शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

शिवनदीतील गाळ तत्काळ उपसा : शाहनवाज शाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:25 IST

चिपळूण : येथील नगरपालिका प्रशासनाने विशेष सभेत शिवनदीचा गाळ काढण्याचा निर्णय घेतला होता. पावसाळा तोंडावर असतानाही अद्याप गाळ काढण्याचे ...

चिपळूण : येथील नगरपालिका प्रशासनाने विशेष सभेत शिवनदीचा गाळ काढण्याचा निर्णय घेतला होता. पावसाळा तोंडावर असतानाही अद्याप गाळ काढण्याचे काम सुरू झालेले नाही. पावसाळ्यापूर्वी ते काम मार्गी लागले नाही तर यावर्षीच्या अतिवृष्टीच्या काळातही शहराला पुराचा धोका कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने तत्काळ ते काम हाती घेऊन शिवनदीला गाळमुक्त करावे, अशी मागणी येथील शाहनवाज शाह यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

शिवनदीतील गाळ न काढल्यामुळे त्याचा शहरातील जनजीवन, बाजारपेठ व पर्यावरणावर कोणता दुष्पपरिणाम होईल, शहरवासीयांना कोणत्या संकटाशी सामना करावा लागेल, याचा अभ्यास शाह यांनी केला आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे ते शिवनदीतील गाळ उपशासंदर्भात आणि नदीचे पावित्र्य जपण्यासाठी पाठपुरावाही करत आहेत. याबाबत माहिती देताना शाह म्हणाले, मैला व सांडपाणी थेट नदीत सोडले जात आहे. चिंचनाका पुलावर लोखंडी जाळी लावून फलक लावूनही काहीच फरक पडलेला नाही. आजही तेथे जाळीच्या वरून कचरा टाकला जात आहे. कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. दूषित सांडपाणी व गाळाने शिवनदी भरल्याने पाण्याचे योग्य विसर्जन होत नाही. त्यामुळे शहराला पुराचा धोका उद्भवतो. पावसाच्या तोंडावर लाखो रुपये खर्च करुन गाळ काढला जातो. मात्र, काढलेला गाळ काठावरच ठेवल्याने तो पुन्हा नदीत जातो. यामध्ये लाखो रूपये पाण्यात जातात. काही दिवसांपूर्वी पालिका प्रशासनाने शिवनदीतील गाळ काढण्याचा निर्णय घेतला. जलसंपदा विभागाकडून गाळ काढून तो योग्य जागी साठा करून ठेवण्यास परवानगीसुध्दा मिळाली आहे. मात्र, तरीही त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही.