शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

वैशाखात तापमान वाढणार-- कृषी विद्यापीठाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 12:34 IST

वैशाखा’त आणखी आठ दिवस पुन्हा कमाल व किमान तापमानात वाढ होण्याचा इशारा दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाने दिला आहे. या दिवसात वाऱ्याच्या

ठळक मुद्दे- बागायती, पाळीव जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन

दापोली : ‘वैशाखा’त आणखी आठ दिवस पुन्हा कमाल व किमान तापमानात वाढ होण्याचा इशारा दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाने दिला आहे. या दिवसात वाऱ्याच्या वेगातदेखील वाढ होण्याची शक्यता कृषी विद्यापीठाकडून प्रसिद्ध झालेल्या पत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आली आहे. 

महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पारा ४0 अंशाच्या पुढे गेला आहे. त्यामानाने रत्नागिरी जिल्ह्यात पाºयाची मजल ३३ ते ३५ अंशापर्यंतच गेली आहे. मात्र हे तापमान रत्नागिरी जिल्ह्याच्या मानानेही खूप होत आहे. या वाढत्या तापमानाची विशेष दखल घेत कोकण कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी सावधगिरीचा इशारा दिला आहे. आणखी आठवडाभर तापमानात अशीच वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंबा, काजू, भाजीपाला याबाबत काय काळजी घ्यावी, याच्या सूचनाही विद्यापीठाने आवर्जून दिल्या आहेत.

या वाढत्या तापमान वाढीमुळे आंबा पिकावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव होणार असल्याने फळगळ होण्याची शक्यता आहे. याच्या नियंत्रणासाठी ५ टक्के हेक्झॉकोन झोल ५ मिलिलीटर किंवा पाण्यात विरघळणारे ८० टक्के गंधक २० ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आंबा फळांवर फुलकिडीचाही प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. हा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणासाठी स्पिनोसॅड ४५ टक्के प्रवाही २.५ मिलिलीटर किंवा थायेमेथॉक्झाम २५ टक्के २ ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

कीटकनाशकाला लेबल क्लेम नाहीत, आंबा फळांचे फळमाशीपासून संरक्षण करण्यासाठी विद्यापीठाने शिफारस केलेले ‘रक्षक फळमाशी सापळा’ प्रतिहेक्टरी ४ या प्रमाणात बागेमध्ये झाडाच्या खालील बाजूच्या फांद्यावर लावावेत. नवीन लागवड केलेल्या आंबा कलमांना पहिली तीन वर्षे पाणी देण्याची व्यवस्था करावी.  तसेच जोडाच्या खाली बुंध्यावर येणारी फूट वेळोवेळी काढून टाकावी. उन्हाळ्यात पहिल्या वर्षी आठवड्यातून दोन वेळा, तर दुसऱ्या वर्षी पंधरा दिवसातून दोन वेळा व तिसºया वर्षी महिन्यातून दोन वेळा प्रत्येक कलमाला ३० लीटर पाणी द्यावे. 

तसेच काजू पिकामध्ये काही ठिकाणी काढणीयोग्य बी तयार झालेली आहे. तयार झालेल्या बिया बोंडापासून वेगळ्या करून बिया उन्हामध्ये ७ ते ८ दिवस वाळवाव्यात. तसेच विद्यापीठाने शिफारस केल्याप्रमाणे काजू बोंडापासून विविध टिकाऊ पदार्थ तयार करावेत. कलमांच्या आळ्यांतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होण्यासाठी आळ्यांमध्ये वाळलेले गवत, पालापाचोळा किंवा पोलिथीनचे आच्छादन करणे आवश्यक आहे. 

नवीन लागवड केलेल्या काजू कलमांना दर आठ दिवसांनी प्रतिकलम १५ लीटर पाणी देण्याची व्यवस्था करावी तसेच जोडाच्या खाली बुंध्यावर येणारे फूटवे वेळोवेळी काढून टाकावेत. बाष्पीभवनामध्ये वाढ होत असल्याने नारळ बागेत ५ ते ६ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी तसेच आळ्यांमध्ये ओलावा टिकविण्यासाठी नारळाच्या शेंड्या पुराव्यात आणि झावळांचे आच्छादन करावे. नवीन लागवड केलेल्या नारळाच्या रोपांना काठीचा आधार द्यावा तसेच कडक उन्हामुळे पाने करपू नयेत म्हणून पहिली दोन वर्षे रोपांना वरून सावली करावी. बाष्पीभवनामध्ये वाढ होत असल्याने, सुपारी बागेत ४ ते ५ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करणे गरजेचे झाले आहे. उन्हाळी भेंडी पिकाला नत्राचा दुसरा हप्ता ७२ किलो युरिया प्रतिहेक्टरी या प्रमाणात लागवडीनंतर एका महिन्यांनी द्यावा. बाष्पीभवन वाढत असल्याने, रोपवाटिकेस, नवीन फळबागा तसेच भाजीपाल्याला नियमित पाणी देण्याची सूचनाही विद्यापीठाने केली आहे.

टॅग्स :konkanकोकणRatnagiriरत्नागिरी