शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

जैतापुरात आज जेलभरो आंदोलन

By admin | Updated: December 12, 2015 00:16 IST

मच्छिमार सहभागी होणार : प्रकल्पाची पर्यावरणाची मुदत संपल्याने आंदोलनकर्ते आक्रमक

राजापूर : राजापूर तालुक्यातील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात जेलभरो आंदोलन छेडण्याचा इशारा दिल्यानंतर प्रकल्प परिसरातील वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान, या आंदोलनात सर्व मच्छिमार उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवणार आहेत. नियोजित प्रकल्पाची पर्यावरणाची संपलेली मुदत, केंद्र व राज्यातील सत्तेतील सहभागी शिवसेनेचा प्रकल्पाला असणारा प्रखर विरोध यामुळे शनिवारी नक्की काय घडणार, याकडे लक्ष राहिले आहे.जैतापूर येथील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाला अद्याप विरोध सुरूच आहे. जनहक्क सेवा समिती व शिवसेना यांच्यावतीने १२ डिसेंबरला जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला ठाम विरोध करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या जेलभरो आंदोलनामध्ये जैतापूर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मागील दशकाहून अधिक काळ हा प्रश्न सातत्याने गाजत आहे. अणुसारख्या घातक पदार्थावर ऊर्जा निर्मिती करताना त्यातून होणारे रेडीएशन यामुळे परिसरातील फळबागा, भातशेती, मच्छिमारी व मानवी जीवनावर विपरीत परिणाम होईल, या भीतीने प्रकल्पाविरुद्ध चांगलाच लढा सुरु आहे. मात्र, मधल्या काही महिन्यात प्रकल्पात जाणाऱ्या जमिनींचे नुकसान भरपाईचे अनुदान हेक्टरी साडेबावीस लाख एवढे करण्यात आल्याने जनतेने शासनाकडून नुकसान भरपाईच्या अनुदानाचे धनादेश स्वीकारले. त्यामुळे प्रकल्पाविरुद्ध असणारा विरोध कमी होत असतानाच परिसरातील मच्छिमार बांधवांना नियमानुसार प्रकल्पग्रस्त म्हणून मान्यता नसल्याने त्यांचे भविष्यात अतोनात नुकसान होणार आहे. त्यामुळे साखरीनाटेतील असंख्य मच्छिमारांचा प्रकल्पाला असलेला विरोध अद्याप कमी झालेला नाही. त्यामुळे शनिवारच्या जेलभरो आंदोलनाला मच्छिमार बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत. त्यासाठी ते आपापल्या बोटी किनाऱ्यावर लावून सहभाग घेतील, अशी माहिती मच्छिमारांनी दिली. (प्रतिनिधी)विरोध कायम : बोटी किनाऱ्यावरनियोजित अणुऊर्जा प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून दिलेल्या पर्यावरणाच्या दाखल्याची मुदत संपली आहे. पर्यावरणाची संपलेली मुदत वाढवून देऊ नका, अशी मागणी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी होत असलेल्या आंदोलनाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.प्रकल्पाचे काम सुरूजैतापूर येथील प्रकल्पाला विरोध होत असला तरी या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी नियोजित जागेवर संरक्षक कठडाही उभारला आहे.