शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

अतिवृष्टीमुळे तालुक्यात अनेक ठिकाणी जमीन खचण्याच्या घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:19 IST

राजापूर : अतिवृष्टीमुळे तालुक्यात जमीन खचण्याच्या घटना घडत आहेत. तारळ - चौके रस्त्यासह विखारेगोठणेकडे जाणारा रस्ता आणि त्या मार्गावरील ...

राजापूर : अतिवृष्टीमुळे तालुक्यात जमीन खचण्याच्या घटना घडत आहेत. तारळ - चौके रस्त्यासह विखारेगोठणेकडे जाणारा रस्ता आणि त्या मार्गावरील कॉजवे डोंगर येथे खचला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

सरींवर असणार्‍या पावसाने जोर धरला आहे. त्यातूनच अर्जुना-कोदवली नद्यांच्या पाण्यात वाढ होऊन दुपारनंतर पुन्हा एकदा शहरासह लगतच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. रात्री उशिरा पुराचे पाणी ओसरल्याने व्यापारी काहीसे निर्धास्त झाले होते. मात्र, गुरुवारी सकाळपासून पावसाने जोर धरल्याने आलेल्या पुराने पुन्हा एकदा व्यापार्‍यांची त्रेधातिरपीट उडवली आहे.

दरम्यान, गत आठवड्याप्रमाणे या आठवड्यामध्येही अतिपर्जन्यवृष्टीमुळे तालुक्यात जमीन खचण्याच्या घटना घडत आहेत. त्यामध्ये नव्याने तयार करण्यात आलेला तारळ - चौके रस्ता खचला आहे. तर कणेरी-विखारेगोठणेकडे जाणारा रस्ताही खचला आहे. याच रस्त्यावरील कॉजवेला डोंगर येथे काही प्रमाणात तडे गेले आहेत. त्यामुळे त्यावरून गाड्या चालविणे धोक्याचे झाले असून, तारळ-चौके आणि विखारेगोठणे रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पर्जन्यवृष्टीमध्ये कुंभवडे वाऊलवाडी येथील वसंत तुकाराम राघव यांच्या पडवीची भिंत कोसळून घराचे व पडवीचे अंशतः नुकसान झाले आहे तर कोंडतिवरे येथील श्रीकृष्ण गजानन पाध्ये यांच्या गोठ्यावर नारळाचे झाड मोडून पडल्याने नुकसान झाले आहे.