शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

पेरणीपासून लागवडीपर्यंत व्यवस्थापन आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:21 IST

मशागत जमिनीची दोन ते तीनवेळा उभी, आडवी नांगरणी करून जमीन भुसभुशीत करून घ्यावी. लावणीच्या दोन आठवड्यांपूर्वी दहा टन प्रति ...

मशागत

जमिनीची दोन ते तीनवेळा उभी, आडवी नांगरणी करून जमीन भुसभुशीत करून घ्यावी. लावणीच्या दोन आठवड्यांपूर्वी दहा टन प्रति हेक्टरी सेंद्रिय खत पसरवावे अथवा गिरीपुष्पाचा पाला दहा टन प्रति हेक्टर चिखलणीच्यावेळी जमिनीत गाडावा. अन्यथा भाताचा पेंढा सहा इंचपर्यंत जमिनीत गाडावा. भुगा करून टाकला तर लगेच कुजतो. पालापाचोळा, काडीकचरा जाळण्याऐवजी कंपोस्ट केलं तर उत्पादन चांगले मिळू शकते.

बीज प्रक्रिया

बियाण्याची जास्तीत जास्त उगवण होण्यासाठी जोमदार रोप निर्मितीबरोबर रोग नियंत्रणासाठी बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे. प्लास्टिक भांड्यात २ ते ३ टक्के मिठाचे द्रावण तयार करून त्यात भाताचे बियाणे ओतावे. हलके, पोचट, कीडग्रस्त व नंतर तळाशी राहिलेले जड बी स्वच्छ पाण्याने २-३ वेळा धुवावे आणि २४ तास उन्हात वाळवावे. बियाणे सुकल्यावर त्याला २ ग्रॅम थायरम किंवा इमिसान प्रतिकिलोप्रमाणे चोळावे.

तण नियंत्रण

खताचा पहिला हप्ता देण्यापूर्वी बेननी करावी आणि खत दिल्यावर कोळपणी करावी. याशिवाय तणनाशकाचाही वापर करता येऊ शकतो. लावणीनंतर २ ते ३ दिवसाचे आत तणनाशक, ब्युटाक्लोर ५० किलोग्रॅम किंवा ऑक्झॅडायरजील ६ ईसी हेक्टरी ०.१२० किलोग्रॅम १.५ किलो क्रियाशील घटक प्रतिहेक्टरी युरियामध्ये मिसळून शेतात पसरले तर तण नियंत्रण शक्य होते.

खत व्यवस्थापन

भात पिकाला प्रतिहेक्टरी १०० किलो ग्रॅम नत्र, ५० किलो ग्रॅम स्फुरद, ५० किलो ग्रॅम पालाश द्यावे. यापैकी ४० किलो ग्रॅम नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश चिखलणीवेळी द्यावे किंवा मिश्र खत १५:१५:१५ प्रति गुंठा ३.३५ किलो ग्रॅम द्यावे. ४० किलो ग्रॅम नत्र खताची दुसरी मात्रा फुटवे येण्यावेळी व २० किलो ग्रॅम खताची तिसरी मात्रा पीक फुलोऱ्यावर आल्यावर द्यावी. भात उत्पादन घेताना, एकूणच खत व्यवस्थापन महत्त्वपूर्ण आहे.

पाणी व्यवस्थापन

भात लावणीनंतर आठवडाभर रोपे चांगली मुळे धरेपर्यंत शेतात पाण्याची पातळी २ ते ५ सेंटीमीटर असावी. यानंतर दाणे पक्व होईपर्यंत पाण्याची पातळी ५ सेंटीमीटर ठेवावी. लोंबी येण्याच्या दहा दिवसांपूर्वी व नंतर खाचरात १० सेंटीमीटर पाण्याची पातळी आवश्यक आहे. पाण्याची कमतरता भासल्यास उत्पादनात घट येऊ शकते.