शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

ऐकावे नेत्यांचे की करावे मनाचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:42 IST

उदय सामंत व्यापाऱ्यांच्या पाठीशी, तर भास्कर जाधव वाईटपणा घेण्यास तयार लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात ...

उदय सामंत व्यापाऱ्यांच्या पाठीशी, तर भास्कर जाधव वाईटपणा घेण्यास तयार

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आलेली नसून, परिस्थिती हाताबाहेर जात आहे, तशी नेत्यांमधील मतमतांतरे व्यक्त होऊ लागली आहेत. अशा परिस्थितीत वेगवेगळ्या सूचना येऊ लागल्याने प्रशासनामध्येच संभ्रम निर्माण झाला आहे. आता नेत्यांचे ऐकावे की मनाचे करावे, अशी द्विधा मनस्थिती काही अधिकाऱ्यांची झाली आहे.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दोन दिवसांपूर्वी येथील पंचायत समितीत आढावा घेतला. यावेळी ते म्हणाले की, अत्यावश्यक सेवेत नवीन ३२ वस्तू व सेवांचा समावेश केलेला आहे. त्यामुळे अनेक दुकाने सुरू राहण्यास मदत होईल. गेले दीड वर्ष बहुतांश दुकाने बंद राहिल्याने व्यापारी मेटाकुटीला आले आहेत. त्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चाही झालेली आहे. व्यापाऱ्यांच्या बहुतांशी मागण्या आम्ही मान्य केलेल्या आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, असे स्पष्ट केले होते.

त्यापाठोपाठ आमदार भास्कर जाधव यांनी सोमवारी तातडीची आढावा बैठक त्याच सभागृहात घेतली. जाधव म्हणाले की, ग्रामीण भागात कोरोनाची परिस्थिती गंभीर असून, प्रशासनाने कोणत्याही परिस्थितीत आपले नियंत्रण सैल करु नये. एवढेच नव्हे तर एकवेळ गावात वाईटपणा घेण्यास कोणी तयार नसेल, तर वाईटपणा घेण्याची आपली तयारी आहे. पण काहीही करून कोरोनाची ही साखळी तोडायलाच हवी, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही. तेव्हा ही साखळी तोडण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा. जिथे आवश्यकता आहे तेथे कडक लॉकडाऊन करा, असे आवाहन जाधव यांनी केले.

--------------------------------

ग्राम कृती दलाची जबाबदारी तंटामुक्त अध्यक्षांकडे

ग्रामीण भागातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ग्राम कृती दलाची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचा सूर या आढावा बैठकीत उमटला. मात्र, समितीचा अध्यक्ष कोण, यावरून काही गावांमध्ये राजकारण शिजत असल्याचे पुढे आले. त्यामुळे ही जबाबदारी सरपंचांऐवजी तंटामुक्त अध्यक्षांवर सोपविण्यात यावी, असे जाधव यांनी स्पष्ट केले. मात्र, याआधी सरपंच या समितीचा अध्यक्ष व अन्य काही बदल केले आहेत. त्यामुळे यावरूनही काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे.

---------------------------------

ही तर नामुष्की

आज देशात कोरोनामुळे मृत्यूंचे प्रमाण अधिक असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र क्रमांक एकवर असून, त्यामध्ये सर्वात स्वच्छ जिल्हा म्हणून ओळख असलेल्या राज्यात रत्नागिरी दोन क्रमांकावर आहे. ही अत्यंत नामुष्कीची गोष्ट असून, यातून बाहेर पडायचे असेल तर ती वेळ आताच आहे. अन्यथा भविष्यात आणखी गंभीर परिस्थितीला समोर जावे लागेल, असे आमदार भास्कर जाधव यांनी या आढावा बैठकीत स्पष्ट केले.