शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

रेखाकला परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:29 IST

रत्नागिरी : शासनाने शासकीय रेखाकला परीक्षा रद्द करून ग्रेड परीक्षेचे सवलतीचे गुण विद्यार्थ्यांना न देण्याचा निर्णय शासनाने ...

रत्नागिरी : शासनाने शासकीय रेखाकला परीक्षा रद्द करून ग्रेड परीक्षेचे सवलतीचे गुण विद्यार्थ्यांना न देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याने कला शाखेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा कलाध्यापक संघातर्फे शासन निर्णयाचा निषेध करण्यात आला आहे.

कोरोनामुळे विद्यार्थ्यांची आरोग्य व सुरक्षितता विचारात घेऊन शासकीय रेखाकला परीक्षेचे आयोजन करण्यात येऊ नये. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षी माध्यमिक शालांत प्रमाणत्र परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शासकीय रेखाकला परीक्षेचे सवलतीचे अतिरिक्त गुण देण्यात येऊ नयेत. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी दृश्यकला पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेमध्ये शासकीय रेखाकला परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण देण्यात येऊ नये, असे शासन निर्णय शुक्रवार, दि. २६ मार्च रोजी जाहीर करण्यात आले आहे. मात्र निर्णयामुळे विद्यार्थी, पालकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांच्या या नुकसानाला सर्वस्वी शासन जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

दहावीच्या परीक्षेत, मूलभूत अभ्यासक्रम दृश्य कला पदवी तसेच सीईटी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण देण्यात येऊ नयेत हा शासनादेश संपूर्ण कला क्षेत्राला धक्का देणारा असल्याचे कलाध्यापक संघाने नमूद केले आहे. शासकीय रेखाकला परीक्षेमुळेच कला विषयाला महत्त्व प्राप्त झाले आहे. वास्तविक या निर्णयामुळे रेखाकला परीक्षा संपवण्याचा घाट शासनाने घातलेला आहे.

.................................

गतवर्षी दहावीचा भूगोल विषयाचा पेपर न घेता त्याला गुण देण्यात आले आहेत, तर ग्रेड परीक्षेचे सवलतीचे गुण विद्यार्थ्यांना का देण्यात येऊ नयेत? विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन रत्नागिरी जिल्हा कलाध्यापक संघातर्फे निवेदन देण्यात येणार आहे.

- बी. आर. तिवडे, अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा कलाध्यापक संघ रत्नागिरी

.........................

शासनाने यावर्षी शासकीय रेखाकला परीक्षा रद्द केली. त्यामुळे प्रथम वर्ष परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान तर झाले. शिवाय दहावीच्या विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण न देण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे विद्यार्थ्यांनी रेखाकला परीक्षेत यश मिळविण्यासाठी घेतलेले परिश्रम वाया गेले आहेत. त्यामुळे या निर्णयाचा पुनर्विचार होणे गरजेचे आहे.

- साक्षी खेडेकर, पालक