शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

बाहेरील मार्गाने बस सुरू केल्याने तीन गावातील प्रवाशांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:30 IST

रत्नागिरी : लॉकडाऊनच्या काळात एस. टी. महामंडळाने तालुक्यातील चाफेरी, कासारी, सांडेलावगण या मार्गाने बस सुरू केल्या होत्या. पण आता ...

रत्नागिरी : लॉकडाऊनच्या काळात एस. टी. महामंडळाने तालुक्यातील चाफेरी, कासारी, सांडेलावगण या मार्गाने बस सुरू केल्या होत्या. पण आता त्यातील सर्वाधिक गाड्या बाहेरील मार्गाने चालू केल्या आहेत. यामुळे आतील तिन्ही गावातील लोकांना एस. टी. तिकीटापेक्षाही दुपटीने पैसे देऊन वडापच्या गाडीने प्रवास करावा लागत आहे.

जयगडमध्ये जायला दोन मार्ग आहेत. त्यामध्ये एक म्हणजे खंडाळ्यामधून चाफेरी, कासारी, सांडेलावगण, संदखोल मार्गे जयगड तसेच दुसरा मार्ग चाफेरी गवळीवाडी, पाटीलवाडी, कचरे या थांब्यांवरून गाडी जाते. यामध्ये वडापच्या सगळ्या चारचाकी गाड्या अगदी अगोदरपासून ह्या बाहेरच्या म्हणजे गवळीवाडी मार्गे जातात. त्यामुळे तेथील लोकांना नेहमी त्या गाड्यांची सवय झालेली आहे. आणि त्या मार्गे जाणाऱ्या त्या ठरावीक गाड्या चालू आहेतच. पण या लॉकडाऊनच्या काळात एस. टी. महामंडळाने आतून येणाऱ्या जवळजवळ सात ते आठ फेऱ्या ह्या बाहेरच्या मार्गाने चालू केल्या आहेत.

या सर्व गाड्या चाफेरी, कासारी, सांडेलावगण या मार्गाने यायच्या. पण आता त्यातील सर्वाधिक गाड्या बाहेरील मार्गाने महामंडळाने चालू केल्या आहेत. यामुळे आतील तिन्ही गावातील लोकांना एस. टी. तिकीटापेक्षा दुपटीने पैसे देऊन वडापच्या गाडीने प्रवास करावा लागत आहे. त्यासोबतच त्यांच्या गाड्या भरेपर्यंत त्यांना थांबावे लागते. एस. टी. गाड्यांचे एक वेळेचे नियोजन असते. त्यामुळे आतापर्यंत लोकांना त्या नियोजनानुसार त्या गाड्यांचे वेळेत जाता येत होते, पण सध्या त्या सर्व गाड्या बाहेरच्या मार्गाने जात असल्यामुळे ग्रामस्थांना अडचणी निर्माण होत आहेत. विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. ह्या सर्व गाड्या अगोदर ह्या मुलांच्या शाळा, कॉलेजनुसारच्या वेळेत चालू होत्या. पण आता त्या गाड्या बंद पडल्याने विद्यार्थी आणि ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

त्यासाठी या सांडेलावगण ग्रामपंचायतीतर्फे मागील मासिक सभेत ठराव संमत करून त्याचे पत्र रत्नागिरी आगार व्यवस्थापक यांना ३१ मार्च रोजी देण्यात आले आहे. यावर लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी, अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.