शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
3
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
4
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
5
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
6
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
7
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
8
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
9
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
10
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
11
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
12
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
13
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
14
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
15
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
16
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
17
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
18
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
19
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
20
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कमळ उमलतंय, पण...

By admin | Updated: October 20, 2014 22:30 IST

आशेचा अंकुर फुटू लागला आहे.

विहार तेंडुलकर -रत्नागिरी -विधानसभा निवडणुकीत आघाडी आणि युती तुटल्याने सर्वच पक्षांना स्वत:च्या ताकदीवर लढावे लागले. यामध्ये भाजप हा जिल्ह्यातील तिसरा पक्ष ठरला आहे. पाचपैकी दोन जागा जिंकल्याने राष्ट्रवादी नंबर दोनचा पक्ष ठरला आहे. असे असले तरी भाजपची ताकद मात्र चांगलीच वाढल्याचे दिसून येते. भविष्यात राज्य सरकारची कामगिरी चांगली राहिल्यास या ताकदीला आणखी बळकटी मिळू शकते. त्यामुळे भाजपचा सर्वच ठिकाणी पराभव झाला असला तरी आशेचा अंकुर फुटू लागला आहे.राज्यस्तरावर शिवसेना-भाजपची युती असल्याने जिल्ह्यात नेमकी भाजपची ताकद किती, हे स्पष्ट होत नव्हते. आजपर्यंत दोन्ही पक्ष कोणत्याही निवडणुकीत स्वतंत्रपणे न लढल्याने या ताकदीचा अंदाजही येत नव्हता. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची प्रतिमा सुधारून या पक्षाला चांगले दिवस आल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर संपूर्ण राज्यात भाजपला आलेली मरगळ कमी झाली आणि कार्यकर्ते उत्साहाने कामाला लागले. मात्र, त्याच्या उलट परिणाम रत्नागिरीत झालेला दिसून येतो.जिल्ह्यात भाजपची असलेली ताकद ही दुर्लक्षून चालणारी नाही. मात्र, रत्नागिरी आणि गुहागरवगळता जिल्ह्यातील अन्य मतदारसंघात भाजप खूपच कमजोर असल्याचे दिसून येते. त्याठिकाणी भाजपने म्हणावी तेवढी मते घेतलेली नाहीत. रत्नागिरीत हमखास विजयासाठी भाजपचा हुकमी एक्का असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा घेण्यात आली. मात्र, तरीही भाजपची ताकद म्हणावी तेवढी वाढलेली दिसून आली नाही. त्याला अनेक कारणेही आहेत.सन २००९मध्ये झालेल्या मतदारसंघांच्या फेररचनेत जिल्ह्यातील सातचे पाच मतदारसंघ करण्यात आले. त्यामध्ये संगमेश्वर आणि खेड मतदारसंघांची नावे पुसली गेली. खेडमधून शिवसेनेच्या रामदास कदम यांचे पुनर्वसन कोठे करावे? असा प्रश्न निर्माण झाला आणि त्यांना गुहागर हा पारंपरिक भाजपचा मतदारसंघ बहाल करण्यात आला. त्यावेळी नाराज झालेले भाजपचे तत्कालीन आमदार विनय नातू यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून अर्ज भरला. त्यामुळे युतीची मते विभागली आणि रामदास कदम यांना पराभव पत्करावा लागला. या जुन्या राजकारणाचा प्रभाव याही निवडणुकीत दिसून आला.युती असताना जुन्या मतदारसंघाप्रमाणे भाजपकडे दोन, तर शिवसेनेकडे पाच, तर नव्या मतदारसंघ रचनेप्रमाणे शिवसेनेकडे चार, तर भाजपकडे दोन असे जागा वाटप होते. त्यामुळे जी जागा ज्या पक्षाच्या वाट्याला होती, त्याचठिकाणी तेथील कार्यकर्ते स्वत:चा पक्ष वाढवण्यासाठी झटताना दिसत होते. त्यामुळे याही विधानसभा निवडणुकीत पाहिले तर रत्नागिरी आणि गुहागर मतदारसंघ वगळता अन्यत्र भाजपची मते ही खूपच कमी झालेली आहेत. कारण प्रत्येक ठिकाणी युती आहे, हे गृहीत धरूनच भाजपने पक्षाचा विस्तार केला. आता आयत्यावेळी शिवसेनेशी असलेली युती तुटल्यानंतर स्थानिक भाजपा उमेदवारांवर डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे. विजयासाठी शिवसेनेच्या मतांवर अवलंबून असलेले भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वतंत्र अस्तित्व निर्माण न केल्याने भाजपवर या निवडणुकीत नामुष्की आली. तरीही भाजपची ताकद दुर्लक्ष करण्याएवढी नक्कीच कमी नाही. कारण दापोली, रत्नागिरी, गुहागर या मतदारसंघात भाजपने अपेक्षेपेक्षा जास्तच मते घेतली आहेत आणि विशेष म्हणजे शिवसेनेसाठी भाजपच्या पक्षवाढीची ही धोक्याची घंटा होऊ शकते, हेही सत्य निवडणुकीत दिसून आले. मात्र, स्वबळाची भाषा करणाऱ्या भाजपला पक्षवाढीसाठी अजून खूप काम करावे लागणार आहे, ही शिकवण या निवडणुकीतून भाजपला मिळालेय, एवढं नक्की!