शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिकांनी प्रकल्पाची बाजू ऐकून घ्यावी : समर्थक समित्यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:38 IST

राजापूर : तालुक्यातील बारसू - सोलगाव भागात एमआयडीसीसाठी आधीच अधिसूचना निघालेली आहे. तेथील ग्रामपंचायती व ग्रामस्थांनी लगतची पाच किलाेमीटर ...

राजापूर : तालुक्यातील बारसू - सोलगाव भागात एमआयडीसीसाठी आधीच अधिसूचना निघालेली आहे. तेथील ग्रामपंचायती व ग्रामस्थांनी लगतची पाच किलाेमीटर परिसरातील जागाही एमआयडीसीमध्ये समाविष्ट करावी, अशी लेखी मागणी प्रांताधिकारी यांच्याकडे केली आहे. खाेट्या प्रचाराला बळी न पडता स्थानिकांनी प्रकल्पाची बाजू ऐकून घ्यावी व त्यानंतर जरूर तर आपला विरोध सुरू ठेवावा, असे आवाहन बारसू गोवळ दशक्रोशी प्रकल्प समर्थक समितीचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष हनिफ काझी तसेच सोलगाव - देवाचे गोठणे - नाटे प्रकल्प समर्थक समितीचे अध्यक्ष डॉ. सुनील राणे यांनी प्रसिद्धीपत्रकातून केले आहे.

रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यात आल्यास त्याचा जनतेला किती फायदा होणार आहे, याचे शंभर सकारात्मक मुद्दे आहेत; मात्र प्रकल्प विरोधाचा ठेका घेतलेले पुढारी हे ग्रामस्थांनी प्रकल्पाची असलेली दुसरी बाजू ऐकूनच घेऊ नये, यासाठी आटापिटा करीत आहेत. तालुक्यातील जवळपास ६० ग्रामपंचायतींनी हा प्रकल्प व्हावा, यासाठी मुख्यमंत्री व उद्योगमंत्र्यांना पत्रे दिली आहेत. तीन लाख कोटी रुपयांचा रिफायनरी प्रकल्प हा केवळ पाच - सात प्रकल्प गावांसाठी नसून तो जोडीलाच तालुका व दोन्ही जिल्ह्याच्या उत्कर्षासाठी आहे, याचे भान ग्रामीण जनतेला येणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.

तब्बल साडेआठ हजार एकराची संमत्तीपत्रे असतानाही एनजीओंच्या खोट्या प्रचाराला बळी पडून चालणार येथील जनतेने हा प्रकल्प गमावला आहे. रिफायनरी प्रकल्प म्हणजे काय, हे ज्यांना माहीत नाही, तेच आज या प्रकल्पाला विरोध करीत आहेत. काही ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुका नजरेसमोर ठेवून प्रकल्पाला विरोध केला जात आहे; मात्र प्रकल्पविरोधकांनी कधीही विरोधाला उभ्या करणाऱ्या महिला-पुरुषांना रिफायनरीचे उत्पादन असलेले घरगुती गॅस सिलिंडर, डिझेल-पेट्रोल तसेच टुथब्रशपासून दैनंदिन वापरात असलेली असंख्य पेट्रोकेमिकल्स उत्पादने वापरायची सोडा अथवा बहिष्कार घाला, असे सांगितलेले नाही. कारण असे झाले तर ही जनता त्यांना समोरही उभी करणार नाही, असे म्हटले आहे.

कोकणातील भोळ्याभाबड्या जनतेचा उपयोग आणखी किती काळ केवळ राजकारणासाठी केला जाणार आहे, असा प्रश्न केला आहे. एनजीओ आणि प्रकल्प विरोधकांनी फार नाही किमान गेल्या दहा वर्षांत राजापुरातील किती घरांतील चुली पेटण्याचे काम केले, किती जणांना रोजगार दिले, कोकणचा कळवळा होता तर ही मंडळी गेली अनेक दशके मुंबईत वास्तव्याला का आहेत, असे प्रश्नही उपस्थित केले आहेत.