शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

साकव मोजतोय अखेरच्या घटका

By admin | Updated: November 11, 2014 23:24 IST

मागणी प्रलंबित : हातदे निळंद ग्रामपंचायतीच्या प्रयत्नाना हरताळ

पाचल : राजापूर तालुक्यातील पूर्व विभागात हातदे - मिळंद जोडणारा लोखंडी साकव अखेरच्या घटका मोजत असल्यामुळे त्यावरुन प्रवास करणे जिवावर बेतणार आहे. जिवघेण्या प्रवासाला जिल्हा परिषद जबाबदार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मिळंद हातदे ग्रामपंचायतीने वेळोवेळी पाठपुरावा करुनसुद्धा कोणीच लक्ष न दिल्याने साकवाची दुरवस्था कायम आहे.राजापूर तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेली जामदा खोऱ्यातील हातदे व मिळंद गावे डोंगराळ भागात वसलेली आहेत. या गावांचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. दळणवळणाच्या दृष्टीने हे गाव खूपच मागासलेले आहे. त्याचा परिणाम गावातील इतरही गोष्टींवर झालेला दिसून येतो. नदीपलीकडील हातदे गावची व्यथा तर निराळीच आहे. या गावाला इतर गावांशी संपर्क करण्यासाठी हा मोडका पूलच जवळचा मार्ग आहे.प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर माध्यमिक शिक्षणाची सोय या गावात उपलब्ध नसल्याने मिळंद गावच्या आयरे विद्यालयात, तर ज्युनिअर कॉलेजसाठी पाचलला, सिनीअर कॉलेजसाठी रायपाटण येथे याच मोडक्या पुलावरुन जावे लागते. जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठीही हातदे गावच्या ग्रामस्थांना या पुलाचा वापर करावा लागतो. पर्यायी मार्ग खूपच लांब असल्याने हातदे गावचे ग्रामस्थ व विद्यार्थी जीव मुठीत घेऊन या पुलावरुन प्रवास करत आहेत.जिल्हा परिषद सदस्य याच गावचे आहेत. तरीसुद्धा हा विषय आजपर्यंत मार्गी लागलेला नाही. राजापूर तालुक्यातील या महत्त्वाच्या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. (वार्ताहर)