शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

उंबरशेतमध्ये कांदळवनाची होतेय कत्तल

By admin | Updated: April 4, 2015 00:10 IST

धनदांडग्यांना मोकळे रान : महसूल, वनविभागाचे कानावर हात

मंडणगड : उंबरशेत बंदर या ठिकाणी अनेक कारणांसाठी कांदळवनाची मोठ्या प्रमाणावर तोड झाली आहे. या ठिकाणी सुमारे एक किलोमीटरच्या अंतरात रस्ता तयार करण्यासाठी मॅग्रो व अन्य संरक्षित समुद्री वनस्पतींच्या शेकडो झाडांची कत्तल झालेली असताना महसूल व वन विभागाला झाल्या प्रकाराची वास्तवदर्शी माहिती नसल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे़ यासंदर्भात घटनास्थळ व ग्रामस्थांमध्ये सुरु असलेल्या चर्चेतून मिळालेल्या माहितीनुसार उंबरशेत बंदर येथे एक कंपनी (जिचे नाव कळू शकलेले नाही) अजूनही माहीत नसलेल्या कारणांसाठी गेल्या दीड महिन्यापासून खाडी किनाऱ्यालगत रस्ता तयार करण्याचे काम करीत आहे. त्यासाठी मुख्य रस्त्याला लागून नऊ मीटर रूंदीचा व सुमारे एक किलोमीटर लांबीचा दगड मातीची भर टाकून रस्ता तयार करण्यात आला आहे़ सावित्री खाडीलगत असलेल्या कांदवळनाच्या रानातून सुमारे आठशे ते नऊशे मीटर लांबीचा रस्ता तयार करण्यात आला आहे. त्यासाठी सुमारे तीस ते चाळीस वर्षांपूर्वीची मॅग्रोज, काड आमटी व अन्य दुर्मीळ जातींच्या वृक्षांची तोड करण्यात आली आहे. याशिवाय कांदळवनाची तोड करून जेटी बनवण्यासाठी या रस्त्याला शंभर मीटरचा बायपास रस्ता नदीपाराजवळ जाण्यासाठी तयार करण्यात आला आहे़ हा रस्ता तयार करण्यासाठी अत्याधुनिक मशिनरीच्या साह्याने महिनाभर जोरात काम सुरु आहे. यासंदर्भात प्रशासकीय यंत्रणेकडून कोणतीही माहिती उपलब्ध होत नाही. ग्रामस्थांनी याबाबत अद्याप कोणतीही तक्रार केलेली नाही. गावचे पोलीसपोटील व तलाठी यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार उंबरशेत बंदर या ठिकाणी शिपिंग कंपनीसाठी रस्ता होत होता. यासंदर्भात ग्रामस्थांना कल्पना होती. पण, कोणीही ग्रामस्थ तक्रारीसाठी पुढे येत नव्हता. सुमारे पंधरा दिवसांपूर्वी मातीचे उत्खनन होत असल्याची तक्रार झाली. यासंदर्भात तलाठी पंचनाम्याला जाग्यावर गेले असता येथील रस्त्याच्या कामाची मशिनरी जाग्यावरून हलविण्यात आली. प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी पोहोचूनही केवळ माती उत्खननाचा पंचनामा करण्यात आला. कांदळवनाच्या तोडीकडे महसूल प्रशासनाने अद्याप लक्ष देलेले नाही अथवा वनविभागाचे कर्मचारीही जागेवर पोहोचलेले नाहीत. महसूल विभाग सखोल पंचनामा करणार असल्याची माहिती मिळाली आहे.़ महसूल विभागाने संबंधित ठिकाणी ५०० ब्रास मातीचा उपसा करण्यासाठी कंपनी व्यवस्थापकांनी काही रक्कम भरल्याचे पंचनामा केल्यानंतर पुढे आले आहे. स्थानिक ग्रामस्थ, पोलीसपाटील, महसूल विभाग, वनविभाग या सर्वांचीच मिलीभगत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तोडीचे प्रकरण गंभीर असून, अनेक विकासकांनी खाडी किनाऱ्यालगत असलेले आपले प्ल्ॉाट्स डेव्हलप करण्यासाठी कांदळवने साफ करुन त्या ठिकाणी भराव केला आहे. अधिकारी लक्ष देत नसल्याने या सर्व प्रकाराची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्याची मागणी परिसरातून केली जात आहे. करावी. (प्रतिनिधी)