शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
11
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
12
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
13
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
14
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
15
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
16
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
17
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
18
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
19
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
20
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...

महापुराला जबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:33 IST

चिपळूण : चिपळूणच्या महापुराला प्रशासन जबाबदार असून, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच चिपळूण नगर परिषदेचे ...

चिपळूण : चिपळूणच्या महापुराला प्रशासन जबाबदार असून, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी भाजप प्रदेश उपाध्यक्ष व आमदार प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच ज्या लोकांनी वीज निर्मितीचे पाणी सोडण्याचे पाप करून व्यापारी व नागरिकांचे नुकसान केले, ते महाजनको, महाजनरेशन या नुकसानाची जबाबदारी घेणार का, असा प्रश्नही त्यांनी विचारला. सात दिवसानंतरही पूरग्रस्तांना मदत मिळाली नसल्याबद्दलही त्यांनी कडाडून टीका केली.

महापुरामुळे चिपळूणवासीयांचे जनजीवनच उद्ध्वस्त झाले असून, या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी भाजप प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड हे गुरुवारी चिपळूण दौऱ्यावर आले होते. यावेळी कापसाळ येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, महापूर ओसरल्यानंतर भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चिपळुणात मदतकार्याला जोरात सुरुवात केली आहे. आम्हीही पूरग्रस्तांसाठी मदत आणली आहे. याकरिता भारतीय युवा मोर्चा मुंबई अध्यक्षांनी मोलाचे सहकार्य केले आहे.

चिपळूणमध्ये पाणी का भरले, याचा आतापर्यंत कोणीही उहापोह केलेला नाही. आपला असं म्हणणं आहे की, वीज निर्मितीनंतर पाणी सोडले जाते, त्यावेळी नदीच्या ओघाने आणि भरतीच्या वेळी चिपळूण शहरात पाणी भरते. सर्वसामान्य एस. टी. चालकाने बस पाण्यातून चालवली, तर त्या चालकाचे निलंबन केले जाते. परंतु, ज्या लोकांनी वीज निर्मितीचे पाणी सोडण्याचा पाप केले, ज्यामुळे साडेचार हजार व्यापारी, २० हजार नागरिक, शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, या नुकसानाची जबाबदारी महाजनको, महाजनरेशन घेणार का? असा प्रश्न त्यांनी केला. याविषयी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार असल्याचेही ते म्हणाले.

................

पूरग्रस्तांना तत्काळ मदत द्यावी

चिपळूणच्या पूरग्रस्त व्यापाऱ्यांना तत्काळ १ लाख रुपये तर ज्यांच्या घरात पाणी गेले आहे, त्या पूरग्रस्तांना ५० हजार रुपये कोणतेही पंचनामे न करता द्यावेत, अशी आमची शासनाकडे मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

...................

एकनाथ शिंदेंच्या वक्तव्याचा निषेध

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची टीव्हीवर बातमी पाहिली. ते म्हणतात की, पंचनामे अजून झालेले नसल्यामुळे मदतीचा निर्णय घेतलेला नाही. या वक्तव्याचा आपण निषेध करतो. पंचनामे होण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सांगली, कोल्हापूरमधील पूरग्रस्तांना तत्काळ ५० हजार रुपयांची मदत केली होती. तशीच मदत चिपळूणसह महाड, सांगली, कोल्हापूरमधील पूरग्रस्तांना द्यावी, अशी आपली मागणी असल्याचे आमदार लाड यांनी सांगितले.

चाैकट

महापुराचा पर्यटन दौरा होऊ नये

कोणत्याही पुराचा पर्यटन दौरा होऊ नये. याठिकाणी येताना मदतीचा ओघ आणावा म्हणजे चिपळूणवासीयांना दिलासा मिळेल, अशा शब्दात सेनेच्या लोकप्रतिनिधींच्या सातत्याने होत असलेल्या दौऱ्यांबाबत लाड यांनी टीका केली.