शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

कोकणला हवे पाण्याचे नियोजन हवे

By admin | Updated: October 21, 2014 23:37 IST

कोट्यवधींचा खर्च : पावसावर अवलंबून असलेले क्षेत्र मोठे

एजाज पटेल- फुणगूस -उन्हाळा सुरु झाला की पाणीटंचाईची समस्या डोके वर काढू लागते. या समस्येवर मात करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करुन शासनस्तरावर प्रयत्न केले जातात. परंतु ते घटकेचे घड्याळ असल्याने मूळ दुखणे कमी होत नाही. खऱ्या अर्थाने पाणीटंचाईवर मात करायची असेल तर वाया जाणारे पाणी अडवणे, जिरवणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे काटेकोर नियोजन आवश्यक आहे. जिल्ह्यात पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतीचे क्षेत्र मोठे आहे.पर्जन्यमानानुसार पिकात बदल केला असला तरी पावसाच्या लहरी कारभारामुळे हे वेळापत्रक बिघडते. परिणामी हक्काची पिकेही वाया जातात. पाण्याची पातळी वाढवण्यासाठी जलपुनर्भरणा सारख्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. मात्र खेडोपाड्यापर्यंत ही योजना अजूनही पाहिजे त्या प्रमाणात पूर्णपणे रुजलेली नाही. अजूनही ग्रामीण भागात अनेक गावात जलपुनर्भरण म्हणजे काय ते माहीतच नाही. पाणीटंचाईसारख्या महत्वाच्या प्रश्नाबाबतची ही उदासीनता संताप आणणारी आहे. कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे, माती बंधारे, गावतळी अर्ध बांध याकडे लक्ष दिले गेले नाही. काही ठिकाणी खर्च होऊनही कामे न झालेली तसेच अपूर्ण ज्या ठिकाणी कामे झाली त्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते.या सर्व गोष्टी योग्यरितीने न केल्यामुळे जिल्ह्यात उपयुक्तता असूनही उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ अनेक वाड्यावस्त्यांवर येत आहे. यासाठी उन्हाळ्यातील पाणीटंचाई लक्षात घेता आताच अधिकारी स्वयंसेवी संस्था यांनी एकत्रित प्रयत्न केल्यास गाव पाणीटंचाई मुक्त होऊ शकतो. यासाठी उपलब्ध जलस्रोतांचे काटेकोर नियोजन आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. कोकणात येणारा काळ पाण्यासाठी संघर्षाचा ठरेल असे चिन्ह आहे. मात्र यातही पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विशेष प्रयत्न होणे आवश्यक आहे. कोकणातील शेती पावसावर अवलंबून जलपुनर्र भरण योजना आवश्यक पाण्याची पातळी वाढण्यासाठी उपाययोजना आवश्यक ग्रामीण भागात प्रबोधन हवे कोल्हापूरी बंधारे, गावतळी अर्ध बांध, पाणी अडवा , पाणी जिरवा