शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कमळ उमलतंय, पण...

By admin | Updated: October 20, 2014 22:30 IST

आशेचा अंकुर फुटू लागला आहे.

विहार तेंडुलकर -रत्नागिरी -विधानसभा निवडणुकीत आघाडी आणि युती तुटल्याने सर्वच पक्षांना स्वत:च्या ताकदीवर लढावे लागले. यामध्ये भाजप हा जिल्ह्यातील तिसरा पक्ष ठरला आहे. पाचपैकी दोन जागा जिंकल्याने राष्ट्रवादी नंबर दोनचा पक्ष ठरला आहे. असे असले तरी भाजपची ताकद मात्र चांगलीच वाढल्याचे दिसून येते. भविष्यात राज्य सरकारची कामगिरी चांगली राहिल्यास या ताकदीला आणखी बळकटी मिळू शकते. त्यामुळे भाजपचा सर्वच ठिकाणी पराभव झाला असला तरी आशेचा अंकुर फुटू लागला आहे.राज्यस्तरावर शिवसेना-भाजपची युती असल्याने जिल्ह्यात नेमकी भाजपची ताकद किती, हे स्पष्ट होत नव्हते. आजपर्यंत दोन्ही पक्ष कोणत्याही निवडणुकीत स्वतंत्रपणे न लढल्याने या ताकदीचा अंदाजही येत नव्हता. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची प्रतिमा सुधारून या पक्षाला चांगले दिवस आल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर संपूर्ण राज्यात भाजपला आलेली मरगळ कमी झाली आणि कार्यकर्ते उत्साहाने कामाला लागले. मात्र, त्याच्या उलट परिणाम रत्नागिरीत झालेला दिसून येतो.जिल्ह्यात भाजपची असलेली ताकद ही दुर्लक्षून चालणारी नाही. मात्र, रत्नागिरी आणि गुहागरवगळता जिल्ह्यातील अन्य मतदारसंघात भाजप खूपच कमजोर असल्याचे दिसून येते. त्याठिकाणी भाजपने म्हणावी तेवढी मते घेतलेली नाहीत. रत्नागिरीत हमखास विजयासाठी भाजपचा हुकमी एक्का असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा घेण्यात आली. मात्र, तरीही भाजपची ताकद म्हणावी तेवढी वाढलेली दिसून आली नाही. त्याला अनेक कारणेही आहेत.सन २००९मध्ये झालेल्या मतदारसंघांच्या फेररचनेत जिल्ह्यातील सातचे पाच मतदारसंघ करण्यात आले. त्यामध्ये संगमेश्वर आणि खेड मतदारसंघांची नावे पुसली गेली. खेडमधून शिवसेनेच्या रामदास कदम यांचे पुनर्वसन कोठे करावे? असा प्रश्न निर्माण झाला आणि त्यांना गुहागर हा पारंपरिक भाजपचा मतदारसंघ बहाल करण्यात आला. त्यावेळी नाराज झालेले भाजपचे तत्कालीन आमदार विनय नातू यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून अर्ज भरला. त्यामुळे युतीची मते विभागली आणि रामदास कदम यांना पराभव पत्करावा लागला. या जुन्या राजकारणाचा प्रभाव याही निवडणुकीत दिसून आला.युती असताना जुन्या मतदारसंघाप्रमाणे भाजपकडे दोन, तर शिवसेनेकडे पाच, तर नव्या मतदारसंघ रचनेप्रमाणे शिवसेनेकडे चार, तर भाजपकडे दोन असे जागा वाटप होते. त्यामुळे जी जागा ज्या पक्षाच्या वाट्याला होती, त्याचठिकाणी तेथील कार्यकर्ते स्वत:चा पक्ष वाढवण्यासाठी झटताना दिसत होते. त्यामुळे याही विधानसभा निवडणुकीत पाहिले तर रत्नागिरी आणि गुहागर मतदारसंघ वगळता अन्यत्र भाजपची मते ही खूपच कमी झालेली आहेत. कारण प्रत्येक ठिकाणी युती आहे, हे गृहीत धरूनच भाजपने पक्षाचा विस्तार केला. आता आयत्यावेळी शिवसेनेशी असलेली युती तुटल्यानंतर स्थानिक भाजपा उमेदवारांवर डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे. विजयासाठी शिवसेनेच्या मतांवर अवलंबून असलेले भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वतंत्र अस्तित्व निर्माण न केल्याने भाजपवर या निवडणुकीत नामुष्की आली. तरीही भाजपची ताकद दुर्लक्ष करण्याएवढी नक्कीच कमी नाही. कारण दापोली, रत्नागिरी, गुहागर या मतदारसंघात भाजपने अपेक्षेपेक्षा जास्तच मते घेतली आहेत आणि विशेष म्हणजे शिवसेनेसाठी भाजपच्या पक्षवाढीची ही धोक्याची घंटा होऊ शकते, हेही सत्य निवडणुकीत दिसून आले. मात्र, स्वबळाची भाषा करणाऱ्या भाजपला पक्षवाढीसाठी अजून खूप काम करावे लागणार आहे, ही शिकवण या निवडणुकीतून भाजपला मिळालेय, एवढं नक्की!