शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

लोटे परिसर खरंच सुरक्षित आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आवाशी : लोटे परशुराम (ता. खेड) औद्योगिक वसाहतीत दोन महिन्यात घडलेल्या लागोपाठच्या चार घटनांनी वसाहतीच्या सुरक्षिततेचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

आवाशी : लोटे परशुराम (ता. खेड) औद्योगिक वसाहतीत दोन महिन्यात घडलेल्या लागोपाठच्या चार घटनांनी वसाहतीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या अपघातांमध्ये होणारी मनुष्यहानी, त्यामुळे परिसरातील लोकांच्या डोक्यावर असलेली टांगती तलवार आणि नुकताच घरडा कंपनीत झालेला स्फोट यामुळे लोटे खरंच सुरक्षित आहे का, हा प्रश्न लोकांच्या मनात पुन्हा येऊ लागला आहे.

साधारणपणे १९८६ / ८७ च्या दरम्यान लोटे परशुरामच्या मोकळ्या माळावर लोटे औद्योगिक वसाहतीची सुरुवात झाली. काही मोजकेच कारखाने वगळता अन्य परिसर मोकळा होता. मात्र, येथील हवा, पाणी, जमिनीचा अभ्यास करून येथे हळूहळू एक एक कारखाना येऊ लागला. संपूर्ण रासायनिक कारखानदारी असलेली वसाहत म्हणून लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीची ओळख राज्यभर झाली. रासायनिक कारखानदारीमुळे साहजिकच येथे छोटे मोठे अपघात घडू लागले.

या वसाहतीमधील बहुतांश कंपन्यांमध्ये छोटे मोठे अपघात झाले. कधी या अपघातांचे स्फोटात रुपांतर झाले, तर कधी आग लागण्यात. या प्रकारांमध्ये अनेकांनी जीव गमावला आहे. नुकत्याच घरडा कंपनीत झालेल्या स्फोटामध्ये पाचजणांचा होरपळून मृत्यू झाला. घरडा कंपनीत याआधीही १९८९, १९९४ या कालावधीत स्फोट घडले होते. त्यातही काही कामगारांचा बळी गेला आहे.

स्फोट व बळींचा विचार करता केवळ घरडा कंपनीच नाही तर एक्सेल, सुप्रिया लाईफ सायन्सेस, श्रेयस इंटरमिडीएटस् विनती, रिव्हरसाईड, पेन्टोकी, पुष्कर, हिंदुस्थान युनिलिव्हर व अन्य काही कंपन्यांमध्येही असे प्रकार घडले आहेत. २६ जानेवारी २००९ रोजी येथील एक्सेल कंपनीत झालेल्या स्फोटात तिघांचा बळी गेला होता. सुप्रिया कंपनीतही असे अपघात घडून काहींनी आपला जीव गमावला आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीत टाकीत पडून चिटणीस नामक कामगाराचा बळी गेला आहे, तर पेन्टोकी कंपनीत कोळच्या बॉयलरमधील पट्ट्यात अडकून एका आदिवासी कामगाराचा मृत्यू झाला आहे. याच कंपनीत मान्सून शेडवर काम करताना गुणदे येथील एका स्थानिक कामगाराचा बळी गेला आहे. पुष्कर, श्रेयस, स्नेहलता, सहस्र केमिकल्स, रिव्हरसाईड या कंपन्यांमधूनही असे प्रकार घडले आहेत.

झालेल्या दुर्घटना हे जरी ‘अपघात’ असले तरी त्यातून झालेले नुकसान खूप मोठे आहे. अनेक कुटुंबांचे कधीही भरुन न येणारे नुकसान झाले आहे. या अशा अपघातांमुळेच लोटे परिसराच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर येत आहे.