शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसामुळे बागायतदार चिंतेत

By admin | Updated: February 28, 2015 23:42 IST

शनिवारी दुपारनंतर सुखद गारवा

रत्नागिरी : उकाड्याने हैराण झालेल्या रत्नागिरीकरांना शनिवारी दुपारनंतर सुखद गारवा देत पावसाने हलकेच आपले आगमन केले. विशेष म्हणजे जिल्ह्याच्या अनेक भागांत या पावसाची बरसात झाली. जोर नसला तरी या पावसाने अनेकांची तारांबळ उडविली. पावसाबरोबरच बराच काळ मळभाचे वातावरण असल्यामुळे आंबा बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. रत्नागिरी शहरात दुपारपासूनच ढगाळ वातावरण होते. दोन ते सव्वादोनच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. या पावसाने अनेकांची त्रेधातिरपीट उडविली. पाऊस किरकोळ असला तरी त्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली. देवरुख, लांजा, राजापूर, चिपळूण, गुहागर आदी परिसरातही जोरदार पाऊस झाला. रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे परिसरालाही अवेळी पावसाने दणका दिला. चौथा शनिवार असल्याने गणपतीपुळे येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. दुपारी दोनच्या दरम्यान पाऊस सुरू होताच पर्यटक आणि व्यावसायिकांची धावपळ उडाली. अनेक व्यावसायिकांनी दुपारीच आपली दुकाने बंद करणे पसंत केले. काही हौशी पर्यटकांनी मात्र या पावसाचा आनंद लुटला. खेडमध्येही सायंकाळी उशिरापर्यंत पावसाची बरसात सुरू होती. गुहागरात शनिवारी दुपारपासून पावसाने संततधार सुरू केली. अवेळी आलेल्या पावसामुळे आंबा बागायतदारांवर मोठे संकट ओढवले आहे. ऐन शिमगा सणात अचानक आलेल्या पावसामुळे संकासुर देवखेळ्यांनाही दुपारनंतर नाइलाजास्तव विश्रांती घ्यावी लागली. शृंगारतळी येथे आठवडा बाजारातील विक्रेते तसेच खरेदीदारांची पावसाने तारांबळ उडविली. चिपळुणात सकाळी काडाक्याने ऊन पडले होते, परंतु दुपारी अचानक वातावरण ढगाळ झाले. गार वारा सुटला होता. त्यानंतर अवकाळी पावसाची रिपरिप सुरू झाली. पावसामुळे जमीन भिजल्याने मातीचा सुगंध सुटला होता. तालुक्याच्या सर्वच भागात हा पाऊस पडला. शनिवारची सकाळ मळभट पावसाळी वातावरण घेऊन आली. पावसाची चाहुल लागल्याने आंबा बागायतदारांसह ग्रामीण भागातील नागरिक धास्तावले होते. दुपारच्या सत्रात थांबलेला पाऊस पुन्हा एकदा सायंकाळी पडला. आंबा मोहोराला आलेला असून, अनेक ठिकाणी लहानमोठ्या कैऱ्याही धरल्या आहेत. वर्षभर महागडी औषधे, फवारण्या करून हातातोंडाशी येणारे पीक पावसामुळे गळून पडण्याची, त्यावर डाग पडण्याची भीती आहे. यामुळे आंब्याचे मोठे नुकसान होण्याची भीती बागायतदार व्यक्त करीत आहेत. आंबा बागायतदारांप्रमाणेच सुपारी बागायतदारांनाही या अवेळी पावसाचा फटका बसला आहे. वाळवणास टाकलेली सुपारी काही प्रमाणात काढली असली, तरी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळवण भिजून गेली. विक्रेत्यांची तारांबळ रत्नागिरीत दर शनिवारी आठवडा बाजार भरतो. उन्हापासून संरक्षण होण्यासाठी विक्रेते ताडपत्री किंवा प्लास्टिकचा वापर करतात. मात्र, तरीही पावसामुळे साऱ्याच विक्रेत्यांची तारांबळ उडाली. ग्रामीण भागातून खरेदीला आलेल्या लोकांनाही खरेदी सोडून आश्रय शोधावा लागला. (प्रतिनिधी)