शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

शेकडो ब्रास वाळूची बिनधास्त चोरी

By admin | Updated: June 30, 2014 00:15 IST

मिरकरवाडा बंदर : प्रांताधिकारी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर तुडवले जातात शासकीय नियम

रत्नागिरी : गेल्या दोन वर्षांच्या काळात रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदरातील गाळ ड्रेझरद्वारे उपसा करून बंदराशेजारी पांढऱ्या समुद्रापर्यंत ढीग रचून ठेवण्यात आला आहे. बांधकामासाठी उपयुक्त असल्याने शेकडो ब्रास वाळू (उपसलेला गाळ) ट्रकद्वारे चोरून नेण्यात आल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात बेकायदा वाळू उपसा समस्या कायम असतानाच मिरकरवाडा बंदरातील वाळूची चोरी नेमके कोण करतो, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे महसूल खात्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात मंडणगड, रत्नागिरी, गुहागर, चिपळूणसह अनेक ठिकाणी अद्याप बेकायदा वाळू उपसा सुरू आहे. मात्र, याबाबत फोटो वा व्हिडिओद्वारे प्रसारमाध्यमांनी महसूल खात्याच्या डोळ्यात अंजन घातल्यानंतर तेवढ्यापुरती कारवाई केली जाते. त्यानंतर जैसे थे स्थिती निर्माण होते. त्यामुळे या अवैध वाळू उत्खनन व्यवसायाला अधिकाऱ्यांचेच अभय असल्याचा आरोप होत आहे. बेकायदा वाळू उत्खननामुळे शासनाचे रॉयल्टीपोटी मिळणारे लाखो रुपयांचे उत्पन्न गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने बुडत आहे. जिल्ह्यातील वाळू उपशाबाबत ही स्थिती असताना मिरकरवाडा बंदरात मच्छिमारी नौकांना पाण्याची योग्य खोली उपलब्ध करून देण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून बंदरातील गाळ ड्रेझरद्वारे मोठ्या प्रमाणात उपसण्यात आला. ही वाळू ड्रेझरमधील सक्शन पंपद्वारे रबरी पाइपमधून किनाऱ्यावर टाकण्यात आली. त्यामुळे मिरकरवाडा बंदरापासून पांढऱ्या समुद्रापर्यंत या वाळूचा प्रचंड मोठा ढिगारा तयार झाला आहे. ही वाळू हजारो ब्रास आहे. किनाऱ्यावरील जाडसर वाळू बांधकामासाठी वापरली जाते. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून या वाळूची चोरी होत आहे. पांढऱ्या समुद्राच्या बाजूने मुख्य रस्त्यापर्यंत असलेल्या वाटेने येऊन ट्रकमधून ही वाळू नेली जात आहे. येथील वाळू चोरट्यांवर कारवाई कधी होणार, असा प्रश्न आता स्थानिक नागरिकांतून विचारला जात आहे. (प्रतिनिधी)