शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
2
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
3
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
4
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
5
Raksha Bandhan 2025 SIP Gift: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
6
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’
7
'मंजिल आने वाली है...' कोडवर्ड देत पतीला कायमचं संपवलं; प्रियकरासोबत पत्नीनं रचलं क्रूर षडयंत्र
8
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
9
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."
10
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या स्टॉकमध्ये हेवी बाईंग; मोतीलाल ओसवालपासून अनेक ब्रोकरेज बुलिश
11
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुजवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
12
Abu Azmi: "माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया
13
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
14
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
15
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
16
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
17
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
18
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
19
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
20
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?

स्थानिकांनी प्रकल्पाची बाजू ऐकून घ्यावी : समर्थक समित्यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:38 IST

राजापूर : तालुक्यातील बारसू - सोलगाव भागात एमआयडीसीसाठी आधीच अधिसूचना निघालेली आहे. तेथील ग्रामपंचायती व ग्रामस्थांनी लगतची पाच किलाेमीटर ...

राजापूर : तालुक्यातील बारसू - सोलगाव भागात एमआयडीसीसाठी आधीच अधिसूचना निघालेली आहे. तेथील ग्रामपंचायती व ग्रामस्थांनी लगतची पाच किलाेमीटर परिसरातील जागाही एमआयडीसीमध्ये समाविष्ट करावी, अशी लेखी मागणी प्रांताधिकारी यांच्याकडे केली आहे. खाेट्या प्रचाराला बळी न पडता स्थानिकांनी प्रकल्पाची बाजू ऐकून घ्यावी व त्यानंतर जरूर तर आपला विरोध सुरू ठेवावा, असे आवाहन बारसू गोवळ दशक्रोशी प्रकल्प समर्थक समितीचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष हनिफ काझी तसेच सोलगाव - देवाचे गोठणे - नाटे प्रकल्प समर्थक समितीचे अध्यक्ष डॉ. सुनील राणे यांनी प्रसिद्धीपत्रकातून केले आहे.

रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यात आल्यास त्याचा जनतेला किती फायदा होणार आहे, याचे शंभर सकारात्मक मुद्दे आहेत; मात्र प्रकल्प विरोधाचा ठेका घेतलेले पुढारी हे ग्रामस्थांनी प्रकल्पाची असलेली दुसरी बाजू ऐकूनच घेऊ नये, यासाठी आटापिटा करीत आहेत. तालुक्यातील जवळपास ६० ग्रामपंचायतींनी हा प्रकल्प व्हावा, यासाठी मुख्यमंत्री व उद्योगमंत्र्यांना पत्रे दिली आहेत. तीन लाख कोटी रुपयांचा रिफायनरी प्रकल्प हा केवळ पाच - सात प्रकल्प गावांसाठी नसून तो जोडीलाच तालुका व दोन्ही जिल्ह्याच्या उत्कर्षासाठी आहे, याचे भान ग्रामीण जनतेला येणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.

तब्बल साडेआठ हजार एकराची संमत्तीपत्रे असतानाही एनजीओंच्या खोट्या प्रचाराला बळी पडून चालणार येथील जनतेने हा प्रकल्प गमावला आहे. रिफायनरी प्रकल्प म्हणजे काय, हे ज्यांना माहीत नाही, तेच आज या प्रकल्पाला विरोध करीत आहेत. काही ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुका नजरेसमोर ठेवून प्रकल्पाला विरोध केला जात आहे; मात्र प्रकल्पविरोधकांनी कधीही विरोधाला उभ्या करणाऱ्या महिला-पुरुषांना रिफायनरीचे उत्पादन असलेले घरगुती गॅस सिलिंडर, डिझेल-पेट्रोल तसेच टुथब्रशपासून दैनंदिन वापरात असलेली असंख्य पेट्रोकेमिकल्स उत्पादने वापरायची सोडा अथवा बहिष्कार घाला, असे सांगितलेले नाही. कारण असे झाले तर ही जनता त्यांना समोरही उभी करणार नाही, असे म्हटले आहे.

कोकणातील भोळ्याभाबड्या जनतेचा उपयोग आणखी किती काळ केवळ राजकारणासाठी केला जाणार आहे, असा प्रश्न केला आहे. एनजीओ आणि प्रकल्प विरोधकांनी फार नाही किमान गेल्या दहा वर्षांत राजापुरातील किती घरांतील चुली पेटण्याचे काम केले, किती जणांना रोजगार दिले, कोकणचा कळवळा होता तर ही मंडळी गेली अनेक दशके मुंबईत वास्तव्याला का आहेत, असे प्रश्नही उपस्थित केले आहेत.