शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

कोकणला हवे पाण्याचे नियोजन हवे

By admin | Updated: October 21, 2014 23:37 IST

कोट्यवधींचा खर्च : पावसावर अवलंबून असलेले क्षेत्र मोठे

एजाज पटेल- फुणगूस -उन्हाळा सुरु झाला की पाणीटंचाईची समस्या डोके वर काढू लागते. या समस्येवर मात करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करुन शासनस्तरावर प्रयत्न केले जातात. परंतु ते घटकेचे घड्याळ असल्याने मूळ दुखणे कमी होत नाही. खऱ्या अर्थाने पाणीटंचाईवर मात करायची असेल तर वाया जाणारे पाणी अडवणे, जिरवणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे काटेकोर नियोजन आवश्यक आहे. जिल्ह्यात पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतीचे क्षेत्र मोठे आहे.पर्जन्यमानानुसार पिकात बदल केला असला तरी पावसाच्या लहरी कारभारामुळे हे वेळापत्रक बिघडते. परिणामी हक्काची पिकेही वाया जातात. पाण्याची पातळी वाढवण्यासाठी जलपुनर्भरणा सारख्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. मात्र खेडोपाड्यापर्यंत ही योजना अजूनही पाहिजे त्या प्रमाणात पूर्णपणे रुजलेली नाही. अजूनही ग्रामीण भागात अनेक गावात जलपुनर्भरण म्हणजे काय ते माहीतच नाही. पाणीटंचाईसारख्या महत्वाच्या प्रश्नाबाबतची ही उदासीनता संताप आणणारी आहे. कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे, माती बंधारे, गावतळी अर्ध बांध याकडे लक्ष दिले गेले नाही. काही ठिकाणी खर्च होऊनही कामे न झालेली तसेच अपूर्ण ज्या ठिकाणी कामे झाली त्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते.या सर्व गोष्टी योग्यरितीने न केल्यामुळे जिल्ह्यात उपयुक्तता असूनही उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ अनेक वाड्यावस्त्यांवर येत आहे. यासाठी उन्हाळ्यातील पाणीटंचाई लक्षात घेता आताच अधिकारी स्वयंसेवी संस्था यांनी एकत्रित प्रयत्न केल्यास गाव पाणीटंचाई मुक्त होऊ शकतो. यासाठी उपलब्ध जलस्रोतांचे काटेकोर नियोजन आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. कोकणात येणारा काळ पाण्यासाठी संघर्षाचा ठरेल असे चिन्ह आहे. मात्र यातही पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विशेष प्रयत्न होणे आवश्यक आहे. कोकणातील शेती पावसावर अवलंबून जलपुनर्र भरण योजना आवश्यक पाण्याची पातळी वाढण्यासाठी उपाययोजना आवश्यक ग्रामीण भागात प्रबोधन हवे कोल्हापूरी बंधारे, गावतळी अर्ध बांध, पाणी अडवा , पाणी जिरवा