शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंची चूक कबुल केली, म्हणाले...
2
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
3
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
4
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
5
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
6
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
7
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
8
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
9
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
10
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
12
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
13
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
14
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
15
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
16
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
17
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
18
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
19
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

वणव्यात काजू बागा जळून लाखोंची हानी

By admin | Updated: February 13, 2015 00:53 IST

मुर्तवडे येथील प्रकार : तलाठी नॉटरिचेबल; मात्र कृषी सहाय्यक रिचेबल

चिपळूण : तालुक्यातील मुर्तवडे गावी मंगळवारी लागलेल्या आगीत काजूच्या बागा भस्मसात झाल्या. त्यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेचा पंचनामा करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला असता तलाठी पाटील ‘नॉटरिचेबल’ होते, तर कृ षी सहाय्यक काळे यांनी तत्परता दाखवून शेतकऱ्यांना दिलासा दिला.पातेपिलवली गावाकडून मंगळवारी सायंकाळी ६ च्या दरम्याने धुरांच्या लोळासह आगीचा वणवा मुर्तवडे - बौद्धवाडीच्या दिशेने आला. यावेळी अंधार दाटल्याने वणवा विझवणे अडचणीचे झाले. बघता बघता आगीने रौद्ररुप धारण केले. या आगीत उपसरपंच अशोक राजाराम पवार व त्यांचे भाऊ व शंकर सोनू पवार यांच्या १५ वर्षापुर्वी रोजगार हमी योजनेतून लावलेल्या काजूची लागवड आगीच्या भक्षस्थानी पडल्या . अशोक पवार यांची १०० हून अधिक तर शंकर यांची ७० ते ८० लागती काजूची झाडे जळून खाक झाली. त्या मुळे या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.याबाबत पुढे कोणती कार्यवाही होणार इकडे लक्ष लागले आहे.वणव्यामुळे अनेक बागाही होरपळल्या असून त्यांचेही नुकसान झाले आहे. वणव्यात भस्मसात झालेल्या बागांचा पंचनामा करण्यासाठी शेतकरी तलाठ्याशी संपर्क साधत होते. मात्र संपर्क होत नव्हता. दोन दिवस तलाठी न भेटल्याने अखेर मंडल अधिकाऱ्यांशी संपर्क करण्यात आला. चिपळूण तालुक्यातील मुर्तवडे भागात लागलेल्या वणव्यात काजू बागांचे मोठे नुकसान झाले असून पंचनामा झाल्यानंतर याबाबतची मदतीची कार्यवाही केली जाईल असे सांगण्यात येत आहे. (प्रतिनिधी)वणवे लावून आंबा, काजूच्या बागांबरोबरच इतरही अनेक वनस्पतींची हानी केली जाते. सागासारखी लागवडही वाया जाते. अनेक औषधी वनस्पती, नैसर्गिक जैवविविधताही नष्ट केली जाते. ही हानी थांबण्यासाठी आता शासन पातळीवरच कठोर निर्णय व्हायला हवा. गावात कटूता नको, वाद नको म्हणून कोणी बोलत नाही. त्यातून सार्वजनिक व राष्ट्रीय संपत्तीचेच नुकसान होत आहे. हे थांबवून, नुकसानग्रस्तांना भरपाई मिळायला हवी.- अशोक पवार, उपसरपंच, ग्रामपंचायत मुर्तवडे