शहरं
Join us  
Trending Stories
1
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
2
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
3
तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली
4
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
5
Gold Silver Price 25 August: सोन्याच्या दरात बंपर तेजी, एका दिवसात चांदी २६२७ रुपयांनी महागली; पाहा काय आहेत नवे दर?
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
8
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
9
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल
10
आता फक्त ३ मिनिटांत भरा ITR! 'या' कंपनीने लॉन्च देशातील पहिला AI प्लॅटफॉर्म; अंतिम मुदतही वाढली
11
Nikki Murder Case : "दोन्ही जावई मुलींच्या पार्लरमधून पैसे चोरायचे, काहीच काम करत नव्हते"; ढसाढसा रडले वडील
12
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
13
Ola Electric Share Price: ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
14
गणेश चतुर्थी २०२५: राहु काळ कधी? ‘या’ शुभ मुहूर्तावर स्थापन करा गणपती; पाहा, चंद्रास्त वेळ
15
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
16
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
17
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
18
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
19
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
20
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य

जाकादेवी परिसरातून शेकडो टन आंबा कॅनिंगसाठी रवाना

By admin | Updated: May 20, 2015 23:57 IST

शेवटचा पर्याय : हापूसच्या हंगामाचा उत्तरार्ध सुरू, पावसाचे सावट डोक्यावर असल्याने बागायतदारांची धावपळ

जाकादेवी : गेल्या तीन आठवड्यात परिसरातून शेकडो टन आंबा कॅनिंगसाठी पाठवण्यात आला. आंबा हंगाम अंतिम टप्प्यात आला असल्याने मिळेल तो दर पदरात पाडून घेऊन बागायतदार कॅनिंगमध्ये आंबा पाठवू लागले आहेत.जाकादेवी येथे राजू देसाई गेली २० वर्षे आंबा व्यवसाय करत आहेत. आंबा पेट्या पाठवण्याबरोबरच ते कॅनिंगसाठीही आंबा खरेदी करतात. मोठे सप्लायर्स आंबा त्यांच्याकडून खरेदी करुन मोठ्या कॅनिंग फॅक्टरीत पाठवतात. त्यांच्यासोबतच गणी, महाकाळ आणि मुकेश देसाई अन्य छोटे व्यावसायिकही हा व्यवसाय करीत आहेत. त्यांच्याकडून रोज अडीच ते तीन टन आंबा कॅनिंगसाठी पाठवला जातो. गेले चार आठवडे म्हणजे २४ एप्रिलपासून हा कॅनिंगसाठीचा आंबा खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरु आहे. आतापर्यंत शेकडो टन आंबा कॅनिंगसाठी पाठवण्यात आल्याची माहिती या व्यावसायिकांनी दिली.हा आंबा व्यावसायिक २७.५० ते २८ रुपये किलो दराने खरेदी करतात व ५० पैसे ते १ रुपया नफा घेऊन मोठ्या पुरवठादारांना विकतात. पुरवठादार दररोज संध्याकाळी आपली गाडी घेऊन या व्यावसायिकांनी गोळा केलेला आंबा घेऊन जातात. रत्नागिरीत स्थानिक ठिकाणाबरोबरच बलसाड (गुजरात), वारणा, भिलवली येथील मोठ्या कॅनिंग फॅक्टरीमध्ये हा आंबा पाठवला जातो.हापूस हंगामाबाबत राजू देसाई यांनी सांगितले की, नोव्हेंबरडिसेंबरच्या दरम्यान मोहोर आलेल्या झाडांचा आंबा फेब्रुवारीमध्ये तयार होतो. त्याला सुमारे १२० दिवस लागतात. जानेवारी - फेब्रुवारीमध्ये मोहोर आलेल्या झाडांचा आंबा ९० दिवसात तयार होतो. हापूसला उष्णता चांगली मिळत असल्याने त्याला तयार होण्यास ९० दिवस लागतात. आंबा पिकायला ८ ते १० दिवस लागतात, तर १२० दिवसात तयार होणारा आंबा १५ दिवसांनी पक्व होतो, असे त्यांनी सांगितले. कॅनिंगच्या या व्यवसायाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, या व्यवसायातून मला शेवटी ३० ते ४० हजार रुपये मिळतात. यामध्ये माझी मेहनत, सोबत ७ ते ८ मजूर लोक, गाडीभाडे वजा जाता ४० ते ५० हजार मिळतात, असे ते म्हणाले.बऱ्याच वेळा कॅनिंग आंबा खरेदी विक्री सुरु झाली की, कधीकधी चोरीचा थांबाही स्टॉलवर येतो. पण अनोळखी बागा नसलेला असा इसम किंवा महिला आढळली व ती आंबा विक्रीसाठी आली तर शक्यतो त्यांच्याकडून आंबा घेणे टाळतो. कारण तो आंबा चोरीचा असतो, हे लक्षात येते. तो नाकारण्याच्या मागे अशा लोकांनी आंबा चोरुन आणू नये, हाच उद्देश असतो. त्यामुळे चोरीला आळा घालण्याचा तो एक प्रयत्न आम्ही करीत असतो, असे ते म्हणाले.आंबा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. त्याचबरोबर अवकाळी पावसामुळे हाताशी आलेला आंबा जाऊ नये म्हणून शेतकरी - बागायतदार कॅनिंगसाठी आंबा घालत असल्याचे दिसून येते. (वार्ताहर)आंबा हंगामात सुरुवातीपासूनच म्हणजे आॅक्टोबर - नोव्हेंबरपासून झाड मोहोरण्याच्या वेळापासून सातत्याने बदलणाऱ्या वातावरणामुळे आंबा पिकाला फटका बसतो. त्यामुळे आंबा उत्पादनात झालेली घट पाहता आंब्याचे दर अजून चढा असल्याचे चित्र आहे. वाशी मार्केटला पाठवण्यापेक्षा स्टॉल उघडून झाडाच्या सावलीला हमरस्त्यावर आंबा विक्री करण्याकडे छोट्या बागायतदारांचा कल आहे. त्यामुळे गणपतीपुळे - निवळी मार्गावर छोटे शेतकरी आंबा विक्रीचा व्यवसाय करतात. दोन डझनाचा बॉक्स ४०० रुपये व ६० आंब्यांची किंवा ४८ आंब्यांची पेटी हजार ते बाराशे रुपये दराने विकत आहेत. अगदी सुरुवातीला दोन ते अडीच हजार रुपये असलेली पेटी चिंता निर्माण करणाऱ्या वातावरणामुळे एक हजारपर्यंत खाली आली आहे.