शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

महापुराला जबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:33 IST

चिपळूण : चिपळूणच्या महापुराला प्रशासन जबाबदार असून, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच चिपळूण नगर परिषदेचे ...

चिपळूण : चिपळूणच्या महापुराला प्रशासन जबाबदार असून, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी भाजप प्रदेश उपाध्यक्ष व आमदार प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच ज्या लोकांनी वीज निर्मितीचे पाणी सोडण्याचे पाप करून व्यापारी व नागरिकांचे नुकसान केले, ते महाजनको, महाजनरेशन या नुकसानाची जबाबदारी घेणार का, असा प्रश्नही त्यांनी विचारला. सात दिवसानंतरही पूरग्रस्तांना मदत मिळाली नसल्याबद्दलही त्यांनी कडाडून टीका केली.

महापुरामुळे चिपळूणवासीयांचे जनजीवनच उद्ध्वस्त झाले असून, या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी भाजप प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड हे गुरुवारी चिपळूण दौऱ्यावर आले होते. यावेळी कापसाळ येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, महापूर ओसरल्यानंतर भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चिपळुणात मदतकार्याला जोरात सुरुवात केली आहे. आम्हीही पूरग्रस्तांसाठी मदत आणली आहे. याकरिता भारतीय युवा मोर्चा मुंबई अध्यक्षांनी मोलाचे सहकार्य केले आहे.

चिपळूणमध्ये पाणी का भरले, याचा आतापर्यंत कोणीही उहापोह केलेला नाही. आपला असं म्हणणं आहे की, वीज निर्मितीनंतर पाणी सोडले जाते, त्यावेळी नदीच्या ओघाने आणि भरतीच्या वेळी चिपळूण शहरात पाणी भरते. सर्वसामान्य एस. टी. चालकाने बस पाण्यातून चालवली, तर त्या चालकाचे निलंबन केले जाते. परंतु, ज्या लोकांनी वीज निर्मितीचे पाणी सोडण्याचा पाप केले, ज्यामुळे साडेचार हजार व्यापारी, २० हजार नागरिक, शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, या नुकसानाची जबाबदारी महाजनको, महाजनरेशन घेणार का? असा प्रश्न त्यांनी केला. याविषयी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार असल्याचेही ते म्हणाले.

................

पूरग्रस्तांना तत्काळ मदत द्यावी

चिपळूणच्या पूरग्रस्त व्यापाऱ्यांना तत्काळ १ लाख रुपये तर ज्यांच्या घरात पाणी गेले आहे, त्या पूरग्रस्तांना ५० हजार रुपये कोणतेही पंचनामे न करता द्यावेत, अशी आमची शासनाकडे मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

...................

एकनाथ शिंदेंच्या वक्तव्याचा निषेध

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची टीव्हीवर बातमी पाहिली. ते म्हणतात की, पंचनामे अजून झालेले नसल्यामुळे मदतीचा निर्णय घेतलेला नाही. या वक्तव्याचा आपण निषेध करतो. पंचनामे होण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सांगली, कोल्हापूरमधील पूरग्रस्तांना तत्काळ ५० हजार रुपयांची मदत केली होती. तशीच मदत चिपळूणसह महाड, सांगली, कोल्हापूरमधील पूरग्रस्तांना द्यावी, अशी आपली मागणी असल्याचे आमदार लाड यांनी सांगितले.

चाैकट

महापुराचा पर्यटन दौरा होऊ नये

कोणत्याही पुराचा पर्यटन दौरा होऊ नये. याठिकाणी येताना मदतीचा ओघ आणावा म्हणजे चिपळूणवासीयांना दिलासा मिळेल, अशा शब्दात सेनेच्या लोकप्रतिनिधींच्या सातत्याने होत असलेल्या दौऱ्यांबाबत लाड यांनी टीका केली.