शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

लोटे परिसर खरंच सुरक्षित आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आवाशी : लोटे परशुराम (ता. खेड) औद्योगिक वसाहतीत दोन महिन्यात घडलेल्या लागोपाठच्या चार घटनांनी वसाहतीच्या सुरक्षिततेचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

आवाशी : लोटे परशुराम (ता. खेड) औद्योगिक वसाहतीत दोन महिन्यात घडलेल्या लागोपाठच्या चार घटनांनी वसाहतीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या अपघातांमध्ये होणारी मनुष्यहानी, त्यामुळे परिसरातील लोकांच्या डोक्यावर असलेली टांगती तलवार आणि नुकताच घरडा कंपनीत झालेला स्फोट यामुळे लोटे खरंच सुरक्षित आहे का, हा प्रश्न लोकांच्या मनात पुन्हा येऊ लागला आहे.

साधारणपणे १९८६ / ८७ च्या दरम्यान लोटे परशुरामच्या मोकळ्या माळावर लोटे औद्योगिक वसाहतीची सुरुवात झाली. काही मोजकेच कारखाने वगळता अन्य परिसर मोकळा होता. मात्र, येथील हवा, पाणी, जमिनीचा अभ्यास करून येथे हळूहळू एक एक कारखाना येऊ लागला. संपूर्ण रासायनिक कारखानदारी असलेली वसाहत म्हणून लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीची ओळख राज्यभर झाली. रासायनिक कारखानदारीमुळे साहजिकच येथे छोटे मोठे अपघात घडू लागले.

या वसाहतीमधील बहुतांश कंपन्यांमध्ये छोटे मोठे अपघात झाले. कधी या अपघातांचे स्फोटात रुपांतर झाले, तर कधी आग लागण्यात. या प्रकारांमध्ये अनेकांनी जीव गमावला आहे. नुकत्याच घरडा कंपनीत झालेल्या स्फोटामध्ये पाचजणांचा होरपळून मृत्यू झाला. घरडा कंपनीत याआधीही १९८९, १९९४ या कालावधीत स्फोट घडले होते. त्यातही काही कामगारांचा बळी गेला आहे.

स्फोट व बळींचा विचार करता केवळ घरडा कंपनीच नाही तर एक्सेल, सुप्रिया लाईफ सायन्सेस, श्रेयस इंटरमिडीएटस् विनती, रिव्हरसाईड, पेन्टोकी, पुष्कर, हिंदुस्थान युनिलिव्हर व अन्य काही कंपन्यांमध्येही असे प्रकार घडले आहेत. २६ जानेवारी २००९ रोजी येथील एक्सेल कंपनीत झालेल्या स्फोटात तिघांचा बळी गेला होता. सुप्रिया कंपनीतही असे अपघात घडून काहींनी आपला जीव गमावला आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीत टाकीत पडून चिटणीस नामक कामगाराचा बळी गेला आहे, तर पेन्टोकी कंपनीत कोळच्या बॉयलरमधील पट्ट्यात अडकून एका आदिवासी कामगाराचा मृत्यू झाला आहे. याच कंपनीत मान्सून शेडवर काम करताना गुणदे येथील एका स्थानिक कामगाराचा बळी गेला आहे. पुष्कर, श्रेयस, स्नेहलता, सहस्र केमिकल्स, रिव्हरसाईड या कंपन्यांमधूनही असे प्रकार घडले आहेत.

झालेल्या दुर्घटना हे जरी ‘अपघात’ असले तरी त्यातून झालेले नुकसान खूप मोठे आहे. अनेक कुटुंबांचे कधीही भरुन न येणारे नुकसान झाले आहे. या अशा अपघातांमुळेच लोटे परिसराच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर येत आहे.