शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

माेफत धान्याचा लाभ आणखी पाच महिने मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:22 IST

रत्नागिरी : देशातील जनतेला कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. सामान्य जनतेच्या या कठीण प्रसंगाच्या अनुषंगाने ...

रत्नागिरी : देशातील जनतेला कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. सामान्य जनतेच्या या कठीण प्रसंगाच्या अनुषंगाने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा लाभ जुलै ते नोव्हेंबर असे पाच महिने वाढवून देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी एश्वर्या काळुसे यांनी दिली. रत्नागिरी जिल्ह्यातील ११ लाख ६९ हजार २०७ लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेबरोबरच या मोफत पाच किलो धान्याचा लाभ मिळत आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अन्नधान्याव्यतिरिक्त प्रतिमाह प्रतिसदस्य ५ किलो अन्नधान्य मोफत वितरित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून तसे आदेश दिले आहेत. राज्याकडून याबाबत २९ जून रोजी शासन आदेश काढण्यात आला आहे. या आदेशानुसार प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांबरोबरच अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारक कुटुंबातील सदस्यांनादेखील प्रति सदस्य प्रतिमाह ५ किलो मोफत अन्नधान्य मिळणार आहे. त्यात ३ किलो तांदूळ तर २ किलो गहू यांचा समावेश आहे.

या मोफत योजनेचे धान्यही जिल्ह्याला प्राप्त झाले असून प्रत्येक महिन्यात वेळेवर हे धान्य वितरीत केले जाणार असल्याचेही काळुसे यांनी सांगितले. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नियतनाच्या मर्यादेत लक्ष्य निर्धारीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी जुलै ते नोव्हेंबर या पाच महिन्यांसाठी अन्नधान्याचे (गहू व तांदूळ) नियतन मंजूर करण्यात आले आहे. धान्याचे मोफत वाटप त्या-त्या महिन्यांत करण्याच्या सूचना रास्त दर धान्य दुकानदारांनाही देण्यात आल्या आहेत, असेही जिल्हा पुरवठा अधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनी सांगितले.

पोर्टेबिलिटी सुविधा...

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत पात्र स्थलांतरीत लाभार्थांना या योजनेचा लाभ घेता यावा, याकरिता ‘एक देश, एक शिधापत्रिका’ योजनेंतर्गत पोर्टेबिलिटी सुविधेचा लाभ घेण्यासाठी अशा लाभार्थ्यांना प्राेत्साहित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत तसेच या मोफत धान्याचे वितरण रास्त भाव दुकानदारांनी पाॅस मशीनद्वारे करण्याच्या सूचनाही जिल्हा पुरवठा विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

धान्य बघूनच उचल करण्याच्या सूचना...

भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामातून अन्नधान्य स्वीकारताना शासनाच्या निर्देशानुसार नमुने घेऊन संयुक्‍तपणे अन्नधान्याचा दर्जा तपासून तो समाधानकारक असल्याची खात्री करूनच अन्नधान्याची उचल करण्यात यावी, अशा सूचना राज्याच्या पुरवठा विभागाने केल्या आहेत.

अंत्योदय शिधापत्रिकेवरील एकूण सदस्य : १,३८,३२२

प्राधान्य शिधापत्रिकेवरील एकूण सदस्य : १०,३०,८८५

जिल्ह्यासाठी गहू मंजूर (प्रति मास) : २३३८ मेट्रिक टन

जिल्ह्यासाठी तांदूळ मंजूर (प्रति मास) : ३५०७ मेट्रिक टन

एकूण धान्य मंजूर (प्रति मास) : ५८४५ मेट्रिक टन.