शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

रखडलेल्या चौपदरीकरणाविरोधात चिपळुणात उद्या मानवी साखळी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:21 IST

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत मुंबई-गोवा महामार्ग समन्वय समितीने थेट आंदोलनाची भूमिका घेतली आहे. चिपळूण बहादूरशेख नाका येथे ...

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत मुंबई-गोवा महामार्ग समन्वय समितीने थेट आंदोलनाची भूमिका घेतली आहे. चिपळूण बहादूरशेख नाका येथे ९ रोजी महामार्गावर मानवी साखळी आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. समन्वय समितीचे अध्यक्ष संजय यादवराव व उच्च न्यायालयाचे वकील ओवेस पेचकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण गेले कित्येक वर्षे रखडले आहे. आता प्रत्यक्षात काम सुरू असले तरी कामाची गती प्रचंड मंदावली आहे. काही ठिकाणी अद्याप कामाला सुरुवातदेखील झालेली नाही. अनेक महत्त्वाच्या पुलांची कामे अर्धवट आहेत. तर संगमेश्वर येथील सोनवी पुलाच्या कामाला आद्यप प्रारंभदेखील झालेला नाही. चौपदरीकरणात बाधित होणाऱ्या लोकांच्या अनेक समस्या असून, त्याकडेही लक्ष दिले जात नाही. काहींना अद्यापही नुकसानभरपाई मिळालेली नाही.

अशा पद्धतीने जर काम सुरू राहिले, तर पुढील १० वर्षे तरी महामार्गाचे काम पूर्ण होणार नाही. अपघात होऊन निष्पाप लोकांचे बळी जात राहतील. याची दखल घेत मुंबई-गोवा महामार्ग समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्या माध्यमातून आता जनतेचा आवाज थेट शसनापर्यंत पोहोचवण्याची तयारी करण्यात आली आहे. या महामार्गाबाबत जर शासनाला जाग आणायची असेल तर जनआंदोलन हाच पर्याय असल्याचे स्पष्ट करत समन्वय समितीने आंदोलनाची भूमिका घेतली आहे. याबाबत नुकतीच समन्वय समितीची बैठक संजय यादवराव यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. यावेळी ॲड. ओवेस पेचकर, मुस्लिम विकास मंच अध्यक्ष अनवर पेचकर, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु अर्ते, प्रमोद हर्डीकर, मझहर पेचकर, सदृद्दीन पटेल उपस्थित होते.