शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
2
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
3
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
4
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
5
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
6
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
7
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
8
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
9
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
10
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
11
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
12
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
13
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
14
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
15
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
16
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
17
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
18
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
19
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
20
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार

खोरनिनको धरण भरले,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:42 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क लांजा : पर्यटकांना भुरळ पाडणारे लांजा तालुक्यातील खोरनिनको धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, अतिवृष्टीमुळे धरणाच्या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

लांजा : पर्यटकांना भुरळ पाडणारे लांजा तालुक्यातील खोरनिनको धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, अतिवृष्टीमुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्‍यता असल्याने पर्यटक आणि लोकांनी धरणावर जाऊ नये, असे आवाहन लघू पाटबंधारे विभाग साहाय्यक अभियंता श्रेणी-१ वैभव शिंदे यांनी केले आहे. धरण भरल्यामुळे पाण्याचा विसर्ग म्हणजेच मानवनिर्मित धबधबा प्रवाहित झाला आहे.

लांजा तालुक्यातील खोरनिनको येथे मुचकुंदी नदीवर बांधण्यात आलेले नयनरम्य धरण आणि येथील मानवनिर्मित धबधबा हा पर्यटकांना भुरळ पाडणारा असल्याने येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. गेल्या चार ते पाच वर्षांत या खोरनिनको धरण आणि धबधबा या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यासह सिंधुदुर्ग, कोल्हापूर येथील येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या हे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, या धरणात २३.२२ द.ल.घ.मी. इतका पाणीसाठा आहे. धरण भरल्यामुळे कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

सद्य:स्थितीत हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे खोरनिनको गाव आणि मुचकुंदी नदी किनाऱ्यालगतच्या गावांनी सतर्क राहण्याची गरज आहे. याबरोबरच अतिमुसळधार पावसामुळे धरणाच्या आणि मानवनिर्मित धबधब्याच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असून संभाव्य दुर्घटना घडू नये, या दृष्टीने पर्यटक आणि लोकांनी धरणावर जाऊ नये, असे आवाहन वैभव शिंदे यांनी केले आहे.