शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
4
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
5
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
6
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
7
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
8
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
9
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
10
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
11
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
12
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
13
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
14
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
15
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
16
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
17
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
18
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
19
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
20
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

अवकाळी पावसामुळे बागायतदार चिंतेत

By admin | Updated: February 28, 2015 23:42 IST

शनिवारी दुपारनंतर सुखद गारवा

रत्नागिरी : उकाड्याने हैराण झालेल्या रत्नागिरीकरांना शनिवारी दुपारनंतर सुखद गारवा देत पावसाने हलकेच आपले आगमन केले. विशेष म्हणजे जिल्ह्याच्या अनेक भागांत या पावसाची बरसात झाली. जोर नसला तरी या पावसाने अनेकांची तारांबळ उडविली. पावसाबरोबरच बराच काळ मळभाचे वातावरण असल्यामुळे आंबा बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. रत्नागिरी शहरात दुपारपासूनच ढगाळ वातावरण होते. दोन ते सव्वादोनच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. या पावसाने अनेकांची त्रेधातिरपीट उडविली. पाऊस किरकोळ असला तरी त्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली. देवरुख, लांजा, राजापूर, चिपळूण, गुहागर आदी परिसरातही जोरदार पाऊस झाला. रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे परिसरालाही अवेळी पावसाने दणका दिला. चौथा शनिवार असल्याने गणपतीपुळे येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. दुपारी दोनच्या दरम्यान पाऊस सुरू होताच पर्यटक आणि व्यावसायिकांची धावपळ उडाली. अनेक व्यावसायिकांनी दुपारीच आपली दुकाने बंद करणे पसंत केले. काही हौशी पर्यटकांनी मात्र या पावसाचा आनंद लुटला. खेडमध्येही सायंकाळी उशिरापर्यंत पावसाची बरसात सुरू होती. गुहागरात शनिवारी दुपारपासून पावसाने संततधार सुरू केली. अवेळी आलेल्या पावसामुळे आंबा बागायतदारांवर मोठे संकट ओढवले आहे. ऐन शिमगा सणात अचानक आलेल्या पावसामुळे संकासुर देवखेळ्यांनाही दुपारनंतर नाइलाजास्तव विश्रांती घ्यावी लागली. शृंगारतळी येथे आठवडा बाजारातील विक्रेते तसेच खरेदीदारांची पावसाने तारांबळ उडविली. चिपळुणात सकाळी काडाक्याने ऊन पडले होते, परंतु दुपारी अचानक वातावरण ढगाळ झाले. गार वारा सुटला होता. त्यानंतर अवकाळी पावसाची रिपरिप सुरू झाली. पावसामुळे जमीन भिजल्याने मातीचा सुगंध सुटला होता. तालुक्याच्या सर्वच भागात हा पाऊस पडला. शनिवारची सकाळ मळभट पावसाळी वातावरण घेऊन आली. पावसाची चाहुल लागल्याने आंबा बागायतदारांसह ग्रामीण भागातील नागरिक धास्तावले होते. दुपारच्या सत्रात थांबलेला पाऊस पुन्हा एकदा सायंकाळी पडला. आंबा मोहोराला आलेला असून, अनेक ठिकाणी लहानमोठ्या कैऱ्याही धरल्या आहेत. वर्षभर महागडी औषधे, फवारण्या करून हातातोंडाशी येणारे पीक पावसामुळे गळून पडण्याची, त्यावर डाग पडण्याची भीती आहे. यामुळे आंब्याचे मोठे नुकसान होण्याची भीती बागायतदार व्यक्त करीत आहेत. आंबा बागायतदारांप्रमाणेच सुपारी बागायतदारांनाही या अवेळी पावसाचा फटका बसला आहे. वाळवणास टाकलेली सुपारी काही प्रमाणात काढली असली, तरी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळवण भिजून गेली. विक्रेत्यांची तारांबळ रत्नागिरीत दर शनिवारी आठवडा बाजार भरतो. उन्हापासून संरक्षण होण्यासाठी विक्रेते ताडपत्री किंवा प्लास्टिकचा वापर करतात. मात्र, तरीही पावसामुळे साऱ्याच विक्रेत्यांची तारांबळ उडाली. ग्रामीण भागातून खरेदीला आलेल्या लोकांनाही खरेदी सोडून आश्रय शोधावा लागला. (प्रतिनिधी)