शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

बांबू शेतीत कोहळ्याचे आंतरपीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:22 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : पारंपरिक पद्धतीने भात, पालेभाज्या, केळी, फुलांचे उत्पादन घेत असतानाच प्रयोगशील शेतकरी श्रीकृष्ण गुणे त्यांचे ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : पारंपरिक पद्धतीने भात, पालेभाज्या, केळी, फुलांचे उत्पादन घेत असतानाच प्रयोगशील शेतकरी श्रीकृष्ण गुणे त्यांचे सुपुत्र अनिरुद्ध यांनी शेतीमध्ये अभिनव प्रयोग करण्याचे निश्चित केले. वन्यप्राण्यांमुळे शेतीचे नुकसान होते, शिवाय पाण्याचा किमान वापर यामुळे बांबू शेती करण्याचे निश्चित केले. पाच एकर क्षेत्रावर त्यांनी साडेचार हजार बांबूची बेटे लावली आहेत. साडेतीन वर्षांपूर्वी त्यांनी घन लागवड केली आहे. दोन वर्षांत उत्पादन सुरू होणार आहे.

बांबूची मुळे दीड ते दोन फुटांपेक्षा खाली जात नाहीत. शिवाय ४० ते ४५ वर्षांनी लागवड काढायची म्हटली तर कडेपासून काढता येते. बांबूच्या पानांचा खच अधिक पडतो, छोट्या आकाराची पाने लवकर कुजतात, त्यामुळे जमीन सुपीक बनते. एक बांबू कापला तर दोन बांबू उगवतात. त्यामुळे बांबूची शेती फायदेशीर ठरते. पहिल्या वर्षी किमान दीड लाख उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. कमी पाण्यात होणारे पीक असून, उत्पादनासाठी फारसा खर्चही येत नाही. बांबूची बेटे वाढत असताना दाट वाढतात. त्यामुळे बांबू वाढल्यानंतर सावली निर्माण होते; परंतु बांबू लहान असताना आंतरपीक घेणे शक्य होते. अनिरुद्ध यांनी बांबू लहान असताना सलग दोन वर्षे कोहळ्याची आंतरलागवड करून उत्पादन मिळविले. एक टन उत्पन्न वर्षाला प्राप्त झाले. कोहळा पिकासाठी वन्यप्राण्याचा त्रास होत नाही. शिवाय लवकर खराब होणारे फळ नसल्याने दर आल्यानंतर विकणे सोपे होते. मिठाई विक्रेत्यांकडे कोहळ्यासाठी विशेष मागणी होते. आता बांबू मोठे झाले असून, बेटांची दाट वाढ झाली असल्याने यापुढे आंतरपीक शक्य नाही. शिवाय दोन वर्षांनंतर बांबू काढणी सुरू होणार आहे.

खर्चिक शेतीला फाटा

गुणे कुटुंबीय भातासह भाजीपाला, फुले, केळी, कलिंगडासह विविध प्रकारची पिके घेत असत. शेतीसाठी वन्यप्राण्यांचा त्रास तर होतो, शिवाय हवामानावर आधारित शेती असल्याने उत्पादन खर्चही अधिक येतो. त्यामुळे खर्चिक शेतीला फाटा देत असताना आधुनिक शेतीकडे वळण्याचे निश्चित केले. त्यासाठी त्यांनी अभ्यास करून बांबूची लागवड केली.

कमी श्रम, कमी पाणी

बांबूची मुळे दीड ते दोन फुटांपेक्षा खाली जात नाहीत. त्याशिवाय बांबूसाठी पाणी जास्त लागत नाही. लागवडीनंतर देखभालीचाही खर्च फारसा येत नसल्याने बांबू शेती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत आहे. अन्य उत्पादनापेक्षा बांबू शेतीसाठी कमी श्रम व कमी पाण्याचा वापर होतो. त्यामुळेच पाच एकर विस्तीर्ण क्षेत्रावर बांबू लागवड केली आहे.

दोन वर्षांत उत्पादन सुरू

बांबू लागवडीला साडेतीन वर्षे पूर्ण झाली असून, येत्या दोन वर्षांत बांबूची तोड सुरू होणार आहे. एक बांबू कापल्यावर दोन बांबू फुटत असल्याने बांबूची शेती फायदेशीर ठरत आहे. बांधकाम, लाकूड व्यावसायिकांकडून बांबूला मागणी होत आहे. पहिल्या वर्षी किमान दीड लाखाचे उत्पन्न प्राप्त होण्याची शक्यता आहे. बांबूला दर चांगला प्राप्त तर होतोच शिवाय मागणीही असल्याने बांबू शेतीसाठी गुणे कुटुंबीयांनी प्राधान्य दिले आहे.

पाच महिन्यांत उत्पन्न

जास्त पाण्यामुळे कोहळा कुजतो. त्यामुळे जानेवारीत लागवड केलेला कोहळा मेमध्ये तयार झाला. एक टन कोहळा उत्पादन मिळाले आहे. मिठाई व्यावसायिकांकडून कोहळ्यासाठी मागणी होत आहे. वन्यप्राण्यांचा त्रास होत नसल्याने कोहळा पीक फायदेशीर ठरत आहे. आंतरपिकातून त्यांना चांगले उत्पादन प्राप्त झाले आहे.

कोहळा लागवड

बांबू रोपे लावल्यानंतर आंतरपीक घेण्यासाठी गुणे यांनी अभ्यासपूर्वक कोहळ्याची निवड केली. त्यासाठी त्यांनी स्वत:च रोपे तयार करून लागवड केली. नाशवंत फळ नसल्याने विकण्याची घाई करावी लागत नाही. साठवणूक करून दर आल्यानंतर विक्री सुलभ होते.