शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

प्रमुख रस्ते अडकले राजकीय संघर्षात

By admin | Updated: December 23, 2014 23:49 IST

खेड तालुका : दापोली, खाडीपट्टा भागातील रस्त्यांचीही झाली चाळण

खेड : तालुक्यातील प्रमुख मार्गावरील सर्वच रस्ते खड्ड्यात गेले आहेत. या खड्ड्यांमुळेच येथे कधीतरी रस्ते होते, याविषयी सांगणे कठीण झाले आहे. नव्याने डागडुजी करण्याची मागणी लोकप्रतिनिधींच्या कात्रीत अडकून राहिल्याने रस्त्यांची दुरवस्था पाहावेनाशी झाली आहे़ खेड तालुक्यातील हे रस्ते जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचे आहेत. या खड्ड्यांमुळे वाहने व प्रवासी यांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याची दुरूस्ती तेथील लोकप्रतिनिधींच्या हातात असून, त्यांनी दुर्लक्ष केल्यास या रस्त्यांची दुरूस्ती रखडते. मात्र, हे सारे गणित राजकीय साठमारीत अडकले आहे. येथे निवडणुकीतील गणिते मांडली जात आहेत. रस्त्यांच्या प्रस्तावाला लोकप्रतिनिधींकडून केराची टोपली दाखविली जाते़ या साऱ्या प्रकाराबाबत त्या त्या भागातील ग्रामस्थ कंटाळले आहेत. भरणे नाका ते आंबवली-वडगाव मार्गावरील रस्त्याची दुर्दशा झाली आहे. गेली काही वर्षे या रस्त्याच्या डागडुजीकरिता एकाही लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न करण्यात आले नाहीत़ सुमारे ४२ गावांतील जनतेसाठी हा मार्ग सोयीचा आहे. डोंगराळ भागातून जाणारा हा मार्ग दळणवळणाच्या दृष्टीने परिपूर्ण व्हावा, याकरिता आजवर एकानेही आपला आमदारकीचा निधी तसेच जिल्हा परिषदेचा निधी खर्ची पाडला नाही. खेड तालुक्यातील दोन प्रमुख रस्ते या भागातील गावांना जोडण्यात आले आहेत. १९६५ मध्ये हे रस्ते बांधण्यात आले होते. त्यांचे आयुर्मान संपले असल्याचे सागंण्यात येत असल्याने या रस्त्यांची डागडुजी करण्यासाठी पक्षीय अभिनिवेश बाजुला ठेवून दुरूस्ती करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. खेड तालुक्यातील बराचसा भाग सूर्यकांत दळवी व रामदास कदम यांच्या मतदारसंघात होता. मात्र, तेथील विकास ठप्प झाला आहे. या रस्त्याच्या डबघाईला दोन पक्षप्रमुखांमधील मतभेद कारणीभूत असल्याचे पुढे येत आहे. खाडीपट्टा, कर्जी, संगलट या परिसरातील रस्ते बिकट झाले आहेत. माजी मंत्री व आमदार भास्कर जाधव यांच्या मतदार संघातील रस्त्यांचीही अवस्था बिकट आहे. एक वर्षानंतर का होईना रस्ते डागडुजीकरिता जाधव यांनी लक्ष घातले आहे. आमदार संजय कदम व भास्कर जाधव या दोघांनाही याचा फायदा झाल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले. पंधरा गाव धामणंद विभागातील रस्तेही उखडले असून, जाधव यांनी या रस्त्याला आता चालना दिली आहे. खेड तालुक्यातील रस्ते सुधारण्याकडे आमदार जाधव यांनी लक्ष घातले आहे. संपूर्ण तालुक्याचा कायापालट झाल्यास पर्यटकांनाही या भागात येणे सोयीचे होईल, असे सांगण्यात आले. या परिसरात खेड तालुक्यातील अनेक गावे संजय कदम व भास्कर जाधव यांच्या मतदारसंघात येत आहेत. त्यामुळे दोन्ही आमदारांना यात लक्ष घालावे लागणार आहे. (प्रतिनिधी)