शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
3
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
4
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
5
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
6
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
7
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
8
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
9
Suzuki ने लॉन्च केले Access चे CNG व्हेरिएंट; जाणून घ्या मायलेज अन् किंमत...
10
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
11
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
12
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
13
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
14
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
15
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
16
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
17
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
18
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
19
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
20
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?

लोटे परिसर खरंच सुरक्षित आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आवाशी : लोटे परशुराम (ता. खेड) औद्योगिक वसाहतीत दोन महिन्यात घडलेल्या लागोपाठच्या चार घटनांनी वसाहतीच्या सुरक्षिततेचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

आवाशी : लोटे परशुराम (ता. खेड) औद्योगिक वसाहतीत दोन महिन्यात घडलेल्या लागोपाठच्या चार घटनांनी वसाहतीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या अपघातांमध्ये होणारी मनुष्यहानी, त्यामुळे परिसरातील लोकांच्या डोक्यावर असलेली टांगती तलवार आणि नुकताच घरडा कंपनीत झालेला स्फोट यामुळे लोटे खरंच सुरक्षित आहे का, हा प्रश्न लोकांच्या मनात पुन्हा येऊ लागला आहे.

साधारणपणे १९८६ / ८७ च्या दरम्यान लोटे परशुरामच्या मोकळ्या माळावर लोटे औद्योगिक वसाहतीची सुरुवात झाली. काही मोजकेच कारखाने वगळता अन्य परिसर मोकळा होता. मात्र, येथील हवा, पाणी, जमिनीचा अभ्यास करून येथे हळूहळू एक एक कारखाना येऊ लागला. संपूर्ण रासायनिक कारखानदारी असलेली वसाहत म्हणून लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीची ओळख राज्यभर झाली. रासायनिक कारखानदारीमुळे साहजिकच येथे छोटे मोठे अपघात घडू लागले.

या वसाहतीमधील बहुतांश कंपन्यांमध्ये छोटे मोठे अपघात झाले. कधी या अपघातांचे स्फोटात रुपांतर झाले, तर कधी आग लागण्यात. या प्रकारांमध्ये अनेकांनी जीव गमावला आहे. नुकत्याच घरडा कंपनीत झालेल्या स्फोटामध्ये पाचजणांचा होरपळून मृत्यू झाला. घरडा कंपनीत याआधीही १९८९, १९९४ या कालावधीत स्फोट घडले होते. त्यातही काही कामगारांचा बळी गेला आहे.

स्फोट व बळींचा विचार करता केवळ घरडा कंपनीच नाही तर एक्सेल, सुप्रिया लाईफ सायन्सेस, श्रेयस इंटरमिडीएटस् विनती, रिव्हरसाईड, पेन्टोकी, पुष्कर, हिंदुस्थान युनिलिव्हर व अन्य काही कंपन्यांमध्येही असे प्रकार घडले आहेत. २६ जानेवारी २००९ रोजी येथील एक्सेल कंपनीत झालेल्या स्फोटात तिघांचा बळी गेला होता. सुप्रिया कंपनीतही असे अपघात घडून काहींनी आपला जीव गमावला आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीत टाकीत पडून चिटणीस नामक कामगाराचा बळी गेला आहे, तर पेन्टोकी कंपनीत कोळच्या बॉयलरमधील पट्ट्यात अडकून एका आदिवासी कामगाराचा मृत्यू झाला आहे. याच कंपनीत मान्सून शेडवर काम करताना गुणदे येथील एका स्थानिक कामगाराचा बळी गेला आहे. पुष्कर, श्रेयस, स्नेहलता, सहस्र केमिकल्स, रिव्हरसाईड या कंपन्यांमधूनही असे प्रकार घडले आहेत.

झालेल्या दुर्घटना हे जरी ‘अपघात’ असले तरी त्यातून झालेले नुकसान खूप मोठे आहे. अनेक कुटुंबांचे कधीही भरुन न येणारे नुकसान झाले आहे. या अशा अपघातांमुळेच लोटे परिसराच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर येत आहे.