शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
3
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
4
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
5
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
6
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
7
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
8
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
9
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
10
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
11
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
12
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
13
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
14
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
15
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
16
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
17
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
18
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
19
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
20
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 

माेफत धान्याचा लाभ आणखी पाच महिने मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:22 IST

रत्नागिरी : देशातील जनतेला कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. सामान्य जनतेच्या या कठीण प्रसंगाच्या अनुषंगाने ...

रत्नागिरी : देशातील जनतेला कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. सामान्य जनतेच्या या कठीण प्रसंगाच्या अनुषंगाने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा लाभ जुलै ते नोव्हेंबर असे पाच महिने वाढवून देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी एश्वर्या काळुसे यांनी दिली. रत्नागिरी जिल्ह्यातील ११ लाख ६९ हजार २०७ लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेबरोबरच या मोफत पाच किलो धान्याचा लाभ मिळत आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अन्नधान्याव्यतिरिक्त प्रतिमाह प्रतिसदस्य ५ किलो अन्नधान्य मोफत वितरित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून तसे आदेश दिले आहेत. राज्याकडून याबाबत २९ जून रोजी शासन आदेश काढण्यात आला आहे. या आदेशानुसार प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांबरोबरच अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारक कुटुंबातील सदस्यांनादेखील प्रति सदस्य प्रतिमाह ५ किलो मोफत अन्नधान्य मिळणार आहे. त्यात ३ किलो तांदूळ तर २ किलो गहू यांचा समावेश आहे.

या मोफत योजनेचे धान्यही जिल्ह्याला प्राप्त झाले असून प्रत्येक महिन्यात वेळेवर हे धान्य वितरीत केले जाणार असल्याचेही काळुसे यांनी सांगितले. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नियतनाच्या मर्यादेत लक्ष्य निर्धारीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी जुलै ते नोव्हेंबर या पाच महिन्यांसाठी अन्नधान्याचे (गहू व तांदूळ) नियतन मंजूर करण्यात आले आहे. धान्याचे मोफत वाटप त्या-त्या महिन्यांत करण्याच्या सूचना रास्त दर धान्य दुकानदारांनाही देण्यात आल्या आहेत, असेही जिल्हा पुरवठा अधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनी सांगितले.

पोर्टेबिलिटी सुविधा...

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत पात्र स्थलांतरीत लाभार्थांना या योजनेचा लाभ घेता यावा, याकरिता ‘एक देश, एक शिधापत्रिका’ योजनेंतर्गत पोर्टेबिलिटी सुविधेचा लाभ घेण्यासाठी अशा लाभार्थ्यांना प्राेत्साहित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत तसेच या मोफत धान्याचे वितरण रास्त भाव दुकानदारांनी पाॅस मशीनद्वारे करण्याच्या सूचनाही जिल्हा पुरवठा विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

धान्य बघूनच उचल करण्याच्या सूचना...

भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामातून अन्नधान्य स्वीकारताना शासनाच्या निर्देशानुसार नमुने घेऊन संयुक्‍तपणे अन्नधान्याचा दर्जा तपासून तो समाधानकारक असल्याची खात्री करूनच अन्नधान्याची उचल करण्यात यावी, अशा सूचना राज्याच्या पुरवठा विभागाने केल्या आहेत.

अंत्योदय शिधापत्रिकेवरील एकूण सदस्य : १,३८,३२२

प्राधान्य शिधापत्रिकेवरील एकूण सदस्य : १०,३०,८८५

जिल्ह्यासाठी गहू मंजूर (प्रति मास) : २३३८ मेट्रिक टन

जिल्ह्यासाठी तांदूळ मंजूर (प्रति मास) : ३५०७ मेट्रिक टन

एकूण धान्य मंजूर (प्रति मास) : ५८४५ मेट्रिक टन.