शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

महापुराला जबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:33 IST

चिपळूण : चिपळूणच्या महापुराला प्रशासन जबाबदार असून, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच चिपळूण नगर परिषदेचे ...

चिपळूण : चिपळूणच्या महापुराला प्रशासन जबाबदार असून, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी भाजप प्रदेश उपाध्यक्ष व आमदार प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच ज्या लोकांनी वीज निर्मितीचे पाणी सोडण्याचे पाप करून व्यापारी व नागरिकांचे नुकसान केले, ते महाजनको, महाजनरेशन या नुकसानाची जबाबदारी घेणार का, असा प्रश्नही त्यांनी विचारला. सात दिवसानंतरही पूरग्रस्तांना मदत मिळाली नसल्याबद्दलही त्यांनी कडाडून टीका केली.

महापुरामुळे चिपळूणवासीयांचे जनजीवनच उद्ध्वस्त झाले असून, या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी भाजप प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड हे गुरुवारी चिपळूण दौऱ्यावर आले होते. यावेळी कापसाळ येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, महापूर ओसरल्यानंतर भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चिपळुणात मदतकार्याला जोरात सुरुवात केली आहे. आम्हीही पूरग्रस्तांसाठी मदत आणली आहे. याकरिता भारतीय युवा मोर्चा मुंबई अध्यक्षांनी मोलाचे सहकार्य केले आहे.

चिपळूणमध्ये पाणी का भरले, याचा आतापर्यंत कोणीही उहापोह केलेला नाही. आपला असं म्हणणं आहे की, वीज निर्मितीनंतर पाणी सोडले जाते, त्यावेळी नदीच्या ओघाने आणि भरतीच्या वेळी चिपळूण शहरात पाणी भरते. सर्वसामान्य एस. टी. चालकाने बस पाण्यातून चालवली, तर त्या चालकाचे निलंबन केले जाते. परंतु, ज्या लोकांनी वीज निर्मितीचे पाणी सोडण्याचा पाप केले, ज्यामुळे साडेचार हजार व्यापारी, २० हजार नागरिक, शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, या नुकसानाची जबाबदारी महाजनको, महाजनरेशन घेणार का? असा प्रश्न त्यांनी केला. याविषयी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार असल्याचेही ते म्हणाले.

................

पूरग्रस्तांना तत्काळ मदत द्यावी

चिपळूणच्या पूरग्रस्त व्यापाऱ्यांना तत्काळ १ लाख रुपये तर ज्यांच्या घरात पाणी गेले आहे, त्या पूरग्रस्तांना ५० हजार रुपये कोणतेही पंचनामे न करता द्यावेत, अशी आमची शासनाकडे मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

...................

एकनाथ शिंदेंच्या वक्तव्याचा निषेध

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची टीव्हीवर बातमी पाहिली. ते म्हणतात की, पंचनामे अजून झालेले नसल्यामुळे मदतीचा निर्णय घेतलेला नाही. या वक्तव्याचा आपण निषेध करतो. पंचनामे होण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सांगली, कोल्हापूरमधील पूरग्रस्तांना तत्काळ ५० हजार रुपयांची मदत केली होती. तशीच मदत चिपळूणसह महाड, सांगली, कोल्हापूरमधील पूरग्रस्तांना द्यावी, अशी आपली मागणी असल्याचे आमदार लाड यांनी सांगितले.

चाैकट

महापुराचा पर्यटन दौरा होऊ नये

कोणत्याही पुराचा पर्यटन दौरा होऊ नये. याठिकाणी येताना मदतीचा ओघ आणावा म्हणजे चिपळूणवासीयांना दिलासा मिळेल, अशा शब्दात सेनेच्या लोकप्रतिनिधींच्या सातत्याने होत असलेल्या दौऱ्यांबाबत लाड यांनी टीका केली.