शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
2
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
3
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
4
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
5
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
6
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
7
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
8
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
13
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
14
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
15
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
16
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
17
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
18
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
20
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!

लाेकमंच : काेराेना हटाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:23 IST

दोन-तीनच तास व दोन-तीनच दुकाने समजा सुरु असतील, तर तिकडे झुंबड उडणारच. तेव्हा ‘गर्दी’ होऊ न देणे हा विषय ...

दोन-तीनच तास व दोन-तीनच दुकाने समजा सुरु असतील, तर तिकडे झुंबड उडणारच. तेव्हा ‘गर्दी’ होऊ न देणे हा विषय महत्त्वाचा मानावा. व्यापारच बंद हा विषय असू नये. लॉकडाऊनला पर्याय आहेत, पण लक्षात कोण घेतो? पोलिसांवर सगळा भार, ताण देण्यापेक्षा वचक्या युवकांची स्कॉड्स नेमणे ही काळाची गरज आहे. हजार - पाचशे इतका मामुली दंड न करता, दंड थोपटून ‘स्कॉड्स’ना उभे राहावे लागेल. रोज लाखो रुपयांचा दंड जमा झाल्यास, त्यातून स्कॉड्सचा पगार देता येईल. हा विषय ‘प्रमाणपत्रांचा’ नसून मानधनाचा आहे. अर्थात टाळेबंदी अपरिहार्य वाटत असेल तरची ही बात!

धार्मिक श्रद्धा हा प्रत्येकाचा घटनादत्त हक्क आहे, पण देश वाचवताना त्याचा सार्वजनिक अविष्कार, सामुदायिक उत्सव पुढील दोन वर्षे तरी करता येणार नाही. त्यात मोठी जोखीम आहे. कुंभमेळ्याचे उदाहरण ताजे आहे.

कोरोनाची जेव्हा लाट येते तेव्हा मोबाईलवर सार्वजनिक ठिकाणी बोलायची पूर्ण बंदी हवी. फोनवर बोलण्यासाठी मास्क नाका-तोंडावरुन खाली सरकवला जातो, हे आपण रोजच पाहतो. लोक फोनवर महत्त्वाचे काही बोलत नसतात, हा विषय बाजूला ठेवू. मुळात त्यांनी मास्क हटविणेच कोरोनाचा जोर असताना चुकीचे आहे.

कोरोना प्रभाव खरोखरच कमी करायचा असेल तर अलिप्त जीवनाची पद्धतशीरपणे सवय करुन घ्यावी लागेल व पारंपरिक रितभात, कर्मकांड यांना नकार द्यावा लागेल. जोपर्यंत पारंपरिक जीवनाचे प्रस्थ आहे, तोपर्यंत कोरोना जाणार नाही. प्रतिगामी महाराष्ट्र विचारवंतांनाच गोळ्या घालून खतम करतो. मग कसे होणार? विचार मांडणाऱ्यांना जे दहशत - दडपणाखाली जगावे लागते, त्याविरोधात सरकारने काय केले? काही नाही! तेव्हा मार्गदर्शकांना अभय द्यावे लागेल.

ही लढाई, कोरोनाचे चीनने लादलेले हे जागतिक युद्ध जिंकताना केवळ ‘इंडिया’चा ‘ऑनलाईन’ विचार झाला. ‘भारताचा’ ‘ऑफलाईन’ विचार केला, तर ही लढाई लवकर जिंकता येईल. लसीकरण ऑफलाईन होणे ही आजची, उद्याची गरज नाही.

कोरोनाला दूर पळवताना मतांचे राजकारण व लोकांना खुश ठेवण्याची वृत्ती वारंवार आड येणार आहे. तिसरी लाट वेगाने पसरु लागल्यास लष्कराची मदत घेण्यास शासनाने विलंब करु नये. लष्कर कुणालाही ओळखत नाही. त्यामुळे ‘भेदभाव’ होणार नाही.

दैववादी मानसिकता पराभूत व नकारवादी असते. त्याऐवजी मानवकेंद्रीत प्रयत्नवाद वाढवावा लागेल. कोकणातील लेखकांकडून वैचारिक अपेक्षा नाहीत, पण पत्रकारांकडून आहेत. जर पुढारलेल्या काळाशी सुसंगत विचारांना स्पेसच मिळाली नाही, तर प्रबोधन प्रक्रिया बंद पडेल व त्यातून अनर्थ वाढत जाईल, यात शंका नाही.

समाजमाध्यमांवरील धुमाकूळ थांबवण्यातही या देशातील व्यवस्था यशस्वी झाली नाही. गोंधळाचे वातावरण, संभ्रम निर्माण करणे हा देशद्रोह का मानू नये? असा मुद्दा आहे. प्रत्येक गोष्ट फार गोड, मऊ पद्धतीने घेतली जात आहे. सगळ्यांची मने राखून, सांभाळून महायुद्ध जिंकता येईल, असे कुणाला वाटत असेल, तर तोही भ्रमच ठरणार आहे!

- माधव गवाणकर, दापोली