शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
4
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
5
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
6
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
7
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
8
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
9
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
10
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
11
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
12
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
13
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
14
श्वेता तिवारीला एक्स पतीने कारमध्ये एका व्यक्तीसोबत पकडलं होतं रंगेहाथ, राजा चौधरीचा खुलासा
15
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
16
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
17
शुबमन गिलचा एक मेसेज अन् तो सासरवाडीतून थेट टीम इंडियाच्या ताफ्यात (VIDEO)
18
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Wimbledon 2025 : नोव्हाक जोकोविच विक्रमी २५ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचा डाव साधणार का?
20
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर

किंजळे गाव आजही विजेविना

By admin | Updated: April 14, 2016 21:43 IST

बुडीत क्षेत्र : लोकवस्ती नाही; जिल्ह्यात १५३९ गावांमध्ये पोहोचली वीज

रत्नागिरी : जिल्ह्यातील विद्युत विस्तार झपाट्याने वाढला आहे. जिल्ह्यात एकूण १५३९ गावांमध्ये शंभर टक्के विद्युतीकरण झाले असून, ४४ उपकेंद्रांतून वीजपुरवठा केला जात आहे. त्यामध्ये बुडीत क्षेत्रात मोडत असलेल्या किंजळे गावी वस्ती नसल्याने तेथे अद्याप वीज पोहोचली नसल्याची माहिती महावितरणांच्या सुत्रांनी दिली.जिल्ह्यात महावितरण कंपनीचे सुमारे ५ लाख ग्राहक आहेत. महिन्याला वीजग्राहकांत सरासरी दोन हजारची वाढ होते. त्यांना तत्पर सुविधा देण्याचे काम महावितरण करत आहे. गेल्या काही वर्षांपासून विद्युत जाळे झपाट्याने वाढत जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात १०० टक्के विद्युतीकरण झाले असल्याचे आहे.जिल्ह्यात एकूण १५३९ गावे असून, गावोगावी वीज पोहोचली आहे. खेड्यापाड्यात वीज पोहोचल्याने उद्योगधंद्याला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. रत्नागिरी तालुक्याला ११ उपकेद्रांतून वीज पुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात ३३ केव्हीचे ९८४ किलोमीटरचे जाळे पसरलेले आहे, ११ केव्हीची ५ हजार ४६८ किलोमीटरची लाईन आहे, तर लघुदाब वाहिनीचे सुमारे ९ हजार २८३ किलोमीटरचे जाळे पसरले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील किजळे हे गाव गडनदी प्रकल्पात बुडीत क्षेत्रात असल्याने या गावातील राहणाऱ्या लोकांनी स्थलांतर केले होते. त्यामुळे जिल्ह्यातील १५३९ गावांमध्ये विद्युतीकरण झाले. परंतु वस्तीअभावी किंजळे गावी अद्याप वीज पोहोचली नाही. रत्नागिरीमध्ये ११ उपकेंद्र, संगमेश्वर ४, राजापूर ५, लांजा ३, चिपळूण ७, गुहागर ३, खेड ४, दापोली ५ व मंडणगड येथे २ अशी मिळून रत्नागिरी जिल्ह्यात ४४ उपकेंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात अखंडपणे वीजपुरवठा सुरू असल्याची माहिती महावितरणाच्या सुत्रांनी दिली. (वार्ताहर)ग्रामीण भागात जाळे : तब्बल ४४ उपकेंद्रातून वीजपुरवठाजिल्ह्यातील ग्रामीण भागापर्यंत विजेचे जाळे पोहोचलेले आहे. तब्बल ४४ उपकेंद्रातून वीजपुरवठा केला जात असून, महावितरणकडून अखंडपणे हा वीजपुरवठा केला जात आहे.शेतकऱ्यांना शेतीपंपरत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या सात वर्षात सुमारे ३ हजार ५९६ शेतीपंप वीजजोडण्या मंजूर करण्यात आल्या असून, वर्षाला सरासरी ५०० शेतकऱ्यांना शेतीपंप वीज जोडण्यात देण्यात आल्या असल्याची माहिती महावितरणाच्या सुत्रांनी दिली.