शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जाकादेवी परिसरातून शेकडो टन आंबा कॅनिंगसाठी रवाना

By admin | Updated: May 20, 2015 23:57 IST

शेवटचा पर्याय : हापूसच्या हंगामाचा उत्तरार्ध सुरू, पावसाचे सावट डोक्यावर असल्याने बागायतदारांची धावपळ

जाकादेवी : गेल्या तीन आठवड्यात परिसरातून शेकडो टन आंबा कॅनिंगसाठी पाठवण्यात आला. आंबा हंगाम अंतिम टप्प्यात आला असल्याने मिळेल तो दर पदरात पाडून घेऊन बागायतदार कॅनिंगमध्ये आंबा पाठवू लागले आहेत.जाकादेवी येथे राजू देसाई गेली २० वर्षे आंबा व्यवसाय करत आहेत. आंबा पेट्या पाठवण्याबरोबरच ते कॅनिंगसाठीही आंबा खरेदी करतात. मोठे सप्लायर्स आंबा त्यांच्याकडून खरेदी करुन मोठ्या कॅनिंग फॅक्टरीत पाठवतात. त्यांच्यासोबतच गणी, महाकाळ आणि मुकेश देसाई अन्य छोटे व्यावसायिकही हा व्यवसाय करीत आहेत. त्यांच्याकडून रोज अडीच ते तीन टन आंबा कॅनिंगसाठी पाठवला जातो. गेले चार आठवडे म्हणजे २४ एप्रिलपासून हा कॅनिंगसाठीचा आंबा खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरु आहे. आतापर्यंत शेकडो टन आंबा कॅनिंगसाठी पाठवण्यात आल्याची माहिती या व्यावसायिकांनी दिली.हा आंबा व्यावसायिक २७.५० ते २८ रुपये किलो दराने खरेदी करतात व ५० पैसे ते १ रुपया नफा घेऊन मोठ्या पुरवठादारांना विकतात. पुरवठादार दररोज संध्याकाळी आपली गाडी घेऊन या व्यावसायिकांनी गोळा केलेला आंबा घेऊन जातात. रत्नागिरीत स्थानिक ठिकाणाबरोबरच बलसाड (गुजरात), वारणा, भिलवली येथील मोठ्या कॅनिंग फॅक्टरीमध्ये हा आंबा पाठवला जातो.हापूस हंगामाबाबत राजू देसाई यांनी सांगितले की, नोव्हेंबरडिसेंबरच्या दरम्यान मोहोर आलेल्या झाडांचा आंबा फेब्रुवारीमध्ये तयार होतो. त्याला सुमारे १२० दिवस लागतात. जानेवारी - फेब्रुवारीमध्ये मोहोर आलेल्या झाडांचा आंबा ९० दिवसात तयार होतो. हापूसला उष्णता चांगली मिळत असल्याने त्याला तयार होण्यास ९० दिवस लागतात. आंबा पिकायला ८ ते १० दिवस लागतात, तर १२० दिवसात तयार होणारा आंबा १५ दिवसांनी पक्व होतो, असे त्यांनी सांगितले. कॅनिंगच्या या व्यवसायाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, या व्यवसायातून मला शेवटी ३० ते ४० हजार रुपये मिळतात. यामध्ये माझी मेहनत, सोबत ७ ते ८ मजूर लोक, गाडीभाडे वजा जाता ४० ते ५० हजार मिळतात, असे ते म्हणाले.बऱ्याच वेळा कॅनिंग आंबा खरेदी विक्री सुरु झाली की, कधीकधी चोरीचा थांबाही स्टॉलवर येतो. पण अनोळखी बागा नसलेला असा इसम किंवा महिला आढळली व ती आंबा विक्रीसाठी आली तर शक्यतो त्यांच्याकडून आंबा घेणे टाळतो. कारण तो आंबा चोरीचा असतो, हे लक्षात येते. तो नाकारण्याच्या मागे अशा लोकांनी आंबा चोरुन आणू नये, हाच उद्देश असतो. त्यामुळे चोरीला आळा घालण्याचा तो एक प्रयत्न आम्ही करीत असतो, असे ते म्हणाले.आंबा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. त्याचबरोबर अवकाळी पावसामुळे हाताशी आलेला आंबा जाऊ नये म्हणून शेतकरी - बागायतदार कॅनिंगसाठी आंबा घालत असल्याचे दिसून येते. (वार्ताहर)आंबा हंगामात सुरुवातीपासूनच म्हणजे आॅक्टोबर - नोव्हेंबरपासून झाड मोहोरण्याच्या वेळापासून सातत्याने बदलणाऱ्या वातावरणामुळे आंबा पिकाला फटका बसतो. त्यामुळे आंबा उत्पादनात झालेली घट पाहता आंब्याचे दर अजून चढा असल्याचे चित्र आहे. वाशी मार्केटला पाठवण्यापेक्षा स्टॉल उघडून झाडाच्या सावलीला हमरस्त्यावर आंबा विक्री करण्याकडे छोट्या बागायतदारांचा कल आहे. त्यामुळे गणपतीपुळे - निवळी मार्गावर छोटे शेतकरी आंबा विक्रीचा व्यवसाय करतात. दोन डझनाचा बॉक्स ४०० रुपये व ६० आंब्यांची किंवा ४८ आंब्यांची पेटी हजार ते बाराशे रुपये दराने विकत आहेत. अगदी सुरुवातीला दोन ते अडीच हजार रुपये असलेली पेटी चिंता निर्माण करणाऱ्या वातावरणामुळे एक हजारपर्यंत खाली आली आहे.