शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

साकव मोजतोय अखेरच्या घटका

By admin | Updated: November 11, 2014 23:24 IST

मागणी प्रलंबित : हातदे निळंद ग्रामपंचायतीच्या प्रयत्नाना हरताळ

पाचल : राजापूर तालुक्यातील पूर्व विभागात हातदे - मिळंद जोडणारा लोखंडी साकव अखेरच्या घटका मोजत असल्यामुळे त्यावरुन प्रवास करणे जिवावर बेतणार आहे. जिवघेण्या प्रवासाला जिल्हा परिषद जबाबदार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मिळंद हातदे ग्रामपंचायतीने वेळोवेळी पाठपुरावा करुनसुद्धा कोणीच लक्ष न दिल्याने साकवाची दुरवस्था कायम आहे.राजापूर तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेली जामदा खोऱ्यातील हातदे व मिळंद गावे डोंगराळ भागात वसलेली आहेत. या गावांचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. दळणवळणाच्या दृष्टीने हे गाव खूपच मागासलेले आहे. त्याचा परिणाम गावातील इतरही गोष्टींवर झालेला दिसून येतो. नदीपलीकडील हातदे गावची व्यथा तर निराळीच आहे. या गावाला इतर गावांशी संपर्क करण्यासाठी हा मोडका पूलच जवळचा मार्ग आहे.प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर माध्यमिक शिक्षणाची सोय या गावात उपलब्ध नसल्याने मिळंद गावच्या आयरे विद्यालयात, तर ज्युनिअर कॉलेजसाठी पाचलला, सिनीअर कॉलेजसाठी रायपाटण येथे याच मोडक्या पुलावरुन जावे लागते. जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठीही हातदे गावच्या ग्रामस्थांना या पुलाचा वापर करावा लागतो. पर्यायी मार्ग खूपच लांब असल्याने हातदे गावचे ग्रामस्थ व विद्यार्थी जीव मुठीत घेऊन या पुलावरुन प्रवास करत आहेत.जिल्हा परिषद सदस्य याच गावचे आहेत. तरीसुद्धा हा विषय आजपर्यंत मार्गी लागलेला नाही. राजापूर तालुक्यातील या महत्त्वाच्या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. (वार्ताहर)