शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

गळतीत अडकलेले जीवन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:20 IST

कोकणात ‘धरण उशाशी, कोरड घशाशी’ अशी म्हण प्रचलित आहे. पण आता या गळतीमुळेच ‘धरण उशाशी आणि मरण घशाशी’, अशी ...

कोकणात ‘धरण उशाशी, कोरड घशाशी’ अशी म्हण प्रचलित आहे. पण आता या गळतीमुळेच ‘धरण उशाशी आणि मरण घशाशी’, अशी नवीन म्हण तयार झाली आहे. सह्याद्री खोऱ्यात आजघडीलाही मध्यम व लघु स्वरूपाच्या धरणांची संख्या कमी नाही. परंतु, ही सर्व धरणं मातीची असल्याने त्यांची चिंता अधिक आहे. धरणांच्या परिसरात होत असलेली बेसुमार वृक्षतोड व जमिनीची होणारी धूप लक्षात घेता मातीच्या धरणाला धोका निर्माण होत आहे. त्यासाठी धरणांच्या रचनेत बदल करणे अपेक्षित आहे. किमान भिंत काँक्रिटची असायला हवी तरच त्याला मजबुती येऊ शकते. परंतु, काँक्रिटीकरण ही अत्यंत खर्चिक बाब असल्याने त्याकडे फार लक्ष दिले जात नाही. त्यामुळे त्या-त्या गावातील गामस्थांना पुनर्वसनाच्या नावाखाली स्थलांतरितचा पर्याय निवडला जातो. त्यातून अनेक गावं, वाड्या व वस्ती अस्थिर झाल्या आहेत. काही लोक धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आजही वास्तव्य करून आहेत. कारण शेतीवाडी सोडून स्थलांतर करण्यास कोणी तयार होत नाही. त्यातूनच धोका वाढत जातो. तिवरेतही हेच घडले होते. मात्र, आता त्याच तिवरेवासीयांचे अलोरे येथे पुनर्वसन केले जात असताना नवीन घरांनाही गळती लागली आहे. याचाच अर्थ पुनर्वसन केलेल्या लोकांचे जीवन गळतीभोवती फिरत राहिले आहे. मग ती धरणांची असो किंवा पुनर्वसन केलेल्या घरांची असो. त्यासाठी कोट्यवधीचा निधी खर्च केला जातो. परंतु, शासकीय निधी म्हटले की, मलिदा खाणारे कमी नाहीत. एकवेळ काम निकृष्ट दर्जाचे झाले तरी चालेल, पण टक्केवारीचा हिस्सा मिळायला हवा, अशी अपेक्षा नेहमी केली जाते. त्यामुळे त्या पद्धतीचीच काही कामं केली जातात. परंतु, त्याचे परिणाम प्रकल्पग्रस्तांनाच भोगावे लागतात. तिवरे धरणानंतर आता मंडणगड तालुक्यातील पणदेरी धरणाचे सत्र सुरू झाले आहे. या धरणाला लागलेली गळती दोन दिवसांच्या अथक मेहनतीनंतर रोखण्यात प्रशासनाला यश आले. धरणातील पाण्याची पातळी कमी करण्यासाठी मुख्य कालवा व सांडव्यातून पाणी सोडण्यात आल्याने धरणाचा धोका तूर्तास टळला आहे. आता धरणातून विसर्ग होणारा सांडवा व कालव्याचा मुख्य दरवाजा खुला करून धरण पूर्णपणे रिकामे करण्यात येणार आहे. परंतु, या उपाययोजनांसाठी पावसाळाच हवा का? वर्षभरात अशा गोष्टीकडे लक्ष का देता येत नाही, असा संतप्त प्रश्न कोणी विचारल्यास गैर काय?

- संदीप बांद्रे