहे. कातळावरील बागांना वाढत्या उष्म्याचा जास्त फटका बसत आहे. भाजलेला आंबा बाजारात चालत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. खत व्यवस्थापनापासून आंबा बाजारात येईपर्यंत प्रचंड खर्च करावा लागतो. मात्र, त्या तुलनेत दर उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना खर्च भरून काढणे अवघड बनले आहे.

............................

दरवर्षी आंबा पीक धोक्यात येत आहे. बदलत्या हवामानाचा पिकांवर होणारा परिणाम याबाबत कृषी विद्यापीठाकडून संशोधन होणे गरजेचे आहे. यावर्षी अवेळीचा पाऊस, गारपीट व आता वाढत्या उष्म्यामुळे आंबा पीक धोक्यात आले आहे. याबाबत विमा कंपनीकडून दखल घेणे गरजेचे असून, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींनीही पाठपुरावा करणे गरजेचे आहे.

- राजन कदम, बागायतदार, रत्नागिरी