शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:21 IST

राणी लक्ष्मीबाईंना अभिवादन रत्नागिरी : राणी लक्ष्मीबाई यांच्या हौतात्म्य दिनानिमित्त कराडे ब्राह्मण संघातर्फे अभिवादन करण्यात आले. कोरोना महामारीमुळे ...

राणी लक्ष्मीबाईंना अभिवादन

रत्नागिरी : राणी लक्ष्मीबाई यांच्या हौतात्म्य दिनानिमित्त कराडे ब्राह्मण संघातर्फे अभिवादन करण्यात आले. कोरोना महामारीमुळे यावर्षीही कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले नाही. यावेळी माजी अध्यक्ष चंद्रकांत हळबे, विद्यमान अध्यक्ष माधव हेर्लेकर, प्रतिभा प्रभूदेसाई, आदी उपस्थित होते.

आरक्षण फुल

रत्नागिरी : कोरोनामुळे गतवर्षी गणेशोत्सवासाठी मुंबईकरांना गावी येणे शक्य झाले नव्हते. कोकणात येणाऱ्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण गणेशोत्सवासाठी सुरू करताच अवघ्या काही तासांतच आरक्षण फुल्ल झाले. ५ ते ९ तारीख या कालावधीतील सर्व गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.

वृक्षारोपण

रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रत्नदुर्ग किल्ल्यावर रत्नागिरी शाखेतर्फे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते राजाभाऊ लिमये, प्रांतीक सदस्य बशीर मुर्तूझा, शिरगाव ग्रामपंचायत सदस्य उजेर काझी, तालुकाध्यक्ष राजन सुर्वे, आदी उपस्थित होते.

कार्यपद्धत मार्गदर्शन

रत्नागिरी : शासन निर्णयानुसार दहावीसाठी मूल्यमापन, कार्यपद्धती जाहीर केली आहे. मूल्यमापनाबाबतचा सर्व तपशील व विषयनिहाय परिशिष्टे, वेळापत्रक मंडळाच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून दिले आहेत. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी मूल्यमापन प्रक्रिया वेळेवर पूर्ण करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित केली आहे.

छात्रसंवाद

रत्नागिरी : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद दक्षिण रत्नागिरीतर्फे गोगटे जोगळेकर महाविद्यालयात गुगल मीटच्या माध्यमातून छात्रसंवाद नावीन्यपूर्ण उपक्रम घेण्यात आला. कोकण प्रदेश सहमंत्री अमित ढोमसे यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांच्या प्रश्नांना योग्य समर्पक उत्तरे दिली.

ग्रामीण फेऱ्या बंद

देवरुख : अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या आदेशानुसार ग्रामीण भागातील बसफेऱ्या दि. २० जूनपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साखरपा -देवरुख व रत्नागिरी मार्गावरील मोजक्याच फेऱ्या सुरू राहणार आहेत. दिनांक २१ पासून वरिष्ठांच्या आदेशानुसार बसफेऱ्या सुरू केल्या जाणार आहेत.

पथदर्शी प्रकल्प

रत्नागिरी : जिल्ह्यांच्या विविधांगी विकासाकरिता संयुक्त राष्ट्रीय विकास कार्यक्रमाच्या सहकार्याने पथदर्शी प्रकल्प राबविण्यासाठी रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. आंबा, काजू, खेकडा, मत्स्यशेती व पर्यटन व्यवसायाचा विकास आराखडा तयार करण्यासाठी जिल्हा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.

वृक्षारोपणाचा इशारा

लांजा : राष्ट्रीय महामार्गावरील अनेक ठिकाणी पडलेले खड्डे अपघाताला निमंत्रण देत आहेत. हे खड्डे न भरल्यास त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिजित राजेशिर्के यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी लांजा तहसीलदारांना निवेदन दिले आहे. राष्ट्रीय महामार्ग ६६ चे चौपदरीकरण सुरू आहे.

नागरिकांची गैरसोय

रत्नागिरी : येथील सेतू कार्यालय बंद असल्याने मुलांच्या प्रवेशाला खीळ बसली आहे. विविध दाखल्यांमुळे अनेक शासकीय कामे रखडली आहेत. त्यामुळे सेतू कार्यालय त्वरित सुरू करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. कार्यालय बंद असल्याने आवश्यक दाखले उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी सेतू कार्यालय सुरू करावे.