शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीमुळे तालुक्यात अनेक ठिकाणी जमीन खचण्याच्या घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:19 IST

राजापूर : अतिवृष्टीमुळे तालुक्यात जमीन खचण्याच्या घटना घडत आहेत. तारळ - चौके रस्त्यासह विखारेगोठणेकडे जाणारा रस्ता आणि त्या मार्गावरील ...

राजापूर : अतिवृष्टीमुळे तालुक्यात जमीन खचण्याच्या घटना घडत आहेत. तारळ - चौके रस्त्यासह विखारेगोठणेकडे जाणारा रस्ता आणि त्या मार्गावरील कॉजवे डोंगर येथे खचला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

सरींवर असणार्‍या पावसाने जोर धरला आहे. त्यातूनच अर्जुना-कोदवली नद्यांच्या पाण्यात वाढ होऊन दुपारनंतर पुन्हा एकदा शहरासह लगतच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. रात्री उशिरा पुराचे पाणी ओसरल्याने व्यापारी काहीसे निर्धास्त झाले होते. मात्र, गुरुवारी सकाळपासून पावसाने जोर धरल्याने आलेल्या पुराने पुन्हा एकदा व्यापार्‍यांची त्रेधातिरपीट उडवली आहे.

दरम्यान, गत आठवड्याप्रमाणे या आठवड्यामध्येही अतिपर्जन्यवृष्टीमुळे तालुक्यात जमीन खचण्याच्या घटना घडत आहेत. त्यामध्ये नव्याने तयार करण्यात आलेला तारळ - चौके रस्ता खचला आहे. तर कणेरी-विखारेगोठणेकडे जाणारा रस्ताही खचला आहे. याच रस्त्यावरील कॉजवेला डोंगर येथे काही प्रमाणात तडे गेले आहेत. त्यामुळे त्यावरून गाड्या चालविणे धोक्याचे झाले असून, तारळ-चौके आणि विखारेगोठणे रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पर्जन्यवृष्टीमध्ये कुंभवडे वाऊलवाडी येथील वसंत तुकाराम राघव यांच्या पडवीची भिंत कोसळून घराचे व पडवीचे अंशतः नुकसान झाले आहे तर कोंडतिवरे येथील श्रीकृष्ण गजानन पाध्ये यांच्या गोठ्यावर नारळाचे झाड मोडून पडल्याने नुकसान झाले आहे.