शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

मुर्शी चेक पोस्टवर स्थानिक वाहनचालकांना दुजाभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:35 IST

देवरुख : रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाट अवजड वाहनांसाठी बंद आहे. तब्बल दीड महिना झाला ...

देवरुख : रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाट अवजड वाहनांसाठी बंद आहे. तब्बल दीड महिना झाला तरी हा मार्ग मोकळा करण्यात आला नाही. आता केवळ हलक्या वाहनांची येथून ये-जा सुरू आहे. मुर्शी साखरपा येथे पोलीस चेकपोस्ट येथे सहाचाकी वाहने कोल्हापूरच्या दिशेने घेऊन जाण्यास पोलिसांकडून अटकाव केला जातो. मात्र, रात्री पैसे घेऊन काही वाहने सोडण्यात येतात, असा आरोप स्थानिक वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

आंबा घाट येथे घाट वाहतुकीस बंद असल्याबाबत सूचना देणारे माहिती फलक किंवा कोणीही पोलीस कर्मचारी तैनात केलेला नाही. त्यामुळे बाहेरील मोठ-मोठी अवजड वाहने थेट मुर्शी साखरप्यापर्यंत बिनदिक्कतपणे येतात. साखरपा येथे घाटातून आलेल्या वाहनांवर केवळ जुजबी दंडाची कारवाई करून त्यांना सोडून दिले जाते. पाचशे रुपये दंड आकारून अवजड वाहने सोडली जातात. त्यामुळे स्थानिक वाहनांनासुद्धा मालवाहतुकीस परवानगी दिली जावी, अशी मागणी आहे.

तालुक्यातील चाळीसहून अधिक वाहनधारकांनी सोमवारी साखरपा पोलीस चेकपोस्ट येथे धडक दिली. जर अवजड मालवाहतुकीला परवानगी देण्यात आली नाही, तर आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी संगमेश्वर तालुका शेतकरी लाकूड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष किरण जाधव, उमेश गांधी, योगेश चव्हाण, ओंकार सुर्वे, महेश पाटील, योगेश केतकर, राजन मोहिरे यांच्यासह साखरपा, देवरूख विभागातील वाहनधारक उपस्थित होते.

200921\55161735-img-20210920-wa0033.jpg~200921\5517img-20210920-wa0034.jpg

फलक मुर्शी~या सारखी अनेक अवजड वाहने साखरपा येथे पोलीसांकडुन 500रुपये जुजबी दंड घेऊन सोडुन दिली