शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

किंजळे गाव आजही विजेविना

By admin | Updated: April 14, 2016 21:43 IST

बुडीत क्षेत्र : लोकवस्ती नाही; जिल्ह्यात १५३९ गावांमध्ये पोहोचली वीज

रत्नागिरी : जिल्ह्यातील विद्युत विस्तार झपाट्याने वाढला आहे. जिल्ह्यात एकूण १५३९ गावांमध्ये शंभर टक्के विद्युतीकरण झाले असून, ४४ उपकेंद्रांतून वीजपुरवठा केला जात आहे. त्यामध्ये बुडीत क्षेत्रात मोडत असलेल्या किंजळे गावी वस्ती नसल्याने तेथे अद्याप वीज पोहोचली नसल्याची माहिती महावितरणांच्या सुत्रांनी दिली.जिल्ह्यात महावितरण कंपनीचे सुमारे ५ लाख ग्राहक आहेत. महिन्याला वीजग्राहकांत सरासरी दोन हजारची वाढ होते. त्यांना तत्पर सुविधा देण्याचे काम महावितरण करत आहे. गेल्या काही वर्षांपासून विद्युत जाळे झपाट्याने वाढत जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात १०० टक्के विद्युतीकरण झाले असल्याचे आहे.जिल्ह्यात एकूण १५३९ गावे असून, गावोगावी वीज पोहोचली आहे. खेड्यापाड्यात वीज पोहोचल्याने उद्योगधंद्याला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. रत्नागिरी तालुक्याला ११ उपकेद्रांतून वीज पुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात ३३ केव्हीचे ९८४ किलोमीटरचे जाळे पसरलेले आहे, ११ केव्हीची ५ हजार ४६८ किलोमीटरची लाईन आहे, तर लघुदाब वाहिनीचे सुमारे ९ हजार २८३ किलोमीटरचे जाळे पसरले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील किजळे हे गाव गडनदी प्रकल्पात बुडीत क्षेत्रात असल्याने या गावातील राहणाऱ्या लोकांनी स्थलांतर केले होते. त्यामुळे जिल्ह्यातील १५३९ गावांमध्ये विद्युतीकरण झाले. परंतु वस्तीअभावी किंजळे गावी अद्याप वीज पोहोचली नाही. रत्नागिरीमध्ये ११ उपकेंद्र, संगमेश्वर ४, राजापूर ५, लांजा ३, चिपळूण ७, गुहागर ३, खेड ४, दापोली ५ व मंडणगड येथे २ अशी मिळून रत्नागिरी जिल्ह्यात ४४ उपकेंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात अखंडपणे वीजपुरवठा सुरू असल्याची माहिती महावितरणाच्या सुत्रांनी दिली. (वार्ताहर)ग्रामीण भागात जाळे : तब्बल ४४ उपकेंद्रातून वीजपुरवठाजिल्ह्यातील ग्रामीण भागापर्यंत विजेचे जाळे पोहोचलेले आहे. तब्बल ४४ उपकेंद्रातून वीजपुरवठा केला जात असून, महावितरणकडून अखंडपणे हा वीजपुरवठा केला जात आहे.शेतकऱ्यांना शेतीपंपरत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या सात वर्षात सुमारे ३ हजार ५९६ शेतीपंप वीजजोडण्या मंजूर करण्यात आल्या असून, वर्षाला सरासरी ५०० शेतकऱ्यांना शेतीपंप वीज जोडण्यात देण्यात आल्या असल्याची माहिती महावितरणाच्या सुत्रांनी दिली.