शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
2
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
3
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
4
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
5
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
6
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
7
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
8
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
9
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
10
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
11
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
12
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
13
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
14
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
15
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
16
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
17
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
18
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
19
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
20
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?

चिपळुणातील कोविड केअर सेंटर उभारणीत प्रशासनाचा खो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:33 IST

चिपळूण : झपाट्याने वाढणारी कोरोना रुग्णसंख्या पाहता चिपळूण शहरात कोविड केअर सेंटर सुरू करावे या मागणीने जोर धरला आहे. ...

चिपळूण : झपाट्याने वाढणारी कोरोना रुग्णसंख्या पाहता चिपळूण शहरात कोविड केअर सेंटर सुरू करावे या मागणीने जोर धरला आहे. नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनीही आग्रही भूमिका घेऊन पुढाकार घेतला आहे. शहरातील नामांकित डॉक्टर्सही सहकार्य करण्यास तयार आहेत. नगर परिषदेकडे जागाही उपलब्ध आहे. असे असताना नगर परिषद प्रशासन मात्र कोविड केअर सेंटरसाठी कानावर हात घेऊन असल्याचे आता पुढे येत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वेगाने होत असल्याने शासकीय आणि खासगी कोविड सेंटर्स आता अपुरी पडत आहेत. रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जागा मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत छोटे-छोटे कोविड केअर सेंटर सुरू करणे आवश्यक बनले आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात वाढणारी रुग्णसंख्या पाहता चिपळूण नगर परिषदेने शहरात स्वतःचे कोविड सेंटर सुरू करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. माजी उपनगराध्यक्ष बाळा कदम यांनी थेट उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडेच ही मागणी लावून धरली आहे. या विषयामागील सत्यता आता समोर येऊ लागली आहे.

प्रत्यक्षात शहरात कोविड केअर सेंटरसाठी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे या गेल्या पंधरा दिवसांपासून प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी त्यांनी शहरातील काही डॉक्टरांना विश्वासात घेऊन सहकार्य करण्याची विनंती त्यांनी केली होती. काही सामाजिक संस्थांजवळ याबाबत चर्चा करण्यात आली होती. इतकेच नव्हे तर पालकमंत्री परब यांच्याशी झालेल्या व्हीसी चर्चेतदेखील नगराध्यक्षानी हा विषय मांडला होता.

डॉक्टरांची टीम सरसावली

याविषयी नुकत्याच झालेल्या एका बैठकीत शहरातील डॉक्टर असोसिएशनच्या टीमने पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन बैठकीत दिले होते. या बैठकीला मुख्याधिकारी आणि काही नगरसेवक उपस्थित होते. यावेळी डॉ. यतीन जाधव यांनी पुढाकार घेत चिपळूणच्या जनतेसाठी जेवढे सहकार्य करता येईल, तेवढे सर्व डॉक्टर करतील, असा शब्दही दिला. एवढेच नव्हे तर वैद्यकीय यंत्रणा उभी करण्यासाठी काही डॉक्टरांनी तयारी दर्शवल्याचे पुढे आले आहे.

नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया

नगर परिषदेकडे शासनाकडून प्राप्त झालेला ३५ लाख रुपयांचा निधी शिल्लक आहे. त्यानुसार कोविड केअर सेंटरचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. खर्च करण्यासाठी नगर परिषद अधिनियम ५६/२/३ या नियमांचा वापर करता येऊ शकतो, असे काही तज्ज्ञांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. मात्र त्यावर अद्याप निर्णय होऊ न शकल्याने या शहराचे मोठे दुर्दैव असल्याची संतप्त प्रतिक्रिया शहरात उमटत आहेत.