शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

गेल्या वर्षभरात रत्नागिरी जिल्ह्यात ११३ जणांनी संपविले आयुष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:30 IST

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आता हळूहळू जाणवायला लागला असून, गेल्या एक वर्षात तरुणांमध्ये आत्महत्या करण्याचे वाढलेले ...

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आता हळूहळू जाणवायला लागला असून, गेल्या एक वर्षात तरुणांमध्ये आत्महत्या करण्याचे वाढलेले प्रमाण चिंतेचे कारण ठरत आहे. सन २०१९ व २०२० मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ११३ आत्महत्येच्या घटना घडल्या असून, त्यात १९ ते ४५ वयोगटांतील ७२ जणांचा समावेश आहे.

काेकणात आत्तापर्यंत आधुनिक जीवनशैलीचा फारसा प्रभाव जाणवला नव्हता. चाकोरीबद्ध आयुष्य जगणारा कोकणी माणूस नेहमीच सकारात्मक विचार करणारा आहे. आलेल्या प्रत्येक संकटाचा सामना करण्याची हिंमत कोकणी माणसाकडे नैसर्गिकदृष्ट्या आहे. त्यामुळे आत्महत्येच्या घटना कोकणात फारशा घडत नव्हत्या. उर्वरित महाराष्ट्रमध्ये अतिवृष्टी किंवा दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढतं. त्यावेळी हवामान बदलामुळे आंबा, काजू, मासळी यांच्या उत्पनावर सातत्याने परिणाम होताना दिसतो. तरीही हतबल झालेला इथला कोकणी माणूस आत्महत्या करताना कधी दिसला नाही. मात्र, गेल्या काही वर्षांपासून कोकणातील जीवनशैलीमध्ये आमूलाग्र बदल घडताना दिसत आहे. या बदलाचे परिणाम युवापिढीवर अधिक होताना दिसत आहेत. हातात आलेली वेगवेगळी गॅजेट्स कदाचित या बदलाचे कारण असावे

.............................

सन २०१९ आणि २०२० या कालावधीत १९ ते ४५ या वयोगटांत वाढलेल्या आत्महत्येचे प्रमाण हे या बदलाचे परिणाम असून, चिंतेत भर टाकणारे आहेत. पोलिसांकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, सन २०१९ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात ५८ आत्महत्या झाल्या. त्यापैकी वय वर्ष ८ ते १८ या वयोगटांत ५, १९ ते ३० वर्षे वयोगटांत तब्बल २०, ३१ ते ४५ वयाेगटांत १७, ४५ ते ६० वयोगटांत ९ आणि ६० पेक्षा पुढील वयोगटांत ७ आत्महत्या झालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहेत.

........................

सन २०२० मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात ५५ आत्महत्यांची नोंद झाली आहे. त्यामध्ये ८ ते १८ वयोगटांतील ०९, १९ते ३० वयोगटांतील तब्बल २१, ३१ ते ४५ वयोगटांतील १४, ४६ ते ६० वयोगटांतील ४ आणि ६० पेक्षा पुढील वयाच्या ७ लोकांनी २०२० मध्ये आत्महत्या केल्याचं निष्पन्न झाल आहे.

२०२० हे वर्ष लाॅकडाऊन वर्ष संबोधले जाते. त्यामुळे या वर्षात या लाॅकडाऊनचा ताणही मोठ्या प्रमाणावर होता. दरम्यान, या दोन वर्षांत १९ ते ४५ या वयोगटांतील ७२ लोकांनी आत्महत्या केल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. हा वयोगट तरुणांचा वयोगट म्हणून समजला जातो. असं असताना मोठ्या प्रमाणावर तरुणांमध्ये आत्महत्येचं वाढलेले प्रमाण चिंतेचे असून, याबाबत तरुणांमध्ये बदलत्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी त्यांच्यात सकारात्मक वृत्ती जागविण्याची गरज निर्माण झाली आहे.

काेट

तरुणांमधील वाढत्या आत्महत्यांचे प्रमाण नक्कीच चिंताजनक आहे. मात्र, याच वेळी कौटुंबिक सहवास, संवाद, मैत्री आणि बदलत्या शिक्षण पद्धतीचा यात मोठा परिणाम जाणवतो. अशा वेळी प्रत्येकाने आपल्या कुटुंबावर विश्वास ठेवावा आणि बदलत्या परिस्थितीचा सामना सकारात्मक पद्धतीने करावा.

- डाॅ.माेहितकुमार गर्ग, जिल्हा पाेलीस अधीक्षक, रत्नागिरी