शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव स्पर्धेतून बाहेर!
2
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
3
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
4
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
5
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
6
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
7
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
8
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
9
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
10
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
11
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
12
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
13
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
14
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
15
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
16
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
17
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
18
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
19
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
20
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत

किंजळे गाव आजही विजेविना

By admin | Updated: April 14, 2016 21:43 IST

बुडीत क्षेत्र : लोकवस्ती नाही; जिल्ह्यात १५३९ गावांमध्ये पोहोचली वीज

रत्नागिरी : जिल्ह्यातील विद्युत विस्तार झपाट्याने वाढला आहे. जिल्ह्यात एकूण १५३९ गावांमध्ये शंभर टक्के विद्युतीकरण झाले असून, ४४ उपकेंद्रांतून वीजपुरवठा केला जात आहे. त्यामध्ये बुडीत क्षेत्रात मोडत असलेल्या किंजळे गावी वस्ती नसल्याने तेथे अद्याप वीज पोहोचली नसल्याची माहिती महावितरणांच्या सुत्रांनी दिली.जिल्ह्यात महावितरण कंपनीचे सुमारे ५ लाख ग्राहक आहेत. महिन्याला वीजग्राहकांत सरासरी दोन हजारची वाढ होते. त्यांना तत्पर सुविधा देण्याचे काम महावितरण करत आहे. गेल्या काही वर्षांपासून विद्युत जाळे झपाट्याने वाढत जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात १०० टक्के विद्युतीकरण झाले असल्याचे आहे.जिल्ह्यात एकूण १५३९ गावे असून, गावोगावी वीज पोहोचली आहे. खेड्यापाड्यात वीज पोहोचल्याने उद्योगधंद्याला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. रत्नागिरी तालुक्याला ११ उपकेद्रांतून वीज पुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात ३३ केव्हीचे ९८४ किलोमीटरचे जाळे पसरलेले आहे, ११ केव्हीची ५ हजार ४६८ किलोमीटरची लाईन आहे, तर लघुदाब वाहिनीचे सुमारे ९ हजार २८३ किलोमीटरचे जाळे पसरले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील किजळे हे गाव गडनदी प्रकल्पात बुडीत क्षेत्रात असल्याने या गावातील राहणाऱ्या लोकांनी स्थलांतर केले होते. त्यामुळे जिल्ह्यातील १५३९ गावांमध्ये विद्युतीकरण झाले. परंतु वस्तीअभावी किंजळे गावी अद्याप वीज पोहोचली नाही. रत्नागिरीमध्ये ११ उपकेंद्र, संगमेश्वर ४, राजापूर ५, लांजा ३, चिपळूण ७, गुहागर ३, खेड ४, दापोली ५ व मंडणगड येथे २ अशी मिळून रत्नागिरी जिल्ह्यात ४४ उपकेंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात अखंडपणे वीजपुरवठा सुरू असल्याची माहिती महावितरणाच्या सुत्रांनी दिली. (वार्ताहर)ग्रामीण भागात जाळे : तब्बल ४४ उपकेंद्रातून वीजपुरवठाजिल्ह्यातील ग्रामीण भागापर्यंत विजेचे जाळे पोहोचलेले आहे. तब्बल ४४ उपकेंद्रातून वीजपुरवठा केला जात असून, महावितरणकडून अखंडपणे हा वीजपुरवठा केला जात आहे.शेतकऱ्यांना शेतीपंपरत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या सात वर्षात सुमारे ३ हजार ५९६ शेतीपंप वीजजोडण्या मंजूर करण्यात आल्या असून, वर्षाला सरासरी ५०० शेतकऱ्यांना शेतीपंप वीज जोडण्यात देण्यात आल्या असल्याची माहिती महावितरणाच्या सुत्रांनी दिली.