शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

वेळ पडल्यास सिंधुदुर्गमध्ये जाऊन आंदोलन करू : संजय नलावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:22 IST

राजापूर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे निलंबन प्रकरण म्हणजे चोर सोडून आमच्या प्रशासन अधिकाऱ्यांना फाशी आहे, तर ...

राजापूर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे निलंबन प्रकरण म्हणजे चोर सोडून आमच्या प्रशासन अधिकाऱ्यांना फाशी आहे, तर मग अंतिम निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी नुसत्या झोपेत सह्या केल्या का? या सगळ्याला आमचा लिपिकच जबाबदार का?अशा मनमानी निलंबनाला चोख उत्तर देऊ. वेळ पडल्यास सिंधुदुर्गामध्ये जाऊन आंदोलन करू, असा इशारा राज्य प्रशासन अधिकारी संघटनेचे प्रवक्ता तसेच लिपिक संघटना राज्य कार्याध्यक्ष संजय नलावडे यांनी दिला आहे.

सिंधुदुर्गमधील लाडपागे समितीतील भरती प्रकरणातील कर्मचाऱ्यांवर, प्रशासन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. लाड पागे समितीच्या समितीच्या अहवालाप्रमाणे झालेल्या शासकीय नोकरभरतीवर तक्रारी दाखल झाल्यावर ही भरती लाड पागे समितीच्या अहवालानुसार झाली आहे. मग यामध्ये आमच्या सामान्य लिपिकचा दोष काय? असा प्रश्न नलावडे यांनी केला आहे. या भरतीप्रकरणी जे काय आरोप दोषारोप असतील तक्रारी असतीलही आमचा लिपिक, प्रशासन अधिकारी नेहमी आपल्या टिपणीत निकष, निर्देश नमूद करत असतो. मात्र, वरिष्ठ अधिकारी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून टिपणीवर आपले मत मांडून कुणाच्या तरी इशाऱ्यावर सर्व नियम बासनात बांधून कोणतीही कार्यवाही पूर्ण करतो किंवा लिपिकला प्रशासन अधिकाऱ्याला त्याचे मत बदलायला लावतो हे आपण गेल्या माझ्या १७ वर्षांपासून अनुभवत अशा टिपण्यांचा गैरवापर होऊ दिला नाही प्रत्येक लिपिक प्रशासन अधिकाऱ्याने कोणत्याही विषयावर सुस्पष्ट मत मांडले की, वरचा अधिकारी दुखावला जातो आणि मग संघर्षाची लवंगी माळ, धुमसत जाते आणि शेवट निलंबनात होतो.

सिंधुदुर्गमध्ये आमच्या प्रशासन अधिकाऱ्यावर जे निलंबनाचं बाळंट आलंय यात नेमकं काय आहे? यात आमचे सर्व लोक १०० टक्के निर्दोष आहेत असे मला वाटून उपयोग नाही, पण जर आमच्या केडरवर जाणून बुजून कुणी अन्याय केला असेल तर आम्ही प्रशासन अधिकारी सिंधुदुर्गमध्ये येऊन जाब विचारू, नव्हे वेळ पडलीच तर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या दारावर येऊन ठाण मांडून बसू प्रशासन अधिकारी संघटना पूर्णपणे या घटनेकडे लक्ष ठेवून आहे. प्रामाणिकपणे काम करून निलंबन होत असेल त्याला आमचा सामान्य प्रामाणिक लिपिक अजिबात भीक घालणार नाही, असेही संजय नलावडे यांनी सांगितले.