शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

अपहरण केलेल्या सुरतच्या व्यापाऱ्याची रत्नागिरीतून सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:27 IST

रत्नागिरी : रत्नागिरीतील एका बंगल्यात सुमारे ३० कोटी रुपयांच्या खंडणीसाठी सुरतमधील व्यावसायिकाचे अपहरण करून ठेवणाऱ्या बिहारच्या कुख्यात चंदनसोनार टोळीतील ...

रत्नागिरी : रत्नागिरीतील एका बंगल्यात सुमारे ३० कोटी रुपयांच्या खंडणीसाठी सुरतमधील व्यावसायिकाचे अपहरण करून ठेवणाऱ्या बिहारच्या कुख्यात चंदनसोनार टोळीतील सातजणांच्या गुजरातच्या दहशतवादी विरोधी पथकाने मुसक्या आवळल्या. ही कारवाई सोमवार, २९ मार्च रोजी रत्नागिरीत करण्यात आली. मात्र, याबाबतची काेणतीच माहिती स्थानिक पाेलिसांना न देता अत्यंत गुप्तपणे ही कारवाई करण्यात आली.

जितू पटेल (रा. उमरगाम, गुजरात) असे अपहरण करण्यात आलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. यात पप्पू चौधरी, दीपक ऊर्फ अरविंद यादव, अजमल हुसेन अन्सारी, अयाज, मोबीन ऊर्फ टकल्या, इशाक मुजावर, जिज्ञेशकुमार ऊर्फ बबलूकुमार यादव अशी अटक करण्यात आलेल्या चंदनसोनार टोळीतील सातजणांची नावे आहेत. पटेल यांचा उमरगाम येथे मोठा व्यवसाय आहे. २२ मार्च रोजी ते आपल्या मित्रांना भेटून परतत असताना चंदनसोनार टोळीने त्यांच्या गाडीला धडक देऊन त्यांचे अपहरण केले होते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना फोन करून त्यांच्याकडे ३० कोटींची खंडणी मागितली होती. याबाबत त्यांच्या नातेवाइकांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती.

त्यानंतर उमरगाम पोलिसांसह गुजरात एटीएस, सुरत शहर पोलीस, गुन्हे शाखा आणि महाराष्ट्रातील मीरा भाईंदर वलसाड पोलिसांनी संयुक्तपणे टीम तयार करून तपासाला सुरुवात केली, तर चंदनसोनार टोळीने जितू पटेल यांचे अपहरण केल्यानंतर त्यांना प्रथम वलसाड येथे नेले. त्यानंतर त्यांना रत्नागिरीतील एका बंगल्यात डांबून ठेवण्यात आले होते. याबाबत पोलिसांच्या टीमला माहिती मिळताच त्यांनी जितू पटेल यांची त्या बंगल्यातून सुटका करत सातजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील दोन कारही जप्त करण्यात आल्या आहेत.

चाैकट

‘ताे’ बंगला काेणाचा

सुरत येथून अपहरण करून आणलेल्या व्यावसायिकाला रत्नागिरीतील एका बंगल्यात ठेवण्यात आले हाेते. हा बंगला नेमका काेणाचा आहे, याचा शाेध सुरू आहे. तसेच या बंगल्याची माहिती या टाेळीला कशी मिळाली, त्यांनी त्याच बंगल्याचा आधार का घेतला या प्रश्नांची उत्तरे शाेधण्यात येत आहेत. दरम्यान, या प्रकरणात रत्नागिरीतील काेणी स्थानिकाने मदत केली आहे का, याचाही शाेध घेण्यात येणार आहे.