शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

स्थानिकांनी प्रकल्पाची बाजू ऐकून घ्यावी : समर्थक समित्यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:38 IST

राजापूर : तालुक्यातील बारसू - सोलगाव भागात एमआयडीसीसाठी आधीच अधिसूचना निघालेली आहे. तेथील ग्रामपंचायती व ग्रामस्थांनी लगतची पाच किलाेमीटर ...

राजापूर : तालुक्यातील बारसू - सोलगाव भागात एमआयडीसीसाठी आधीच अधिसूचना निघालेली आहे. तेथील ग्रामपंचायती व ग्रामस्थांनी लगतची पाच किलाेमीटर परिसरातील जागाही एमआयडीसीमध्ये समाविष्ट करावी, अशी लेखी मागणी प्रांताधिकारी यांच्याकडे केली आहे. खाेट्या प्रचाराला बळी न पडता स्थानिकांनी प्रकल्पाची बाजू ऐकून घ्यावी व त्यानंतर जरूर तर आपला विरोध सुरू ठेवावा, असे आवाहन बारसू गोवळ दशक्रोशी प्रकल्प समर्थक समितीचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष हनिफ काझी तसेच सोलगाव - देवाचे गोठणे - नाटे प्रकल्प समर्थक समितीचे अध्यक्ष डॉ. सुनील राणे यांनी प्रसिद्धीपत्रकातून केले आहे.

रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यात आल्यास त्याचा जनतेला किती फायदा होणार आहे, याचे शंभर सकारात्मक मुद्दे आहेत; मात्र प्रकल्प विरोधाचा ठेका घेतलेले पुढारी हे ग्रामस्थांनी प्रकल्पाची असलेली दुसरी बाजू ऐकूनच घेऊ नये, यासाठी आटापिटा करीत आहेत. तालुक्यातील जवळपास ६० ग्रामपंचायतींनी हा प्रकल्प व्हावा, यासाठी मुख्यमंत्री व उद्योगमंत्र्यांना पत्रे दिली आहेत. तीन लाख कोटी रुपयांचा रिफायनरी प्रकल्प हा केवळ पाच - सात प्रकल्प गावांसाठी नसून तो जोडीलाच तालुका व दोन्ही जिल्ह्याच्या उत्कर्षासाठी आहे, याचे भान ग्रामीण जनतेला येणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.

तब्बल साडेआठ हजार एकराची संमत्तीपत्रे असतानाही एनजीओंच्या खोट्या प्रचाराला बळी पडून चालणार येथील जनतेने हा प्रकल्प गमावला आहे. रिफायनरी प्रकल्प म्हणजे काय, हे ज्यांना माहीत नाही, तेच आज या प्रकल्पाला विरोध करीत आहेत. काही ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुका नजरेसमोर ठेवून प्रकल्पाला विरोध केला जात आहे; मात्र प्रकल्पविरोधकांनी कधीही विरोधाला उभ्या करणाऱ्या महिला-पुरुषांना रिफायनरीचे उत्पादन असलेले घरगुती गॅस सिलिंडर, डिझेल-पेट्रोल तसेच टुथब्रशपासून दैनंदिन वापरात असलेली असंख्य पेट्रोकेमिकल्स उत्पादने वापरायची सोडा अथवा बहिष्कार घाला, असे सांगितलेले नाही. कारण असे झाले तर ही जनता त्यांना समोरही उभी करणार नाही, असे म्हटले आहे.

कोकणातील भोळ्याभाबड्या जनतेचा उपयोग आणखी किती काळ केवळ राजकारणासाठी केला जाणार आहे, असा प्रश्न केला आहे. एनजीओ आणि प्रकल्प विरोधकांनी फार नाही किमान गेल्या दहा वर्षांत राजापुरातील किती घरांतील चुली पेटण्याचे काम केले, किती जणांना रोजगार दिले, कोकणचा कळवळा होता तर ही मंडळी गेली अनेक दशके मुंबईत वास्तव्याला का आहेत, असे प्रश्नही उपस्थित केले आहेत.