शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

शेकडो ब्रास वाळूची बिनधास्त चोरी

By admin | Updated: June 30, 2014 00:15 IST

मिरकरवाडा बंदर : प्रांताधिकारी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर तुडवले जातात शासकीय नियम

रत्नागिरी : गेल्या दोन वर्षांच्या काळात रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदरातील गाळ ड्रेझरद्वारे उपसा करून बंदराशेजारी पांढऱ्या समुद्रापर्यंत ढीग रचून ठेवण्यात आला आहे. बांधकामासाठी उपयुक्त असल्याने शेकडो ब्रास वाळू (उपसलेला गाळ) ट्रकद्वारे चोरून नेण्यात आल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात बेकायदा वाळू उपसा समस्या कायम असतानाच मिरकरवाडा बंदरातील वाळूची चोरी नेमके कोण करतो, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे महसूल खात्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात मंडणगड, रत्नागिरी, गुहागर, चिपळूणसह अनेक ठिकाणी अद्याप बेकायदा वाळू उपसा सुरू आहे. मात्र, याबाबत फोटो वा व्हिडिओद्वारे प्रसारमाध्यमांनी महसूल खात्याच्या डोळ्यात अंजन घातल्यानंतर तेवढ्यापुरती कारवाई केली जाते. त्यानंतर जैसे थे स्थिती निर्माण होते. त्यामुळे या अवैध वाळू उत्खनन व्यवसायाला अधिकाऱ्यांचेच अभय असल्याचा आरोप होत आहे. बेकायदा वाळू उत्खननामुळे शासनाचे रॉयल्टीपोटी मिळणारे लाखो रुपयांचे उत्पन्न गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने बुडत आहे. जिल्ह्यातील वाळू उपशाबाबत ही स्थिती असताना मिरकरवाडा बंदरात मच्छिमारी नौकांना पाण्याची योग्य खोली उपलब्ध करून देण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून बंदरातील गाळ ड्रेझरद्वारे मोठ्या प्रमाणात उपसण्यात आला. ही वाळू ड्रेझरमधील सक्शन पंपद्वारे रबरी पाइपमधून किनाऱ्यावर टाकण्यात आली. त्यामुळे मिरकरवाडा बंदरापासून पांढऱ्या समुद्रापर्यंत या वाळूचा प्रचंड मोठा ढिगारा तयार झाला आहे. ही वाळू हजारो ब्रास आहे. किनाऱ्यावरील जाडसर वाळू बांधकामासाठी वापरली जाते. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून या वाळूची चोरी होत आहे. पांढऱ्या समुद्राच्या बाजूने मुख्य रस्त्यापर्यंत असलेल्या वाटेने येऊन ट्रकमधून ही वाळू नेली जात आहे. येथील वाळू चोरट्यांवर कारवाई कधी होणार, असा प्रश्न आता स्थानिक नागरिकांतून विचारला जात आहे. (प्रतिनिधी)