शहरं
Join us  
Trending Stories
1
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
2
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
3
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
4
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
5
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
6
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
7
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीसोबत करणार हातमिळवणी?
8
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
9
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
10
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
11
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
12
India Pakistan Update: हवाई दलाच्या लढाऊ विमानांसाठी ओझरचे एचएएल 'हाय अलर्ट'वर !
13
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
14
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
15
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
16
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
18
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
19
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
20
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."

गोरगरिबांचे होणार जगणं मुश्कील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:31 IST

जिल्ह्यात पुन्हा कोरोनाने कहर केला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान निर्माण झाले आहे. २३ मार्च रोजी कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात ...

जिल्ह्यात पुन्हा कोरोनाने कहर केला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान निर्माण झाले आहे. २३ मार्च रोजी कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात सुरू झाला. कोरोनामुळे आरोग्य यंत्रणा, जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सर्वच कामाला लागली होती. कोरोनाचा कहर रोखण्यासाठी जिल्ह्याची संपूर्ण यंत्रणा दिवस-रात्र मेहनत घेत होती. त्याला रत्नागिरी जिल्हावासीयांनी चांगली साथ दिली होती. एक जरी कोरोनाचा रुग्ण आढळला तरी ती वाडी, गाव सील करण्यात येत होते. आजूबाजूच्या गावे, वाड्यांशी त्यांचा संपर्क येणार नाही, यासाठी प्रशासनाकडून कठोर निर्बंध घालण्यात आले होते. संपूर्ण गावच लॉकडाऊन करण्यात येत होते. कोरोनामुळे मोठी दहशत निर्माण झाली होती. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे सर्वच छोटे-मोठे व्यापारी आर्थिक अडचणीत आले होते. मागील दोन तीन महिन्यांत आर्थिक घडी रुळावर येत असताना अचानक कोरोनाचा कहर पुन्हा सुरू झाल्याने हातावर पोट असणारे कामगार, रिक्षा-टेम्पो चालक, हातगाडीवाले, छोटे-मोठे व्यापारी आणि इतर व्यवसाय अडचणीत येणार आहेत. त्यामुळे संपूर्ण आर्थिक घडी विस्कटणार असल्याने गोरगरिबांचे एक वेळच्या जेवणाचे वांदे होणार आहेत.

कोरोनाने काही राजकीय मंडळींनी धर्माचा आधार घेऊन मंदिर-मशीद सुरू करण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलने केली होती. आता कोरोनाचा कहर वाढल्याने त्यांनी या महामारीचीही जबाबदारी घ्यावी, असे अनेकांचे मत आहे. शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी आटोकाट प्रयत्न केले. सामाजिक अंतर, सॅनिटायझरचा वापर आणि मास्क लावणे, तसेच गर्दी करू नये, याबाबत वेळोवेळी लोकांना आवाहन केले. तरीही लोक जुमानत नव्हते. कारण आज कमवून उद्या कसे पोट भरेल, अशा लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे हातावर पोट भरणाऱ्यांना काम मिळेल तरच ते दोन वेळचे जेवणार असल्याने ते तरी काय करणार, असेच म्हणावे लागेल. मध्यंतरी घेण्यात आलेल्या आणि सध्या देशात सुरू असलेल्या निवडणुकांमध्ये नेतेमंडळी तरी कोरोनाचे नियम, अटी बाजूला ठेवून कार्यरत असल्याचे दिसून येत आहे.

आता पुन्हा कोरोनाचा कहर वाढू लागल्याने शासनाने कडक निर्बंध घालण्यास सुरुवात केली असून, घातलेही आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होणार आहेत. नाइलाजास्त हे पाऊल शासनाला उचलावे लागले. त्याला आपणच जबाबदार आहोत, असेच म्हणावे लागेल. लोकांनी कोविड नियम, अटींचे पालन केले असते तर ही वेळच आली नसती. त्याला शासन तरी काय करणार.