शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
3
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
4
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
5
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
6
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
7
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
8
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
11
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
12
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
13
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
14
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
15
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
16
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
17
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
18
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
19
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
20
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला

कोरोना चाचण्यांमध्ये वाढ, ३८१ रुग्ण सापडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:23 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात चाचण्या वाढविण्यात आल्याने कोरोनाबाधितांमध्ये वाढ झाली आहे. शनिवारी बाधित ३८१ रुग्ण सापडले असून, ...

रत्नागिरी : जिल्ह्यात चाचण्या वाढविण्यात आल्याने कोरोनाबाधितांमध्ये वाढ झाली आहे. शनिवारी बाधित ३८१ रुग्ण सापडले असून, एकूण रुग्णसंख्या ६८,३२३ इतकी झाली आहे. दिवसभरात ३०४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ६२,७०२ झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाने तिघांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत एकूण १,९४१ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ॲक्टिव्ह रुग्ण ३,२५२ असून, जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर ७.५५ टक्के आहे.

जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असले तरी दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. ज्या तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे, ते मागील दिवसातील आहेत. हे तिन्ही रुग्ण महिला असून, त्या ४७ वर्षे, ७२ वर्षे आणि ८५ वर्षे वयाच्या आहेत. त्यामध्ये रत्नागिरी, चिपळूण आणि लांजा तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. बाधितांच्या मृत्यूचा दर २.८५ टक्के असून, रुग्ण बरे होण्याचा दर ९१.७७ टक्के आहे.

जिल्ह्यात कोरोना चाचण्यांमध्ये पुन्हा वाढ करण्यात आल्याने बाधितांची संख्या वाढली आहे. ५,०४६ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये मंडणगड तालुक्यात ४ रुग्ण, दापोलीत ३७, खेडमध्ये ५७, गुहागरात २५, चिपळुणात ८१, संगमेश्वरात ४१, रत्नागिरीत ९३, लांजात १२ आणि राजापुरात ३१ रुग्ण सापडले.