शहरं
Join us  
Trending Stories
1
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
2
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
3
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
4
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
5
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
6
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
7
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
8
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
9
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
10
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
11
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
12
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
13
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
14
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
15
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
16
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
17
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
18
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
19
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
20
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र

रत्नागिरी आगारातर्फे ग्रामीण व शहरी मार्गावरील फेऱ्यांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:36 IST

रत्नागिरी : लाॅकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा म्हणून एस. टी. परवानगी देण्यात आली होती. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची वाहतूक सुरू होती. त्यामुळे ...

रत्नागिरी : लाॅकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा म्हणून एस. टी. परवानगी देण्यात आली होती. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची वाहतूक सुरू होती. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील मोजक्याच फेऱ्या सुरू होत्या. मात्र संभाव्य प्रवासी भारमान असलेल्या मार्गावर फेऱ्या वाढविण्याचा निर्णय रत्नागिरी आगाराने घेतला आहे.

आगामी पावसाळा, शेतीची कामे, ग्रामीण भागातील जनतेच्या सोयीसाठी गाड्या सुरू करण्यात येणार आहेत. प्रवासी प्रतिसाद पाहून ग्रामीण व शहरी मार्गावरील फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. ग्रामीण मार्गावर यापूर्वी १३ गाड्यांद्वारे १०४ फेऱ्या व शहरी मार्गावर ६ गाड्यांद्वारे १०० फेऱ्या सुरू होत्या. मात्र सोमवारपासून ग्रामीण मार्गावर नवीन २३ गाड्यांद्वारे १५२ फेऱ्या, तर शहरी मार्गावर नवीन १० फेऱ्याद्वारे १६० फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे शासकीय नियमावलींचे पालन करून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह प्रवासी वाहतूक केली जाणार आहे.

ग्रामीण मार्गावर गणपतीपुळे, मालगुंड, चिपळूण, नेवरे (बाजारपेठ), दापोली, पावस, गावखडी गुरववाडी, नाटे, हर्चे-पिंपळपार, आंबोळगड, स्वामी नाखरे कालकरकोंड, भडे, काजरघाटीमार्गे लांजा, रिंगीची वाडी, जयगड, गणपतीपुळे, करबुडे, जाकादेवी, धामणसे, देवळे, पाली, वळके, साखरपा, देवरूख व ओशी आदी गावांतील फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.

शहरी मार्गावर भावेआडोम, दांडेआडोम, मजगाव, फणसवळे, आंबेकोंड, म्हामुरवाडी, मजगाव, वेसुर्ले, हातीस, टिके-कांबळेवाडी, टेंभ्येपूल, तारवेवाडी, निवळी, खेडशी-फणसवळे, खेडशीनाका, कोतवडे, आरे-बसणी, काळबादेवी, सडामिऱ्या, मिऱ्याबंदर, कोळंबे, उफळवाडी, रेल्वेस्टेशन, वायंगणी, काजरघाटी, हातखंबा गावच्या फेऱ्या सोडण्यात आल्या आहेत.