शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

चिपळुणातील कोविड केअर सेंटर उभारणीत प्रशासनाचा खो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:33 IST

चिपळूण : झपाट्याने वाढणारी कोरोना रुग्णसंख्या पाहता चिपळूण शहरात कोविड केअर सेंटर सुरू करावे या मागणीने जोर धरला आहे. ...

चिपळूण : झपाट्याने वाढणारी कोरोना रुग्णसंख्या पाहता चिपळूण शहरात कोविड केअर सेंटर सुरू करावे या मागणीने जोर धरला आहे. नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनीही आग्रही भूमिका घेऊन पुढाकार घेतला आहे. शहरातील नामांकित डॉक्टर्सही सहकार्य करण्यास तयार आहेत. नगर परिषदेकडे जागाही उपलब्ध आहे. असे असताना नगर परिषद प्रशासन मात्र कोविड केअर सेंटरसाठी कानावर हात घेऊन असल्याचे आता पुढे येत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वेगाने होत असल्याने शासकीय आणि खासगी कोविड सेंटर्स आता अपुरी पडत आहेत. रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जागा मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत छोटे-छोटे कोविड केअर सेंटर सुरू करणे आवश्यक बनले आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात वाढणारी रुग्णसंख्या पाहता चिपळूण नगर परिषदेने शहरात स्वतःचे कोविड सेंटर सुरू करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. माजी उपनगराध्यक्ष बाळा कदम यांनी थेट उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडेच ही मागणी लावून धरली आहे. या विषयामागील सत्यता आता समोर येऊ लागली आहे.

प्रत्यक्षात शहरात कोविड केअर सेंटरसाठी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे या गेल्या पंधरा दिवसांपासून प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी त्यांनी शहरातील काही डॉक्टरांना विश्वासात घेऊन सहकार्य करण्याची विनंती त्यांनी केली होती. काही सामाजिक संस्थांजवळ याबाबत चर्चा करण्यात आली होती. इतकेच नव्हे तर पालकमंत्री परब यांच्याशी झालेल्या व्हीसी चर्चेतदेखील नगराध्यक्षानी हा विषय मांडला होता.

डॉक्टरांची टीम सरसावली

याविषयी नुकत्याच झालेल्या एका बैठकीत शहरातील डॉक्टर असोसिएशनच्या टीमने पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन बैठकीत दिले होते. या बैठकीला मुख्याधिकारी आणि काही नगरसेवक उपस्थित होते. यावेळी डॉ. यतीन जाधव यांनी पुढाकार घेत चिपळूणच्या जनतेसाठी जेवढे सहकार्य करता येईल, तेवढे सर्व डॉक्टर करतील, असा शब्दही दिला. एवढेच नव्हे तर वैद्यकीय यंत्रणा उभी करण्यासाठी काही डॉक्टरांनी तयारी दर्शवल्याचे पुढे आले आहे.

नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया

नगर परिषदेकडे शासनाकडून प्राप्त झालेला ३५ लाख रुपयांचा निधी शिल्लक आहे. त्यानुसार कोविड केअर सेंटरचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. खर्च करण्यासाठी नगर परिषद अधिनियम ५६/२/३ या नियमांचा वापर करता येऊ शकतो, असे काही तज्ज्ञांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. मात्र त्यावर अद्याप निर्णय होऊ न शकल्याने या शहराचे मोठे दुर्दैव असल्याची संतप्त प्रतिक्रिया शहरात उमटत आहेत.