शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
2
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
3
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
4
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
5
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
6
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
7
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
8
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
9
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
10
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप
11
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
13
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
14
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
15
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
16
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
17
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
18
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
19
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव

गेल्या वर्षभरात रत्नागिरी जिल्ह्यात ११३ जणांनी संपविले आयुष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:30 IST

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आता हळूहळू जाणवायला लागला असून, गेल्या एक वर्षात तरुणांमध्ये आत्महत्या करण्याचे वाढलेले ...

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आता हळूहळू जाणवायला लागला असून, गेल्या एक वर्षात तरुणांमध्ये आत्महत्या करण्याचे वाढलेले प्रमाण चिंतेचे कारण ठरत आहे. सन २०१९ व २०२० मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ११३ आत्महत्येच्या घटना घडल्या असून, त्यात १९ ते ४५ वयोगटांतील ७२ जणांचा समावेश आहे.

काेकणात आत्तापर्यंत आधुनिक जीवनशैलीचा फारसा प्रभाव जाणवला नव्हता. चाकोरीबद्ध आयुष्य जगणारा कोकणी माणूस नेहमीच सकारात्मक विचार करणारा आहे. आलेल्या प्रत्येक संकटाचा सामना करण्याची हिंमत कोकणी माणसाकडे नैसर्गिकदृष्ट्या आहे. त्यामुळे आत्महत्येच्या घटना कोकणात फारशा घडत नव्हत्या. उर्वरित महाराष्ट्रमध्ये अतिवृष्टी किंवा दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढतं. त्यावेळी हवामान बदलामुळे आंबा, काजू, मासळी यांच्या उत्पनावर सातत्याने परिणाम होताना दिसतो. तरीही हतबल झालेला इथला कोकणी माणूस आत्महत्या करताना कधी दिसला नाही. मात्र, गेल्या काही वर्षांपासून कोकणातील जीवनशैलीमध्ये आमूलाग्र बदल घडताना दिसत आहे. या बदलाचे परिणाम युवापिढीवर अधिक होताना दिसत आहेत. हातात आलेली वेगवेगळी गॅजेट्स कदाचित या बदलाचे कारण असावे

.............................

सन २०१९ आणि २०२० या कालावधीत १९ ते ४५ या वयोगटांत वाढलेल्या आत्महत्येचे प्रमाण हे या बदलाचे परिणाम असून, चिंतेत भर टाकणारे आहेत. पोलिसांकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, सन २०१९ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात ५८ आत्महत्या झाल्या. त्यापैकी वय वर्ष ८ ते १८ या वयोगटांत ५, १९ ते ३० वर्षे वयोगटांत तब्बल २०, ३१ ते ४५ वयाेगटांत १७, ४५ ते ६० वयोगटांत ९ आणि ६० पेक्षा पुढील वयोगटांत ७ आत्महत्या झालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहेत.

........................

सन २०२० मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात ५५ आत्महत्यांची नोंद झाली आहे. त्यामध्ये ८ ते १८ वयोगटांतील ०९, १९ते ३० वयोगटांतील तब्बल २१, ३१ ते ४५ वयोगटांतील १४, ४६ ते ६० वयोगटांतील ४ आणि ६० पेक्षा पुढील वयाच्या ७ लोकांनी २०२० मध्ये आत्महत्या केल्याचं निष्पन्न झाल आहे.

२०२० हे वर्ष लाॅकडाऊन वर्ष संबोधले जाते. त्यामुळे या वर्षात या लाॅकडाऊनचा ताणही मोठ्या प्रमाणावर होता. दरम्यान, या दोन वर्षांत १९ ते ४५ या वयोगटांतील ७२ लोकांनी आत्महत्या केल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. हा वयोगट तरुणांचा वयोगट म्हणून समजला जातो. असं असताना मोठ्या प्रमाणावर तरुणांमध्ये आत्महत्येचं वाढलेले प्रमाण चिंतेचे असून, याबाबत तरुणांमध्ये बदलत्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी त्यांच्यात सकारात्मक वृत्ती जागविण्याची गरज निर्माण झाली आहे.

काेट

तरुणांमधील वाढत्या आत्महत्यांचे प्रमाण नक्कीच चिंताजनक आहे. मात्र, याच वेळी कौटुंबिक सहवास, संवाद, मैत्री आणि बदलत्या शिक्षण पद्धतीचा यात मोठा परिणाम जाणवतो. अशा वेळी प्रत्येकाने आपल्या कुटुंबावर विश्वास ठेवावा आणि बदलत्या परिस्थितीचा सामना सकारात्मक पद्धतीने करावा.

- डाॅ.माेहितकुमार गर्ग, जिल्हा पाेलीस अधीक्षक, रत्नागिरी