शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

वणव्यात काजू बागा जळून लाखोंची हानी

By admin | Updated: February 13, 2015 00:53 IST

मुर्तवडे येथील प्रकार : तलाठी नॉटरिचेबल; मात्र कृषी सहाय्यक रिचेबल

चिपळूण : तालुक्यातील मुर्तवडे गावी मंगळवारी लागलेल्या आगीत काजूच्या बागा भस्मसात झाल्या. त्यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेचा पंचनामा करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला असता तलाठी पाटील ‘नॉटरिचेबल’ होते, तर कृ षी सहाय्यक काळे यांनी तत्परता दाखवून शेतकऱ्यांना दिलासा दिला.पातेपिलवली गावाकडून मंगळवारी सायंकाळी ६ च्या दरम्याने धुरांच्या लोळासह आगीचा वणवा मुर्तवडे - बौद्धवाडीच्या दिशेने आला. यावेळी अंधार दाटल्याने वणवा विझवणे अडचणीचे झाले. बघता बघता आगीने रौद्ररुप धारण केले. या आगीत उपसरपंच अशोक राजाराम पवार व त्यांचे भाऊ व शंकर सोनू पवार यांच्या १५ वर्षापुर्वी रोजगार हमी योजनेतून लावलेल्या काजूची लागवड आगीच्या भक्षस्थानी पडल्या . अशोक पवार यांची १०० हून अधिक तर शंकर यांची ७० ते ८० लागती काजूची झाडे जळून खाक झाली. त्या मुळे या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.याबाबत पुढे कोणती कार्यवाही होणार इकडे लक्ष लागले आहे.वणव्यामुळे अनेक बागाही होरपळल्या असून त्यांचेही नुकसान झाले आहे. वणव्यात भस्मसात झालेल्या बागांचा पंचनामा करण्यासाठी शेतकरी तलाठ्याशी संपर्क साधत होते. मात्र संपर्क होत नव्हता. दोन दिवस तलाठी न भेटल्याने अखेर मंडल अधिकाऱ्यांशी संपर्क करण्यात आला. चिपळूण तालुक्यातील मुर्तवडे भागात लागलेल्या वणव्यात काजू बागांचे मोठे नुकसान झाले असून पंचनामा झाल्यानंतर याबाबतची मदतीची कार्यवाही केली जाईल असे सांगण्यात येत आहे. (प्रतिनिधी)वणवे लावून आंबा, काजूच्या बागांबरोबरच इतरही अनेक वनस्पतींची हानी केली जाते. सागासारखी लागवडही वाया जाते. अनेक औषधी वनस्पती, नैसर्गिक जैवविविधताही नष्ट केली जाते. ही हानी थांबण्यासाठी आता शासन पातळीवरच कठोर निर्णय व्हायला हवा. गावात कटूता नको, वाद नको म्हणून कोणी बोलत नाही. त्यातून सार्वजनिक व राष्ट्रीय संपत्तीचेच नुकसान होत आहे. हे थांबवून, नुकसानग्रस्तांना भरपाई मिळायला हवी.- अशोक पवार, उपसरपंच, ग्रामपंचायत मुर्तवडे