शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
3
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
4
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
5
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
6
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
7
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
8
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
9
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
10
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
11
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
12
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
13
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
14
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!
15
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
16
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?
17
“शेतकरी कर्जमाफी फाइलवर सही करण्यास फडणवीस-शिंदे-पवारांच्या हाताला लकवा मारला आहे का?”: सपकाळ
18
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
19
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
20
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स

कोकणला हवे पाण्याचे नियोजन हवे

By admin | Updated: October 21, 2014 23:37 IST

कोट्यवधींचा खर्च : पावसावर अवलंबून असलेले क्षेत्र मोठे

एजाज पटेल- फुणगूस -उन्हाळा सुरु झाला की पाणीटंचाईची समस्या डोके वर काढू लागते. या समस्येवर मात करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करुन शासनस्तरावर प्रयत्न केले जातात. परंतु ते घटकेचे घड्याळ असल्याने मूळ दुखणे कमी होत नाही. खऱ्या अर्थाने पाणीटंचाईवर मात करायची असेल तर वाया जाणारे पाणी अडवणे, जिरवणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे काटेकोर नियोजन आवश्यक आहे. जिल्ह्यात पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतीचे क्षेत्र मोठे आहे.पर्जन्यमानानुसार पिकात बदल केला असला तरी पावसाच्या लहरी कारभारामुळे हे वेळापत्रक बिघडते. परिणामी हक्काची पिकेही वाया जातात. पाण्याची पातळी वाढवण्यासाठी जलपुनर्भरणा सारख्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. मात्र खेडोपाड्यापर्यंत ही योजना अजूनही पाहिजे त्या प्रमाणात पूर्णपणे रुजलेली नाही. अजूनही ग्रामीण भागात अनेक गावात जलपुनर्भरण म्हणजे काय ते माहीतच नाही. पाणीटंचाईसारख्या महत्वाच्या प्रश्नाबाबतची ही उदासीनता संताप आणणारी आहे. कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे, माती बंधारे, गावतळी अर्ध बांध याकडे लक्ष दिले गेले नाही. काही ठिकाणी खर्च होऊनही कामे न झालेली तसेच अपूर्ण ज्या ठिकाणी कामे झाली त्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते.या सर्व गोष्टी योग्यरितीने न केल्यामुळे जिल्ह्यात उपयुक्तता असूनही उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ अनेक वाड्यावस्त्यांवर येत आहे. यासाठी उन्हाळ्यातील पाणीटंचाई लक्षात घेता आताच अधिकारी स्वयंसेवी संस्था यांनी एकत्रित प्रयत्न केल्यास गाव पाणीटंचाई मुक्त होऊ शकतो. यासाठी उपलब्ध जलस्रोतांचे काटेकोर नियोजन आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. कोकणात येणारा काळ पाण्यासाठी संघर्षाचा ठरेल असे चिन्ह आहे. मात्र यातही पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विशेष प्रयत्न होणे आवश्यक आहे. कोकणातील शेती पावसावर अवलंबून जलपुनर्र भरण योजना आवश्यक पाण्याची पातळी वाढण्यासाठी उपाययोजना आवश्यक ग्रामीण भागात प्रबोधन हवे कोल्हापूरी बंधारे, गावतळी अर्ध बांध, पाणी अडवा , पाणी जिरवा