शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

उंबरशेतमध्ये कांदळवनाची होतेय कत्तल

By admin | Updated: April 4, 2015 00:10 IST

धनदांडग्यांना मोकळे रान : महसूल, वनविभागाचे कानावर हात

मंडणगड : उंबरशेत बंदर या ठिकाणी अनेक कारणांसाठी कांदळवनाची मोठ्या प्रमाणावर तोड झाली आहे. या ठिकाणी सुमारे एक किलोमीटरच्या अंतरात रस्ता तयार करण्यासाठी मॅग्रो व अन्य संरक्षित समुद्री वनस्पतींच्या शेकडो झाडांची कत्तल झालेली असताना महसूल व वन विभागाला झाल्या प्रकाराची वास्तवदर्शी माहिती नसल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे़ यासंदर्भात घटनास्थळ व ग्रामस्थांमध्ये सुरु असलेल्या चर्चेतून मिळालेल्या माहितीनुसार उंबरशेत बंदर येथे एक कंपनी (जिचे नाव कळू शकलेले नाही) अजूनही माहीत नसलेल्या कारणांसाठी गेल्या दीड महिन्यापासून खाडी किनाऱ्यालगत रस्ता तयार करण्याचे काम करीत आहे. त्यासाठी मुख्य रस्त्याला लागून नऊ मीटर रूंदीचा व सुमारे एक किलोमीटर लांबीचा दगड मातीची भर टाकून रस्ता तयार करण्यात आला आहे़ सावित्री खाडीलगत असलेल्या कांदवळनाच्या रानातून सुमारे आठशे ते नऊशे मीटर लांबीचा रस्ता तयार करण्यात आला आहे. त्यासाठी सुमारे तीस ते चाळीस वर्षांपूर्वीची मॅग्रोज, काड आमटी व अन्य दुर्मीळ जातींच्या वृक्षांची तोड करण्यात आली आहे. याशिवाय कांदळवनाची तोड करून जेटी बनवण्यासाठी या रस्त्याला शंभर मीटरचा बायपास रस्ता नदीपाराजवळ जाण्यासाठी तयार करण्यात आला आहे़ हा रस्ता तयार करण्यासाठी अत्याधुनिक मशिनरीच्या साह्याने महिनाभर जोरात काम सुरु आहे. यासंदर्भात प्रशासकीय यंत्रणेकडून कोणतीही माहिती उपलब्ध होत नाही. ग्रामस्थांनी याबाबत अद्याप कोणतीही तक्रार केलेली नाही. गावचे पोलीसपोटील व तलाठी यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार उंबरशेत बंदर या ठिकाणी शिपिंग कंपनीसाठी रस्ता होत होता. यासंदर्भात ग्रामस्थांना कल्पना होती. पण, कोणीही ग्रामस्थ तक्रारीसाठी पुढे येत नव्हता. सुमारे पंधरा दिवसांपूर्वी मातीचे उत्खनन होत असल्याची तक्रार झाली. यासंदर्भात तलाठी पंचनाम्याला जाग्यावर गेले असता येथील रस्त्याच्या कामाची मशिनरी जाग्यावरून हलविण्यात आली. प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी पोहोचूनही केवळ माती उत्खननाचा पंचनामा करण्यात आला. कांदळवनाच्या तोडीकडे महसूल प्रशासनाने अद्याप लक्ष देलेले नाही अथवा वनविभागाचे कर्मचारीही जागेवर पोहोचलेले नाहीत. महसूल विभाग सखोल पंचनामा करणार असल्याची माहिती मिळाली आहे.़ महसूल विभागाने संबंधित ठिकाणी ५०० ब्रास मातीचा उपसा करण्यासाठी कंपनी व्यवस्थापकांनी काही रक्कम भरल्याचे पंचनामा केल्यानंतर पुढे आले आहे. स्थानिक ग्रामस्थ, पोलीसपाटील, महसूल विभाग, वनविभाग या सर्वांचीच मिलीभगत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तोडीचे प्रकरण गंभीर असून, अनेक विकासकांनी खाडी किनाऱ्यालगत असलेले आपले प्ल्ॉाट्स डेव्हलप करण्यासाठी कांदळवने साफ करुन त्या ठिकाणी भराव केला आहे. अधिकारी लक्ष देत नसल्याने या सर्व प्रकाराची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्याची मागणी परिसरातून केली जात आहे. करावी. (प्रतिनिधी)