शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

केवळ चार महिन्यात १८ वर्षांखालील ५,७४७ मुले कोरोना बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:07 IST

रत्नागिरी : कोरोनाच्या पहिल्या लाटेत ० ते २० वर्षांपर्यंतचा वयोगट सुरक्षित होता. मात्र, दुसऱ्या लाटेचा संसर्ग अधिक वेगाने झाला ...

रत्नागिरी : कोरोनाच्या पहिल्या लाटेत ० ते २० वर्षांपर्यंतचा वयोगट सुरक्षित होता. मात्र, दुसऱ्या लाटेचा संसर्ग अधिक वेगाने झाला असल्याने गेल्या चार महिन्यांत जिल्ह्यातील ० ते १७ वयोगटातील मुले कोरोनाबाधित झाली आहेत. यात ६ वर्षांपर्यंतच्या बालकांची संख्या १,०९३ असून, ४ नवजात बालकांचा समावेश आहे. ७ ते १२ वयोगटातील २,१२७ आणि त्यावरील १७ वर्षांपर्यंतची संख्या २,५२७ इतकी आहे. एकूण रुग्णांच्या तुलनेत मुलांचे बाधित होण्याचे प्रमाण ११.१५ टक्के आहे.

जिल्ह्यात मार्च २०२०मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. पहिल्या लाटेपर्यंत कोरोनाबाधितांची एकूण संख्या साडेदहा हजारपर्यंत होती. मार्च २०२१पर्यंत म्हणजे वर्षभराची ही संख्या होती. यात ४२ बालके बाधित झाली होती. मात्र, एप्रिल २०२१पासून कोरोनाचा संसर्ग पुन्हा वेगाने वाढू लागला आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर होळीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात विविध ठिकाणी दाखल झालेल्या चाकरमान्यांकडून मुंबईतून कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात अधिक फैलावला गेला. त्यामुळे एप्रिल महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या अधिक वाढू लागली.

रुग्णसंख्या वाढू लागल्याने कोविड रुग्णालये, केअर सेंटर्स भरून गेली. त्यामुळे गंभीर झालेल्या रुग्णांना उपचार मिळणे अवघड झाले. त्यामुळे शासनाने ज्यांच्यात साैम्य लक्षणे आहेत किंवा अजिबातच लक्षणे नाहीत, अशांना घरीच राहून उपचार करण्याची परवानगी दिली. हे रुग्ण घरी राहिले असले तरी काहींच्या घरात स्वतंत्र राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे अशांमधून घरातील इतर सदस्यांना संसर्ग झाला. विशेषत: ज्येष्ठ नागरिक, मुले ही मोठ्या प्रमाणावर बाधित होऊ लागली. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या भरमसाठ वाढू लागली.

१ मे ते ३० ऑगस्ट २०२१ या चार महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५१ हजार ५२७ इतकी झाली. यापैकी ० ते १७ या वयोगटाची संख्या ५ हजार ७४७ (११.१५ टक्के) इतकी आहे. यात ४ नवजात शिशूंचा समावेश आहे. ६ वर्षांपर्यंतची एकूण बालके १०९३, ७ ते १२ पर्यंतची २ हजार १२७ आणि त्यावरील १७ वर्षांपर्यंतच्या मुलांची संख्या २ हजार ५२७ इतकी आहे.

..................

लक्षणे नसलेल्यांमुळे संसर्ग वाढला...

ज्यांच्यात कोरोनाची लक्षणे नव्हती, अशांचा वावर अनेक ठिकाणी झाला. अशांमुळे कोरोनाची रुग्णसंख्या अधिक वाढली. आतापर्यंत ७५ हजार इतकी रुग्णसंख्या आहे. त्यापैकी ५१ हजार ५२७ एवढे रुग्ण केवळ मे ते ऑगस्ट या केवळ चार महिन्यांच्या कालावधीत वाढले.

....................................

दुसऱ्या लाटेत बालकांची संख्या वाढली...

पहिल्या लाटेच्या वर्षभराच्या कालावधीत सुमारे ४२ बालके कोरोनाबाधित झाली होती. गतवर्षी कोरोनाने निधन झालेले बालरोगतज्ज्ञ डाॅ. दिलीप मोरे यांच्या अथक प्रयत्नांमुळे ही सर्व बालके पूर्णपणे कमी कालावधीत बरी झाली होती. त्यामुळे एकही मृत्यू नोंदविला गेला नव्हता. मात्र, दुसऱ्या लाटेदरम्यान मुलांचे बाधित होण्याचे प्रमाण वाढले. १६ वर्षांची एक मुलगी उशिरा उपचारासाठी दाखल झाल्याने तिचा मृत्यू झाला, तर अन्य दोन बालरुग्ण सहव्याधी असल्याने त्यांचा मृत्यू झाला. ० ते १७ वयोगटातील तीन मृत्युंची नोंद दुसऱ्या लाटेत झाली.

तिसऱ्या लाटेत काळजी घेण्याची गरज...

संभाव्य तिसऱ्या लाटेत बालकांना अधिक बाधित होण्याचा धोका व्यक्त होत आहे. सध्या अनेक बालके मोठ्या प्रमाणावर बाधित होत आहेत. तिसऱ्या लाटेचा संसर्ग होण्याचा वेग अधिक असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेत बाधित झालेल्या ० ते १७ वयोगटातील मुलांची संख्या पाहता तिसऱ्या लाटेपासून मुलांना दूर ठेवण्यासाठी पालकांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे.