शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
2
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
3
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
4
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
5
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
6
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
7
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
8
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
9
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
10
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
11
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
12
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
13
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
14
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
15
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
16
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
17
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
18
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
19
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
Daily Top 2Weekly Top 5

ऐकावे नेत्यांचे की करावे मनाचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:42 IST

उदय सामंत व्यापाऱ्यांच्या पाठीशी, तर भास्कर जाधव वाईटपणा घेण्यास तयार लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात ...

उदय सामंत व्यापाऱ्यांच्या पाठीशी, तर भास्कर जाधव वाईटपणा घेण्यास तयार

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आलेली नसून, परिस्थिती हाताबाहेर जात आहे, तशी नेत्यांमधील मतमतांतरे व्यक्त होऊ लागली आहेत. अशा परिस्थितीत वेगवेगळ्या सूचना येऊ लागल्याने प्रशासनामध्येच संभ्रम निर्माण झाला आहे. आता नेत्यांचे ऐकावे की मनाचे करावे, अशी द्विधा मनस्थिती काही अधिकाऱ्यांची झाली आहे.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दोन दिवसांपूर्वी येथील पंचायत समितीत आढावा घेतला. यावेळी ते म्हणाले की, अत्यावश्यक सेवेत नवीन ३२ वस्तू व सेवांचा समावेश केलेला आहे. त्यामुळे अनेक दुकाने सुरू राहण्यास मदत होईल. गेले दीड वर्ष बहुतांश दुकाने बंद राहिल्याने व्यापारी मेटाकुटीला आले आहेत. त्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चाही झालेली आहे. व्यापाऱ्यांच्या बहुतांशी मागण्या आम्ही मान्य केलेल्या आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, असे स्पष्ट केले होते.

त्यापाठोपाठ आमदार भास्कर जाधव यांनी सोमवारी तातडीची आढावा बैठक त्याच सभागृहात घेतली. जाधव म्हणाले की, ग्रामीण भागात कोरोनाची परिस्थिती गंभीर असून, प्रशासनाने कोणत्याही परिस्थितीत आपले नियंत्रण सैल करु नये. एवढेच नव्हे तर एकवेळ गावात वाईटपणा घेण्यास कोणी तयार नसेल, तर वाईटपणा घेण्याची आपली तयारी आहे. पण काहीही करून कोरोनाची ही साखळी तोडायलाच हवी, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही. तेव्हा ही साखळी तोडण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा. जिथे आवश्यकता आहे तेथे कडक लॉकडाऊन करा, असे आवाहन जाधव यांनी केले.

--------------------------------

ग्राम कृती दलाची जबाबदारी तंटामुक्त अध्यक्षांकडे

ग्रामीण भागातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ग्राम कृती दलाची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचा सूर या आढावा बैठकीत उमटला. मात्र, समितीचा अध्यक्ष कोण, यावरून काही गावांमध्ये राजकारण शिजत असल्याचे पुढे आले. त्यामुळे ही जबाबदारी सरपंचांऐवजी तंटामुक्त अध्यक्षांवर सोपविण्यात यावी, असे जाधव यांनी स्पष्ट केले. मात्र, याआधी सरपंच या समितीचा अध्यक्ष व अन्य काही बदल केले आहेत. त्यामुळे यावरूनही काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे.

---------------------------------

ही तर नामुष्की

आज देशात कोरोनामुळे मृत्यूंचे प्रमाण अधिक असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र क्रमांक एकवर असून, त्यामध्ये सर्वात स्वच्छ जिल्हा म्हणून ओळख असलेल्या राज्यात रत्नागिरी दोन क्रमांकावर आहे. ही अत्यंत नामुष्कीची गोष्ट असून, यातून बाहेर पडायचे असेल तर ती वेळ आताच आहे. अन्यथा भविष्यात आणखी गंभीर परिस्थितीला समोर जावे लागेल, असे आमदार भास्कर जाधव यांनी या आढावा बैठकीत स्पष्ट केले.