शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
2
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
3
“प्रशांत जगतापांनी अनेक पक्षांची ऑफर धुडकावून विचारासाठी काँग्रेस मार्ग पत्करला”: वडेट्टीवार
4
"अल्पसंख्याकांवरील अत्याचार खपवून घेणार नाही" २,९०० हून अधिक हल्ल्यांचा पुरावा; भारताचा बांगलादेशला गंभीर इशारा
5
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
6
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
7
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
8
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
9
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
10
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
11
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
12
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
13
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
14
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
15
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
16
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
17
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
18
MNS: गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
19
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
20
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
Daily Top 2Weekly Top 5

गेल्या वर्षभरात रत्नागिरी जिल्ह्यात ११३ जणांनी संपविले आयुष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:30 IST

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आता हळूहळू जाणवायला लागला असून, गेल्या एक वर्षात तरुणांमध्ये आत्महत्या करण्याचे वाढलेले ...

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आता हळूहळू जाणवायला लागला असून, गेल्या एक वर्षात तरुणांमध्ये आत्महत्या करण्याचे वाढलेले प्रमाण चिंतेचे कारण ठरत आहे. सन २०१९ व २०२० मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ११३ आत्महत्येच्या घटना घडल्या असून, त्यात १९ ते ४५ वयोगटांतील ७२ जणांचा समावेश आहे.

काेकणात आत्तापर्यंत आधुनिक जीवनशैलीचा फारसा प्रभाव जाणवला नव्हता. चाकोरीबद्ध आयुष्य जगणारा कोकणी माणूस नेहमीच सकारात्मक विचार करणारा आहे. आलेल्या प्रत्येक संकटाचा सामना करण्याची हिंमत कोकणी माणसाकडे नैसर्गिकदृष्ट्या आहे. त्यामुळे आत्महत्येच्या घटना कोकणात फारशा घडत नव्हत्या. उर्वरित महाराष्ट्रमध्ये अतिवृष्टी किंवा दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढतं. त्यावेळी हवामान बदलामुळे आंबा, काजू, मासळी यांच्या उत्पनावर सातत्याने परिणाम होताना दिसतो. तरीही हतबल झालेला इथला कोकणी माणूस आत्महत्या करताना कधी दिसला नाही. मात्र, गेल्या काही वर्षांपासून कोकणातील जीवनशैलीमध्ये आमूलाग्र बदल घडताना दिसत आहे. या बदलाचे परिणाम युवापिढीवर अधिक होताना दिसत आहेत. हातात आलेली वेगवेगळी गॅजेट्स कदाचित या बदलाचे कारण असावे

.............................

सन २०१९ आणि २०२० या कालावधीत १९ ते ४५ या वयोगटांत वाढलेल्या आत्महत्येचे प्रमाण हे या बदलाचे परिणाम असून, चिंतेत भर टाकणारे आहेत. पोलिसांकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, सन २०१९ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात ५८ आत्महत्या झाल्या. त्यापैकी वय वर्ष ८ ते १८ या वयोगटांत ५, १९ ते ३० वर्षे वयोगटांत तब्बल २०, ३१ ते ४५ वयाेगटांत १७, ४५ ते ६० वयोगटांत ९ आणि ६० पेक्षा पुढील वयोगटांत ७ आत्महत्या झालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहेत.

........................

सन २०२० मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात ५५ आत्महत्यांची नोंद झाली आहे. त्यामध्ये ८ ते १८ वयोगटांतील ०९, १९ते ३० वयोगटांतील तब्बल २१, ३१ ते ४५ वयोगटांतील १४, ४६ ते ६० वयोगटांतील ४ आणि ६० पेक्षा पुढील वयाच्या ७ लोकांनी २०२० मध्ये आत्महत्या केल्याचं निष्पन्न झाल आहे.

२०२० हे वर्ष लाॅकडाऊन वर्ष संबोधले जाते. त्यामुळे या वर्षात या लाॅकडाऊनचा ताणही मोठ्या प्रमाणावर होता. दरम्यान, या दोन वर्षांत १९ ते ४५ या वयोगटांतील ७२ लोकांनी आत्महत्या केल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. हा वयोगट तरुणांचा वयोगट म्हणून समजला जातो. असं असताना मोठ्या प्रमाणावर तरुणांमध्ये आत्महत्येचं वाढलेले प्रमाण चिंतेचे असून, याबाबत तरुणांमध्ये बदलत्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी त्यांच्यात सकारात्मक वृत्ती जागविण्याची गरज निर्माण झाली आहे.

काेट

तरुणांमधील वाढत्या आत्महत्यांचे प्रमाण नक्कीच चिंताजनक आहे. मात्र, याच वेळी कौटुंबिक सहवास, संवाद, मैत्री आणि बदलत्या शिक्षण पद्धतीचा यात मोठा परिणाम जाणवतो. अशा वेळी प्रत्येकाने आपल्या कुटुंबावर विश्वास ठेवावा आणि बदलत्या परिस्थितीचा सामना सकारात्मक पद्धतीने करावा.

- डाॅ.माेहितकुमार गर्ग, जिल्हा पाेलीस अधीक्षक, रत्नागिरी