शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
2
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
3
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
4
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
5
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
6
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
7
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
8
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
9
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
10
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
11
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
12
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
13
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
14
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
15
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
16
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
17
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
18
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
19
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
20
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  

बांबू शेतीत कोहळ्याचे आंतरपीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:22 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : पारंपरिक पद्धतीने भात, पालेभाज्या, केळी, फुलांचे उत्पादन घेत असतानाच प्रयोगशील शेतकरी श्रीकृष्ण गुणे त्यांचे ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : पारंपरिक पद्धतीने भात, पालेभाज्या, केळी, फुलांचे उत्पादन घेत असतानाच प्रयोगशील शेतकरी श्रीकृष्ण गुणे त्यांचे सुपुत्र अनिरुद्ध यांनी शेतीमध्ये अभिनव प्रयोग करण्याचे निश्चित केले. वन्यप्राण्यांमुळे शेतीचे नुकसान होते, शिवाय पाण्याचा किमान वापर यामुळे बांबू शेती करण्याचे निश्चित केले. पाच एकर क्षेत्रावर त्यांनी साडेचार हजार बांबूची बेटे लावली आहेत. साडेतीन वर्षांपूर्वी त्यांनी घन लागवड केली आहे. दोन वर्षांत उत्पादन सुरू होणार आहे.

बांबूची मुळे दीड ते दोन फुटांपेक्षा खाली जात नाहीत. शिवाय ४० ते ४५ वर्षांनी लागवड काढायची म्हटली तर कडेपासून काढता येते. बांबूच्या पानांचा खच अधिक पडतो, छोट्या आकाराची पाने लवकर कुजतात, त्यामुळे जमीन सुपीक बनते. एक बांबू कापला तर दोन बांबू उगवतात. त्यामुळे बांबूची शेती फायदेशीर ठरते. पहिल्या वर्षी किमान दीड लाख उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. कमी पाण्यात होणारे पीक असून, उत्पादनासाठी फारसा खर्चही येत नाही. बांबूची बेटे वाढत असताना दाट वाढतात. त्यामुळे बांबू वाढल्यानंतर सावली निर्माण होते; परंतु बांबू लहान असताना आंतरपीक घेणे शक्य होते. अनिरुद्ध यांनी बांबू लहान असताना सलग दोन वर्षे कोहळ्याची आंतरलागवड करून उत्पादन मिळविले. एक टन उत्पन्न वर्षाला प्राप्त झाले. कोहळा पिकासाठी वन्यप्राण्याचा त्रास होत नाही. शिवाय लवकर खराब होणारे फळ नसल्याने दर आल्यानंतर विकणे सोपे होते. मिठाई विक्रेत्यांकडे कोहळ्यासाठी विशेष मागणी होते. आता बांबू मोठे झाले असून, बेटांची दाट वाढ झाली असल्याने यापुढे आंतरपीक शक्य नाही. शिवाय दोन वर्षांनंतर बांबू काढणी सुरू होणार आहे.

खर्चिक शेतीला फाटा

गुणे कुटुंबीय भातासह भाजीपाला, फुले, केळी, कलिंगडासह विविध प्रकारची पिके घेत असत. शेतीसाठी वन्यप्राण्यांचा त्रास तर होतो, शिवाय हवामानावर आधारित शेती असल्याने उत्पादन खर्चही अधिक येतो. त्यामुळे खर्चिक शेतीला फाटा देत असताना आधुनिक शेतीकडे वळण्याचे निश्चित केले. त्यासाठी त्यांनी अभ्यास करून बांबूची लागवड केली.

कमी श्रम, कमी पाणी

बांबूची मुळे दीड ते दोन फुटांपेक्षा खाली जात नाहीत. त्याशिवाय बांबूसाठी पाणी जास्त लागत नाही. लागवडीनंतर देखभालीचाही खर्च फारसा येत नसल्याने बांबू शेती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत आहे. अन्य उत्पादनापेक्षा बांबू शेतीसाठी कमी श्रम व कमी पाण्याचा वापर होतो. त्यामुळेच पाच एकर विस्तीर्ण क्षेत्रावर बांबू लागवड केली आहे.

दोन वर्षांत उत्पादन सुरू

बांबू लागवडीला साडेतीन वर्षे पूर्ण झाली असून, येत्या दोन वर्षांत बांबूची तोड सुरू होणार आहे. एक बांबू कापल्यावर दोन बांबू फुटत असल्याने बांबूची शेती फायदेशीर ठरत आहे. बांधकाम, लाकूड व्यावसायिकांकडून बांबूला मागणी होत आहे. पहिल्या वर्षी किमान दीड लाखाचे उत्पन्न प्राप्त होण्याची शक्यता आहे. बांबूला दर चांगला प्राप्त तर होतोच शिवाय मागणीही असल्याने बांबू शेतीसाठी गुणे कुटुंबीयांनी प्राधान्य दिले आहे.

पाच महिन्यांत उत्पन्न

जास्त पाण्यामुळे कोहळा कुजतो. त्यामुळे जानेवारीत लागवड केलेला कोहळा मेमध्ये तयार झाला. एक टन कोहळा उत्पादन मिळाले आहे. मिठाई व्यावसायिकांकडून कोहळ्यासाठी मागणी होत आहे. वन्यप्राण्यांचा त्रास होत नसल्याने कोहळा पीक फायदेशीर ठरत आहे. आंतरपिकातून त्यांना चांगले उत्पादन प्राप्त झाले आहे.

कोहळा लागवड

बांबू रोपे लावल्यानंतर आंतरपीक घेण्यासाठी गुणे यांनी अभ्यासपूर्वक कोहळ्याची निवड केली. त्यासाठी त्यांनी स्वत:च रोपे तयार करून लागवड केली. नाशवंत फळ नसल्याने विकण्याची घाई करावी लागत नाही. साठवणूक करून दर आल्यानंतर विक्री सुलभ होते.