शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

लोटे परिसर खरंच सुरक्षित आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आवाशी : लोटे परशुराम (ता. खेड) औद्योगिक वसाहतीत दोन महिन्यात घडलेल्या लागोपाठच्या चार घटनांनी वसाहतीच्या सुरक्षिततेचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

आवाशी : लोटे परशुराम (ता. खेड) औद्योगिक वसाहतीत दोन महिन्यात घडलेल्या लागोपाठच्या चार घटनांनी वसाहतीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या अपघातांमध्ये होणारी मनुष्यहानी, त्यामुळे परिसरातील लोकांच्या डोक्यावर असलेली टांगती तलवार आणि नुकताच घरडा कंपनीत झालेला स्फोट यामुळे लोटे खरंच सुरक्षित आहे का, हा प्रश्न लोकांच्या मनात पुन्हा येऊ लागला आहे.

साधारणपणे १९८६ / ८७ च्या दरम्यान लोटे परशुरामच्या मोकळ्या माळावर लोटे औद्योगिक वसाहतीची सुरुवात झाली. काही मोजकेच कारखाने वगळता अन्य परिसर मोकळा होता. मात्र, येथील हवा, पाणी, जमिनीचा अभ्यास करून येथे हळूहळू एक एक कारखाना येऊ लागला. संपूर्ण रासायनिक कारखानदारी असलेली वसाहत म्हणून लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीची ओळख राज्यभर झाली. रासायनिक कारखानदारीमुळे साहजिकच येथे छोटे मोठे अपघात घडू लागले.

या वसाहतीमधील बहुतांश कंपन्यांमध्ये छोटे मोठे अपघात झाले. कधी या अपघातांचे स्फोटात रुपांतर झाले, तर कधी आग लागण्यात. या प्रकारांमध्ये अनेकांनी जीव गमावला आहे. नुकत्याच घरडा कंपनीत झालेल्या स्फोटामध्ये पाचजणांचा होरपळून मृत्यू झाला. घरडा कंपनीत याआधीही १९८९, १९९४ या कालावधीत स्फोट घडले होते. त्यातही काही कामगारांचा बळी गेला आहे.

स्फोट व बळींचा विचार करता केवळ घरडा कंपनीच नाही तर एक्सेल, सुप्रिया लाईफ सायन्सेस, श्रेयस इंटरमिडीएटस् विनती, रिव्हरसाईड, पेन्टोकी, पुष्कर, हिंदुस्थान युनिलिव्हर व अन्य काही कंपन्यांमध्येही असे प्रकार घडले आहेत. २६ जानेवारी २००९ रोजी येथील एक्सेल कंपनीत झालेल्या स्फोटात तिघांचा बळी गेला होता. सुप्रिया कंपनीतही असे अपघात घडून काहींनी आपला जीव गमावला आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीत टाकीत पडून चिटणीस नामक कामगाराचा बळी गेला आहे, तर पेन्टोकी कंपनीत कोळच्या बॉयलरमधील पट्ट्यात अडकून एका आदिवासी कामगाराचा मृत्यू झाला आहे. याच कंपनीत मान्सून शेडवर काम करताना गुणदे येथील एका स्थानिक कामगाराचा बळी गेला आहे. पुष्कर, श्रेयस, स्नेहलता, सहस्र केमिकल्स, रिव्हरसाईड या कंपन्यांमधूनही असे प्रकार घडले आहेत.

झालेल्या दुर्घटना हे जरी ‘अपघात’ असले तरी त्यातून झालेले नुकसान खूप मोठे आहे. अनेक कुटुंबांचे कधीही भरुन न येणारे नुकसान झाले आहे. या अशा अपघातांमुळेच लोटे परिसराच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर येत आहे.