शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

कंटेन्मेंट झाेनची अंमलबजावणी हाेत नसल्याने रुग्णसंख्येत वाढ : दीपक गुरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:33 IST

राजापूर : काेरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर तीन ते चार दिवस कंटेन्मेंट झोनची अंमलबजावणी होत नसल्याने पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ...

राजापूर : काेरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर तीन ते चार दिवस कंटेन्मेंट झोनची अंमलबजावणी होत नसल्याने पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती बिनदिक्कत फिरत असतात. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर तत्काळ कंटेन्मेंट झोनची अंमलबजावणी संबंधित ग्रामपंचायतींनी करावी, अशी मागणी धोपेश्वर येथील दीपक गुरव यांनी केली आहे.

गावांमध्ये काेरोना रुग्ण सापडल्यानंतर ते घर प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येते. प्राथमिक आरोग्य केंद्रांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर ग्रामपंचायतीकडून कंटेन्मेंट झोनची अंमलबजावणी केली जाते. कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर लगेचच कंटेन्मेंट झोनची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. मात्र, सद्य:स्थितीत काही ग्रामपंचायतींकडून तीन ते चार दिवस कंटेन्मेंट झोनचा फलकही लावला जात नसल्याचे दिसत आहे.

त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती बिनदिक्कतपणे फिरत असतात. त्यामुळे संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. तसेच कोरोनाबाधित रुग्ण जर होम आयसोलेशनमध्ये असेल तर त्याची तशी व्यवस्था आहे की नाही ते पाहण्याचे कष्टही ग्रामपंचायत, सरपंच अथवा आरोग्य विभागाकडून घेतले जात नसल्याचा आरोप गुरव यांनी केला आहे. होम क्वारंटाईनची व्यवस्था नसेल तर शाळांच्या इमारती क्वारंटाईनसाठी वापरण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही गुरव यांनी केली आहे. तसेच कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर तो परिसर निर्जंतुकीकरण करावे, याकरिता ग्रामनिधीचा वापर करावा, अशी मागणीही गुरव यांनी केली आहे.