शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

रखडलेल्या चौपदरीकरणाविरोधात चिपळुणात उद्या मानवी साखळी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:21 IST

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत मुंबई-गोवा महामार्ग समन्वय समितीने थेट आंदोलनाची भूमिका घेतली आहे. चिपळूण बहादूरशेख नाका येथे ...

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत मुंबई-गोवा महामार्ग समन्वय समितीने थेट आंदोलनाची भूमिका घेतली आहे. चिपळूण बहादूरशेख नाका येथे ९ रोजी महामार्गावर मानवी साखळी आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. समन्वय समितीचे अध्यक्ष संजय यादवराव व उच्च न्यायालयाचे वकील ओवेस पेचकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण गेले कित्येक वर्षे रखडले आहे. आता प्रत्यक्षात काम सुरू असले तरी कामाची गती प्रचंड मंदावली आहे. काही ठिकाणी अद्याप कामाला सुरुवातदेखील झालेली नाही. अनेक महत्त्वाच्या पुलांची कामे अर्धवट आहेत. तर संगमेश्वर येथील सोनवी पुलाच्या कामाला आद्यप प्रारंभदेखील झालेला नाही. चौपदरीकरणात बाधित होणाऱ्या लोकांच्या अनेक समस्या असून, त्याकडेही लक्ष दिले जात नाही. काहींना अद्यापही नुकसानभरपाई मिळालेली नाही.

अशा पद्धतीने जर काम सुरू राहिले, तर पुढील १० वर्षे तरी महामार्गाचे काम पूर्ण होणार नाही. अपघात होऊन निष्पाप लोकांचे बळी जात राहतील. याची दखल घेत मुंबई-गोवा महामार्ग समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्या माध्यमातून आता जनतेचा आवाज थेट शसनापर्यंत पोहोचवण्याची तयारी करण्यात आली आहे. या महामार्गाबाबत जर शासनाला जाग आणायची असेल तर जनआंदोलन हाच पर्याय असल्याचे स्पष्ट करत समन्वय समितीने आंदोलनाची भूमिका घेतली आहे. याबाबत नुकतीच समन्वय समितीची बैठक संजय यादवराव यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. यावेळी ॲड. ओवेस पेचकर, मुस्लिम विकास मंच अध्यक्ष अनवर पेचकर, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु अर्ते, प्रमोद हर्डीकर, मझहर पेचकर, सदृद्दीन पटेल उपस्थित होते.